शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

मानवी जीवनात सत्कर्म सर्वश्रेष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:40 IST

श्री संत निवृतिनाथ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काजळेश्वर येथे तीन दिवसीय प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पहिले हरिकीर्तन ...

श्री संत निवृतिनाथ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काजळेश्वर येथे तीन दिवसीय प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पहिले हरिकीर्तन करताना गोपाल महाराजांनी कर्मयोग, प्रारब्ध आणि संचित यावर भाष्य करताना मानवी जीवनात कर्माचे महत्त्व विशद केले. कर्म दोन प्रकारचे आहेत. चांगले आणि वाईट. जसे पेराल, तसेच उगवेल, जसे कर्म कराल, तसेच त्याचे फळ असेल, असे भाविकांना पटवून देताना काही कर्मांचे फळ लगेच मिळते, काही कर्मांचे फळ उशिरा, तर काही कर्माचे फळ दुसऱ्या जन्मात मिळते. जसे विस्तवाला हात लागला तर चटका ताबडतोब लागतो. अपराध, गुन्हा केला, तर त्याचे फळ काही दिवसांनी मिळते. बँकेत अनामत रक्कम ठेवली, तर दामदुप्पट काही वर्षांनी मिळते, तसेच काही कर्मांचे फळ दुसऱ्या जन्मात मिळते. जसे भीष्माचार्य शरशय्येवर सहा महिने होते. भगवान कृष्णांनी केलेल्या आदेशानुसार हे त्यांना मिळालेले मागील जन्माच्या कर्माचे फळ होते. म्हणजेच कर्माचे फळ मिळतेच. म्हणूनच मानवी जीवनात चांगलेच कर्म करावे म्हणजे मानवी जीवन सफल होईल. चांगले कर्म करा, कष्ट करा, मेहनत करा म्हणजे जीवन सफल होईल, परमेश्वर चांगल्या कर्मात साथ देईल, असे मौलिक विचार गोपाल महाराजांनी उपस्थित भाविकांसमोर मांडले. संस्थानकडून शरद महाराज गोरले आणि गोपाल महाराज यांचा संदीप उपाध्ये यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.