शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

ग्रामपंचायत निवडणुकीने तापविले ‘राजकारण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:07 IST

कारंजा लाड: ७ ऑक्टोबर रोजी होणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकारण चांगले तापले असल्याचे दिसून येते. 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: ७ ऑक्टोबर रोजी होणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकारण चांगले तापले असल्याचे दिसून येते. ऑक्टोबर व डिसेंबर महिन्यात मुदत संपणार्‍या  कारंजा तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला आहे. तालुक्यातील खेर्डा कारंजा, वालई, जांब, गिर्डा या चार ग्रामपंचायतची हद्दवाढ झाल्यामुळे प्रभाग रचनेत फेरबदल करणे आवश्यक आहे. ती प्रक्रिया सुरू असल्याने त्या ग्राम पंचायतीच्या प्रभागरचनेसंदर्भात आक्ष्ेाप दाखल झाल्याने या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहे. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीची नवीन तारीख निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात येईल, असे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले. या वर्षी पहिल्यादांच सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने ही निवडणूक नेमकी कशी राहील, या बाबत जनमानसात संभ्रम दिसून येत आहे. यापूर्वी नगर परिषदेसाठी याच नियमावर आधारित नगराध्यपदाची निवड थेट जनतेतून घेण्यात आली. त्यावेळी पूर्वी काढलेले आरक्षण रद्द करून व संभाव्य सदस्यांच्या संख्येत एकाची वाढ करून नगराध्यक्ष पदाची निवडणुक थेट उमेदवारांनी लढविली. त्याच पृष्ठभूमीवर ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक लढविली जाईल की त्यात काही फेरबदल होईल, या बाबत मतदार संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येते. ७ ऑक्टोबरला मतदान होत असून, त्याकरिता १५ ते २२ सष्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.  ९ ऑक्टोबर रेाजी मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात येईल. निवडणूक असलेल्या गावागावात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून, गाव पुढारी मोर्चेबांधणीच्या कामाला आहे. यावर्षी पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने सरपंच पदासाठी खर्चाची र्मयादा निश्‍चित केली असून, त्यासाठी शैक्षणिक पात्रता ही निश्‍चित केल्याने यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत येईल, अशी चिन्हे आहेत. ग्रामपंचायत सदस्य पदाची निवडणूक पुढार्‍यांच्या तोंडपाठ असली तरी सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने मतदारासोबत पुढार्‍यातही याबाबत संभ्रम अवस्था दिसून येत आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.  याबाबत तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सदस्य संख्या कायम राहून सरपंच पदासाठी स्वतंत्र उमेदवार निवडणूक लढवेल. तर यापूर्वी सरपंच पदासाठी काढलेले आरक्षणच कायम राहील, अशी माहिती तहसिलदारांनी दिली.