शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

रुग्णालयात जातोय; अंत्यसंस्काराला जातोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:43 IST

वाशिम : केवळ अत्यावश्यक सेवेसाठी महामंडळाच्या एसटी बसेस सुरू आहे. परजिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांची नोंदणी केल्या जात आहे. यावेळी सर्व ...

वाशिम : केवळ अत्यावश्यक सेवेसाठी महामंडळाच्या एसटी बसेस सुरू आहे. परजिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांची नोंदणी केल्या जात आहे. यावेळी सर्व प्रवासी रुग्णालयात जातोय, अंत्यसंस्काराला जातोय, नातेवाईक भरती आहे, अशी कारणे सांगत आहे. यावेळी प्रवाशांजवळ अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र नसल्यास प्रवासासाठी मनाई करण्यात येते, असे आगारप्रमुखांनी सांगितले.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत संचारबंदीची सुधारित नियमावली जिल्ह्यात १५ मे पर्यंत लागू करण्यात आली आहे. यामध्ये महामंडळाची एसटी बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एसटी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे. तरी परजिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात अत्यावश्यक कामानिमित्त अनेकजण येत आहेत. परजिल्ह्यातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची बसस्थानकावर नोंदणी करण्यात येत आहे. यादरम्यान या प्रवाशांकडून जिल्ह्यात येण्याची कारणे विचारण्यात येतात. यामध्ये बहुतांश प्रवासी हे आरोग्याची कारणे पुढे करीत आहेत. कोणाला रुग्णालयात जायचे आहे, तर कोणाला अंत्यसंस्काराला जायचे आहे. या प्रवाशांच्या गृह विलगीकरणाविषयी अद्याप यंत्रणेला कुठलीही माहिती नाही.

--बॉक्स--

आगारात शुकशुकाट

प्रवासी संख्या कमी असल्याने जिल्ह्यात दैनंदिन केवळ ६-८ बसेस बसस्थानकातून सुटत आहे; मात्र बसस्थानकात प्रवासी नसल्याने शुकशुकाट पहावयास मिळतो. बसेसची संख्या कमी करून फक्त ६ ते ८ बसेस सोडण्यात येतात. यामध्येही प्रवासी संख्या कमी असते.

--बॉक्स--

प्रवासी घालतात वाद

एसटी बसची सेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू आहे; मात्र अनेक प्रवासी हे खासगी कारणानिमित्त जिल्ह्याबाहेर प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले. यावेळेस त्यांना विचारणा केल्यास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घालतात.

--बॉक्स--

तीच ती कारणे

अत्यावश्यक सेवेसाठी बसमधून परजिल्ह्यात प्रवास करण्यास मुभा आहे. परंतू, त्यासाठी ठाेस कारण आवश्यक आहे. दवाखाना आणि अंत्यसंस्कार ही कारणे बहुतांश प्रवाशांकडून सांगितली जात असल्याचे दिसून येते. नातेवाइक दाखल असल्याने त्यांना भेटण्यासाठी जात असल्याचेही कारण समोर करण्यात येते. इ पास ची मागणी केल्यानंतर ज्यांच्याकडे इ पास नसतो, ते मात्र कर्मचाऱ्यांशी वाद घालत अंत्यसंस्कार व दवाखान्याचे कारण सांगून प्रवास करू देण्याचा आग्रह धरतात. मात्र, परजिल्ह्यात जाण्यासाठी इ पास आवश्यक असल्याने त्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. अत्यावश्यक सेवेत न बसणाऱ्या प्रवाशांना समजविण्यासाठी बस चालक-वाहकाला या होमगार्डची मदत घ्यावी लागत आहे.

--बॉक्स--

लांब पल्ल्याच्या बसेस बंद

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महामंडळाकडून जिल्ह्यातून पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक , शिर्डी या लांब पल्ल्याच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत.