शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

मानवी जीवनात सत्कर्म सर्वश्रेष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:40 IST

श्री संत निवृतिनाथ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काजळेश्वर येथे तीन दिवसीय प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पहिले हरिकीर्तन ...

श्री संत निवृतिनाथ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काजळेश्वर येथे तीन दिवसीय प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पहिले हरिकीर्तन करताना गोपाल महाराजांनी कर्मयोग, प्रारब्ध आणि संचित यावर भाष्य करताना मानवी जीवनात कर्माचे महत्त्व विशद केले. कर्म दोन प्रकारचे आहेत. चांगले आणि वाईट. जसे पेराल, तसेच उगवेल, जसे कर्म कराल, तसेच त्याचे फळ असेल, असे भाविकांना पटवून देताना काही कर्मांचे फळ लगेच मिळते, काही कर्मांचे फळ उशिरा, तर काही कर्माचे फळ दुसऱ्या जन्मात मिळते. जसे विस्तवाला हात लागला तर चटका ताबडतोब लागतो. अपराध, गुन्हा केला, तर त्याचे फळ काही दिवसांनी मिळते. बँकेत अनामत रक्कम ठेवली, तर दामदुप्पट काही वर्षांनी मिळते, तसेच काही कर्मांचे फळ दुसऱ्या जन्मात मिळते. जसे भीष्माचार्य शरशय्येवर सहा महिने होते. भगवान कृष्णांनी केलेल्या आदेशानुसार हे त्यांना मिळालेले मागील जन्माच्या कर्माचे फळ होते. म्हणजेच कर्माचे फळ मिळतेच. म्हणूनच मानवी जीवनात चांगलेच कर्म करावे म्हणजे मानवी जीवन सफल होईल. चांगले कर्म करा, कष्ट करा, मेहनत करा म्हणजे जीवन सफल होईल, परमेश्वर चांगल्या कर्मात साथ देईल, असे मौलिक विचार गोपाल महाराजांनी उपस्थित भाविकांसमोर मांडले. संस्थानकडून शरद महाराज गोरले आणि गोपाल महाराज यांचा संदीप उपाध्ये यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.