शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

रुग्णालयात जातोय; अंत्यसंस्काराला जातोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:43 IST

वाशिम : केवळ अत्यावश्यक सेवेसाठी महामंडळाच्या एसटी बसेस सुरू आहे. परजिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांची नोंदणी केल्या जात आहे. यावेळी सर्व ...

वाशिम : केवळ अत्यावश्यक सेवेसाठी महामंडळाच्या एसटी बसेस सुरू आहे. परजिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांची नोंदणी केल्या जात आहे. यावेळी सर्व प्रवासी रुग्णालयात जातोय, अंत्यसंस्काराला जातोय, नातेवाईक भरती आहे, अशी कारणे सांगत आहे. यावेळी प्रवाशांजवळ अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र नसल्यास प्रवासासाठी मनाई करण्यात येते, असे आगारप्रमुखांनी सांगितले.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत संचारबंदीची सुधारित नियमावली जिल्ह्यात १५ मे पर्यंत लागू करण्यात आली आहे. यामध्ये महामंडळाची एसटी बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एसटी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे. तरी परजिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात अत्यावश्यक कामानिमित्त अनेकजण येत आहेत. परजिल्ह्यातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची बसस्थानकावर नोंदणी करण्यात येत आहे. यादरम्यान या प्रवाशांकडून जिल्ह्यात येण्याची कारणे विचारण्यात येतात. यामध्ये बहुतांश प्रवासी हे आरोग्याची कारणे पुढे करीत आहेत. कोणाला रुग्णालयात जायचे आहे, तर कोणाला अंत्यसंस्काराला जायचे आहे. या प्रवाशांच्या गृह विलगीकरणाविषयी अद्याप यंत्रणेला कुठलीही माहिती नाही.

--बॉक्स--

आगारात शुकशुकाट

प्रवासी संख्या कमी असल्याने जिल्ह्यात दैनंदिन केवळ ६-८ बसेस बसस्थानकातून सुटत आहे; मात्र बसस्थानकात प्रवासी नसल्याने शुकशुकाट पहावयास मिळतो. बसेसची संख्या कमी करून फक्त ६ ते ८ बसेस सोडण्यात येतात. यामध्येही प्रवासी संख्या कमी असते.

--बॉक्स--

प्रवासी घालतात वाद

एसटी बसची सेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू आहे; मात्र अनेक प्रवासी हे खासगी कारणानिमित्त जिल्ह्याबाहेर प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले. यावेळेस त्यांना विचारणा केल्यास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घालतात.

--बॉक्स--

तीच ती कारणे

अत्यावश्यक सेवेसाठी बसमधून परजिल्ह्यात प्रवास करण्यास मुभा आहे. परंतू, त्यासाठी ठाेस कारण आवश्यक आहे. दवाखाना आणि अंत्यसंस्कार ही कारणे बहुतांश प्रवाशांकडून सांगितली जात असल्याचे दिसून येते. नातेवाइक दाखल असल्याने त्यांना भेटण्यासाठी जात असल्याचेही कारण समोर करण्यात येते. इ पास ची मागणी केल्यानंतर ज्यांच्याकडे इ पास नसतो, ते मात्र कर्मचाऱ्यांशी वाद घालत अंत्यसंस्कार व दवाखान्याचे कारण सांगून प्रवास करू देण्याचा आग्रह धरतात. मात्र, परजिल्ह्यात जाण्यासाठी इ पास आवश्यक असल्याने त्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. अत्यावश्यक सेवेत न बसणाऱ्या प्रवाशांना समजविण्यासाठी बस चालक-वाहकाला या होमगार्डची मदत घ्यावी लागत आहे.

--बॉक्स--

लांब पल्ल्याच्या बसेस बंद

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महामंडळाकडून जिल्ह्यातून पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक , शिर्डी या लांब पल्ल्याच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत.