शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक; उमेदवारांचा आज फैसला

By admin | Updated: August 6, 2015 00:48 IST

निवडणुकीची मतमोजणी ६ ऑगस्ट रोजी होणार; उत्सुकता शिगेला.

वाशिम : जिल्ह्यात १६३ पैकी नऊ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने १५४ ग्रामपंचायतींची सार्वत्निक निवडणूक व एका ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक ४ ऑगस्ट रोजी शांततेत पार पडली. या निवडणुकीत ७३.५४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीची मतमोजणी ६ ऑगस्ट रोजी होणार असून, मतदारांनी कोण्या उमेदवाराला, पॅनलला कौल दिला, हे स्पष्ट होणार आहे. वाशिम तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमध्ये १८३ जागांसाठी झालेले मतदान ७७.५८ टक्के होते तसेच रिसोड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींमध्ये २९0 जागांसाठी ७६.0३ टक्के, मालेगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये २0६ जागांसाठी ७३.४३ टक्के, कारंजा तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींमध्ये २१४ जागांसाठी ६८.६६ टक्के, मानोरा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमध्ये १६२ जागांसाठी ६९.८३ टक्के व मंगरूळपीर तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींमध्ये १७२ जागांसाठी ७३.0६ टक्के मतदान झाले. वाशिम तालुक्यातील ४८६८५, रिसोड तालुक्यातील ६४९४४, मालेगाव ४९३९२, मंगरुळपीर ३८६७३, कारंजा ४१२0४, तर मानोरा तालुक्यातील ३५७0६ मतदारांपैकी अनुक्रमे ३७७७0, ४९३७९, ३६२७0, २८२५४, २८२९१, २४९३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणार्‍यांमध्ये ७४.३८ टक्के पुरुष तर ७२.६३ टक्के महिलांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील १५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर ६ ऑगस्ट रोजी मतमोजणीत कोणत्या पॅनलला मतदारांनी कौल दिला, हे स्पष्ट होईल. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी उडी घेऊन जोरदार फिल्डिंग लावली होती. यामध्ये खासदार, आमदार व गावपातळीवरील नेत्यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश होता. आपल्याच पॅनलचे उमेदवार निवडून यावे, यासाठी रणनीती आखण्यात आली होती. बर्‍याच गावांमध्ये राजकीय मंडळींनी सभा घेऊन पॅनलचे ध्येयधोरण स्पष्ट केले होते. जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या व अटीतटीच्या निवडणुकीत कोणाचा विजय होतो, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील अनसिंग, मालेगाव तालुक्यातील शिरपूर, मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार यांसह रिसोड, कारंजा तालुक्यातील काही गावांमध्ये निवडणूक रंगात होती. या ठिकाणी मतदारांनी मतदानही मोठय़ा प्रमाणात केले. नेमके मतदारांनी कोणाला कौल दिला आहे, याकडे गावातील जनतेचे लक्ष लागले आहे. अनेक गावांमध्ये अमक्या-तमक्या पॅनलचा विजय होणार असल्याच्या पैजा लावण्यात येत असल्याचे चित्र आहे.