शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

शासकीय यंत्रणा ‘बेफिकीर’

By admin | Updated: June 24, 2015 01:54 IST

मुदतबाह्य अग्नी अवरोधक यंत्र ; शासकीय वसाहतीत यंत्रांना कुलूप.

वाशिम : आगीच्या संभाव्य आपत्तीवर वेळीच नियंत्रण म्हणून प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये बसविण्यात आलेले 'अग्नी अवरोधक यंत्र' वर्षानुवर्षे मुदतबाह्य अवस्थेतच राहत असल्याचे धक्कादायक वास्तव 'लोकमत'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये २३ जून रोजी कैद झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात १९ मे २0१५ रोजी मुदत संपलेले यंत्र आढळून आले, तर शासकीय निवासस्थानी २00७ पासून या यंत्रांचे 'रिफिलिंग'च करण्यात आले नसल्याचेही चव्हाट्यावर आले. २0१२-१३ या सत्रात मंत्रालयातील इमारतीला आग लागल्याच्या पृष्ठभूमीवर राज्यातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसरात ह्यअग्नी अवरोधक यंत्रह्ण बसविण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. किरकोळ स्वरूपाच्या आगीपासून महत्त्वाच्या दस्तऐवजाची होणारी राखरांगोळी रोखणे हा यामागील प्रमुख उद्देश होता. यानुषंगाने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद या प्रमुख कार्यालयांसह प्रत्येक शासकीय कार्यालयात 'अग्नी अवरोधक यंत्र' बसविण्यात आले होते. आग विझविण्याची क्षमता कायम राहण्यासाठी प्रत्येक वर्षी या यंत्रांचे 'रिफिलिंग' करणे आवश्यक आहे; मात्र मुदत संपल्यानंतरही कित्येक दिवस, महिने 'रिफिलिंग'च केली जात नसल्याची बाब २३ जून रोजी 'लोकमत'च्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान समोर आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अग्नी अवरोधक यंत्राची मुदत १९ मे २0१५ रोजी संपली आहे, तर अधिकारी-कर्मचार्‍यांच्या शासकीय निवासस्थानी बसविण्यात आलेल्या अग्नी अवरोधक यंत्रांकडे २00७ नंतर जबाबदार यंत्रणेने ढुंकूनही पाहिले नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले. शासकीय निवासस्थानी असलेले काही अग्नी अवरोधक यंत्र कुलुपबंद असल्याचेही आढळून आले. अग्नी अवरोधक यंत्रांच्या रिफिलिंगसाठी निधीची स्वतंत्र तरतुद नसल्याची माहितीही 'स्टिंग'दरम्यान समोर आली.