शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

ग्रामपंचायत निवडणूक; उमेदवारांचा आज फैसला

By admin | Updated: August 6, 2015 00:48 IST

निवडणुकीची मतमोजणी ६ ऑगस्ट रोजी होणार; उत्सुकता शिगेला.

वाशिम : जिल्ह्यात १६३ पैकी नऊ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने १५४ ग्रामपंचायतींची सार्वत्निक निवडणूक व एका ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक ४ ऑगस्ट रोजी शांततेत पार पडली. या निवडणुकीत ७३.५४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीची मतमोजणी ६ ऑगस्ट रोजी होणार असून, मतदारांनी कोण्या उमेदवाराला, पॅनलला कौल दिला, हे स्पष्ट होणार आहे. वाशिम तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमध्ये १८३ जागांसाठी झालेले मतदान ७७.५८ टक्के होते तसेच रिसोड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींमध्ये २९0 जागांसाठी ७६.0३ टक्के, मालेगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये २0६ जागांसाठी ७३.४३ टक्के, कारंजा तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींमध्ये २१४ जागांसाठी ६८.६६ टक्के, मानोरा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमध्ये १६२ जागांसाठी ६९.८३ टक्के व मंगरूळपीर तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींमध्ये १७२ जागांसाठी ७३.0६ टक्के मतदान झाले. वाशिम तालुक्यातील ४८६८५, रिसोड तालुक्यातील ६४९४४, मालेगाव ४९३९२, मंगरुळपीर ३८६७३, कारंजा ४१२0४, तर मानोरा तालुक्यातील ३५७0६ मतदारांपैकी अनुक्रमे ३७७७0, ४९३७९, ३६२७0, २८२५४, २८२९१, २४९३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणार्‍यांमध्ये ७४.३८ टक्के पुरुष तर ७२.६३ टक्के महिलांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील १५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर ६ ऑगस्ट रोजी मतमोजणीत कोणत्या पॅनलला मतदारांनी कौल दिला, हे स्पष्ट होईल. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी उडी घेऊन जोरदार फिल्डिंग लावली होती. यामध्ये खासदार, आमदार व गावपातळीवरील नेत्यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश होता. आपल्याच पॅनलचे उमेदवार निवडून यावे, यासाठी रणनीती आखण्यात आली होती. बर्‍याच गावांमध्ये राजकीय मंडळींनी सभा घेऊन पॅनलचे ध्येयधोरण स्पष्ट केले होते. जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या व अटीतटीच्या निवडणुकीत कोणाचा विजय होतो, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील अनसिंग, मालेगाव तालुक्यातील शिरपूर, मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार यांसह रिसोड, कारंजा तालुक्यातील काही गावांमध्ये निवडणूक रंगात होती. या ठिकाणी मतदारांनी मतदानही मोठय़ा प्रमाणात केले. नेमके मतदारांनी कोणाला कौल दिला आहे, याकडे गावातील जनतेचे लक्ष लागले आहे. अनेक गावांमध्ये अमक्या-तमक्या पॅनलचा विजय होणार असल्याच्या पैजा लावण्यात येत असल्याचे चित्र आहे.