शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

मानवी जीवनात सत्कर्म सर्वश्रेष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:40 IST

श्री संत निवृतिनाथ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काजळेश्वर येथे तीन दिवसीय प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पहिले हरिकीर्तन ...

श्री संत निवृतिनाथ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काजळेश्वर येथे तीन दिवसीय प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पहिले हरिकीर्तन करताना गोपाल महाराजांनी कर्मयोग, प्रारब्ध आणि संचित यावर भाष्य करताना मानवी जीवनात कर्माचे महत्त्व विशद केले. कर्म दोन प्रकारचे आहेत. चांगले आणि वाईट. जसे पेराल, तसेच उगवेल, जसे कर्म कराल, तसेच त्याचे फळ असेल, असे भाविकांना पटवून देताना काही कर्मांचे फळ लगेच मिळते, काही कर्मांचे फळ उशिरा, तर काही कर्माचे फळ दुसऱ्या जन्मात मिळते. जसे विस्तवाला हात लागला तर चटका ताबडतोब लागतो. अपराध, गुन्हा केला, तर त्याचे फळ काही दिवसांनी मिळते. बँकेत अनामत रक्कम ठेवली, तर दामदुप्पट काही वर्षांनी मिळते, तसेच काही कर्मांचे फळ दुसऱ्या जन्मात मिळते. जसे भीष्माचार्य शरशय्येवर सहा महिने होते. भगवान कृष्णांनी केलेल्या आदेशानुसार हे त्यांना मिळालेले मागील जन्माच्या कर्माचे फळ होते. म्हणजेच कर्माचे फळ मिळतेच. म्हणूनच मानवी जीवनात चांगलेच कर्म करावे म्हणजे मानवी जीवन सफल होईल. चांगले कर्म करा, कष्ट करा, मेहनत करा म्हणजे जीवन सफल होईल, परमेश्वर चांगल्या कर्मात साथ देईल, असे मौलिक विचार गोपाल महाराजांनी उपस्थित भाविकांसमोर मांडले. संस्थानकडून शरद महाराज गोरले आणि गोपाल महाराज यांचा संदीप उपाध्ये यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.