शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

शासकीय यंत्रणा ‘बेफिकीर’

By admin | Updated: June 24, 2015 01:54 IST

मुदतबाह्य अग्नी अवरोधक यंत्र ; शासकीय वसाहतीत यंत्रांना कुलूप.

वाशिम : आगीच्या संभाव्य आपत्तीवर वेळीच नियंत्रण म्हणून प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये बसविण्यात आलेले 'अग्नी अवरोधक यंत्र' वर्षानुवर्षे मुदतबाह्य अवस्थेतच राहत असल्याचे धक्कादायक वास्तव 'लोकमत'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये २३ जून रोजी कैद झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात १९ मे २0१५ रोजी मुदत संपलेले यंत्र आढळून आले, तर शासकीय निवासस्थानी २00७ पासून या यंत्रांचे 'रिफिलिंग'च करण्यात आले नसल्याचेही चव्हाट्यावर आले. २0१२-१३ या सत्रात मंत्रालयातील इमारतीला आग लागल्याच्या पृष्ठभूमीवर राज्यातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसरात ह्यअग्नी अवरोधक यंत्रह्ण बसविण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. किरकोळ स्वरूपाच्या आगीपासून महत्त्वाच्या दस्तऐवजाची होणारी राखरांगोळी रोखणे हा यामागील प्रमुख उद्देश होता. यानुषंगाने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद या प्रमुख कार्यालयांसह प्रत्येक शासकीय कार्यालयात 'अग्नी अवरोधक यंत्र' बसविण्यात आले होते. आग विझविण्याची क्षमता कायम राहण्यासाठी प्रत्येक वर्षी या यंत्रांचे 'रिफिलिंग' करणे आवश्यक आहे; मात्र मुदत संपल्यानंतरही कित्येक दिवस, महिने 'रिफिलिंग'च केली जात नसल्याची बाब २३ जून रोजी 'लोकमत'च्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान समोर आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अग्नी अवरोधक यंत्राची मुदत १९ मे २0१५ रोजी संपली आहे, तर अधिकारी-कर्मचार्‍यांच्या शासकीय निवासस्थानी बसविण्यात आलेल्या अग्नी अवरोधक यंत्रांकडे २00७ नंतर जबाबदार यंत्रणेने ढुंकूनही पाहिले नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले. शासकीय निवासस्थानी असलेले काही अग्नी अवरोधक यंत्र कुलुपबंद असल्याचेही आढळून आले. अग्नी अवरोधक यंत्रांच्या रिफिलिंगसाठी निधीची स्वतंत्र तरतुद नसल्याची माहितीही 'स्टिंग'दरम्यान समोर आली.