शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले

By admin | Updated: June 24, 2015 01:56 IST

आचारसंहिता लागू; वाशिम जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचे मतदान ४ ऑगस्टला.

वाशिम : ऑगस्ट-सप्टेंबर २0१५ मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने २३ जूनला जाहीर केला. त्या-त्या ग्रामपंचायत क्षेत्नात निवडणूक आचारसंहिताही २३ जूनच्या मध्यरात्नीपासून लागू झाली असल्याने राजकारण्यांमध्ये एकच धावपळ सुरू झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ४९२ पैकी १६३ ग्रामपंचायतींची सार्वत्निक निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने राजकीय मंडळीने फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. जिल्ह्यात होऊ घातलेल्या १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वाशिम तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे तसेच मालेगाव तालुक्यातील ३0, मंगरूळपीर तालुक्यातील २५, रिसोड तालुक्यातील ३४, कारंजा तालुक्यातील २८, मानोरा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. १६३ ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्टला सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 या कालावधीत मतदान होणार आहे. दरम्यान, मतमोजणी ६ ऑगस्टला होईल. जिल्ह्यातील या निवडणुका राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केल्यानुसार दुसर्‍या टप्प्यात होत आहे. त्यासाठी ४ जुलै रोजी १६३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. दुसरीकडे नामनिर्देशनपत्र १३ जुलैपासून दाखल करण्यास प्रारंभ होईल. २0 जुलै ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तिथी आहे. २१ जलै रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी २३ जुलैला दुपारी ४ वाजतापर्यंंतचा वेळ देण्यात आला आहे. यानंतर चिन्ह वाटप करण्यात येतील. ही सोपस्कार आटोपल्यानंतर ४ ऑगस्टला उपरोक्त निर्धारित कालावधीत मतदान होईल. या निवडणुका यापूर्वीच होणे अपेक्षित होते; मात्र ग्रामपंचायत निवडणुकांचा जवळपास १0 ते १२ वर्षापासूनचा निवडणूक ग्रामविकास मंत्रालयाकडे प्रलंबित होता त्यामुळे तहसीलदार तथा नायब तहसीलदार संघटनेच्यावतिने मार्च महिन्यातील निवडणुकांची अधिसूचना जाहीर करण्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता. त्यावेळी तहसीलदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश बगडे यांनी थेट ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेऊन प्रलंबित निधी त्वरेने मिळावा, यासाठी गळ घातली होती. दरम्यानच्या घडामोडीत निवडणुकीच्या कार्यक्रमवर बहिष्कार टाकणार्‍या तहसीलदारांच्या निलंबनाचा आक्रमक पवित्रा स्वीकारण्यात आला होता; मात्र उभय बाजूने नमते घेत काही जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका तथा पोटनिवडणुका घेण्याची अधिसूचना अखेरच्या क्षणी ३0 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. दुसरीकडे सर्व जिल्हयातील थकीत निधीचा गोषवारा ग्रामविकास मंत्रालय व निवडणूक विभागाने मागितला होता. त्याअनुषंगाने आता थकीत निधी मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.