शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

ग्रामपंचायत निवडणुकीने तापविले ‘राजकारण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:07 IST

कारंजा लाड: ७ ऑक्टोबर रोजी होणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकारण चांगले तापले असल्याचे दिसून येते. 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: ७ ऑक्टोबर रोजी होणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकारण चांगले तापले असल्याचे दिसून येते. ऑक्टोबर व डिसेंबर महिन्यात मुदत संपणार्‍या  कारंजा तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला आहे. तालुक्यातील खेर्डा कारंजा, वालई, जांब, गिर्डा या चार ग्रामपंचायतची हद्दवाढ झाल्यामुळे प्रभाग रचनेत फेरबदल करणे आवश्यक आहे. ती प्रक्रिया सुरू असल्याने त्या ग्राम पंचायतीच्या प्रभागरचनेसंदर्भात आक्ष्ेाप दाखल झाल्याने या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहे. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीची नवीन तारीख निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात येईल, असे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले. या वर्षी पहिल्यादांच सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने ही निवडणूक नेमकी कशी राहील, या बाबत जनमानसात संभ्रम दिसून येत आहे. यापूर्वी नगर परिषदेसाठी याच नियमावर आधारित नगराध्यपदाची निवड थेट जनतेतून घेण्यात आली. त्यावेळी पूर्वी काढलेले आरक्षण रद्द करून व संभाव्य सदस्यांच्या संख्येत एकाची वाढ करून नगराध्यक्ष पदाची निवडणुक थेट उमेदवारांनी लढविली. त्याच पृष्ठभूमीवर ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक लढविली जाईल की त्यात काही फेरबदल होईल, या बाबत मतदार संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येते. ७ ऑक्टोबरला मतदान होत असून, त्याकरिता १५ ते २२ सष्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.  ९ ऑक्टोबर रेाजी मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात येईल. निवडणूक असलेल्या गावागावात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून, गाव पुढारी मोर्चेबांधणीच्या कामाला आहे. यावर्षी पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने सरपंच पदासाठी खर्चाची र्मयादा निश्‍चित केली असून, त्यासाठी शैक्षणिक पात्रता ही निश्‍चित केल्याने यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत येईल, अशी चिन्हे आहेत. ग्रामपंचायत सदस्य पदाची निवडणूक पुढार्‍यांच्या तोंडपाठ असली तरी सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने मतदारासोबत पुढार्‍यातही याबाबत संभ्रम अवस्था दिसून येत आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.  याबाबत तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सदस्य संख्या कायम राहून सरपंच पदासाठी स्वतंत्र उमेदवार निवडणूक लढवेल. तर यापूर्वी सरपंच पदासाठी काढलेले आरक्षणच कायम राहील, अशी माहिती तहसिलदारांनी दिली.