शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

ग्रामपंचायत निवडणूक; उमेदवारांचा आज फैसला

By admin | Updated: August 6, 2015 00:48 IST

निवडणुकीची मतमोजणी ६ ऑगस्ट रोजी होणार; उत्सुकता शिगेला.

वाशिम : जिल्ह्यात १६३ पैकी नऊ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने १५४ ग्रामपंचायतींची सार्वत्निक निवडणूक व एका ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक ४ ऑगस्ट रोजी शांततेत पार पडली. या निवडणुकीत ७३.५४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीची मतमोजणी ६ ऑगस्ट रोजी होणार असून, मतदारांनी कोण्या उमेदवाराला, पॅनलला कौल दिला, हे स्पष्ट होणार आहे. वाशिम तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमध्ये १८३ जागांसाठी झालेले मतदान ७७.५८ टक्के होते तसेच रिसोड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींमध्ये २९0 जागांसाठी ७६.0३ टक्के, मालेगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये २0६ जागांसाठी ७३.४३ टक्के, कारंजा तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींमध्ये २१४ जागांसाठी ६८.६६ टक्के, मानोरा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमध्ये १६२ जागांसाठी ६९.८३ टक्के व मंगरूळपीर तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींमध्ये १७२ जागांसाठी ७३.0६ टक्के मतदान झाले. वाशिम तालुक्यातील ४८६८५, रिसोड तालुक्यातील ६४९४४, मालेगाव ४९३९२, मंगरुळपीर ३८६७३, कारंजा ४१२0४, तर मानोरा तालुक्यातील ३५७0६ मतदारांपैकी अनुक्रमे ३७७७0, ४९३७९, ३६२७0, २८२५४, २८२९१, २४९३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणार्‍यांमध्ये ७४.३८ टक्के पुरुष तर ७२.६३ टक्के महिलांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील १५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर ६ ऑगस्ट रोजी मतमोजणीत कोणत्या पॅनलला मतदारांनी कौल दिला, हे स्पष्ट होईल. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी उडी घेऊन जोरदार फिल्डिंग लावली होती. यामध्ये खासदार, आमदार व गावपातळीवरील नेत्यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश होता. आपल्याच पॅनलचे उमेदवार निवडून यावे, यासाठी रणनीती आखण्यात आली होती. बर्‍याच गावांमध्ये राजकीय मंडळींनी सभा घेऊन पॅनलचे ध्येयधोरण स्पष्ट केले होते. जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या व अटीतटीच्या निवडणुकीत कोणाचा विजय होतो, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील अनसिंग, मालेगाव तालुक्यातील शिरपूर, मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार यांसह रिसोड, कारंजा तालुक्यातील काही गावांमध्ये निवडणूक रंगात होती. या ठिकाणी मतदारांनी मतदानही मोठय़ा प्रमाणात केले. नेमके मतदारांनी कोणाला कौल दिला आहे, याकडे गावातील जनतेचे लक्ष लागले आहे. अनेक गावांमध्ये अमक्या-तमक्या पॅनलचा विजय होणार असल्याच्या पैजा लावण्यात येत असल्याचे चित्र आहे.