शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
2
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
3
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
5
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
6
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
7
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
8
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी
9
आता तरी एकता दाखवा; काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने एअर स्ट्राईकला म्हटले 'टुच्चेपणा'
10
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
11
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
12
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
13
Operation Sindoor : "जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
14
Operation Sindoor : "अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
15
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
16
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
17
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
18
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
19
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
20
Mumbai Rains: ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ

ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले

By admin | Updated: June 24, 2015 01:56 IST

आचारसंहिता लागू; वाशिम जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचे मतदान ४ ऑगस्टला.

वाशिम : ऑगस्ट-सप्टेंबर २0१५ मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने २३ जूनला जाहीर केला. त्या-त्या ग्रामपंचायत क्षेत्नात निवडणूक आचारसंहिताही २३ जूनच्या मध्यरात्नीपासून लागू झाली असल्याने राजकारण्यांमध्ये एकच धावपळ सुरू झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ४९२ पैकी १६३ ग्रामपंचायतींची सार्वत्निक निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने राजकीय मंडळीने फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. जिल्ह्यात होऊ घातलेल्या १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वाशिम तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे तसेच मालेगाव तालुक्यातील ३0, मंगरूळपीर तालुक्यातील २५, रिसोड तालुक्यातील ३४, कारंजा तालुक्यातील २८, मानोरा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. १६३ ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्टला सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 या कालावधीत मतदान होणार आहे. दरम्यान, मतमोजणी ६ ऑगस्टला होईल. जिल्ह्यातील या निवडणुका राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केल्यानुसार दुसर्‍या टप्प्यात होत आहे. त्यासाठी ४ जुलै रोजी १६३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. दुसरीकडे नामनिर्देशनपत्र १३ जुलैपासून दाखल करण्यास प्रारंभ होईल. २0 जुलै ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तिथी आहे. २१ जलै रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी २३ जुलैला दुपारी ४ वाजतापर्यंंतचा वेळ देण्यात आला आहे. यानंतर चिन्ह वाटप करण्यात येतील. ही सोपस्कार आटोपल्यानंतर ४ ऑगस्टला उपरोक्त निर्धारित कालावधीत मतदान होईल. या निवडणुका यापूर्वीच होणे अपेक्षित होते; मात्र ग्रामपंचायत निवडणुकांचा जवळपास १0 ते १२ वर्षापासूनचा निवडणूक ग्रामविकास मंत्रालयाकडे प्रलंबित होता त्यामुळे तहसीलदार तथा नायब तहसीलदार संघटनेच्यावतिने मार्च महिन्यातील निवडणुकांची अधिसूचना जाहीर करण्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता. त्यावेळी तहसीलदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश बगडे यांनी थेट ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेऊन प्रलंबित निधी त्वरेने मिळावा, यासाठी गळ घातली होती. दरम्यानच्या घडामोडीत निवडणुकीच्या कार्यक्रमवर बहिष्कार टाकणार्‍या तहसीलदारांच्या निलंबनाचा आक्रमक पवित्रा स्वीकारण्यात आला होता; मात्र उभय बाजूने नमते घेत काही जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका तथा पोटनिवडणुका घेण्याची अधिसूचना अखेरच्या क्षणी ३0 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. दुसरीकडे सर्व जिल्हयातील थकीत निधीचा गोषवारा ग्रामविकास मंत्रालय व निवडणूक विभागाने मागितला होता. त्याअनुषंगाने आता थकीत निधी मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.