शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोरोना लसीकरणाविषयी घरोघरी जाऊन माहिती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:41 IST

वाशिम : जिल्ह्यात ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील दीर्घ आजार असलेल्या व्यक्ती आणि ६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक ...

वाशिम : जिल्ह्यात ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील दीर्घ आजार असलेल्या व्यक्ती आणि ६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवर ही लस मोफत असून याबाबतची माहिती लसीकरणास पात्र व्यक्तींना घरोघरी जाऊन द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या. दुरदृष्य प्रणालीद्वारे २० मार्च रोजी आयोजित सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून कोरोना लसीकरण, कोरोना चाचण्याविषयी करण्यात येत असलेले प्रयत्न, त्यांना येणाऱ्या अडचणी याविषयी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी म्हणाले, ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील दीर्घ आजार असलेल्या व्यक्ती आणि ६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देऊन त्यांना कोरोना संसर्गापासून सुरक्षा देणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम अधिक गतिमान करावी लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, कारंजा उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे शासकीय लसीकरण केंद्र सुरु आहे. या सर्व केंद्रांवरील लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. याकरिता शहरी व ग्रामीण भागातील जनजागृतीवर विशेष भर द्यावा.

ग्रामीण भागामध्ये लसीकरणास पात्र व्यक्तींच्या गावनिहाय याद्या तयार करून आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन त्यांना लसीकरणाचे महत्व सांगून लस घेण्याचे आवाहन करावे. प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात फ्लेक्स, पोस्टर लावून, दवंडी देवून लसीकरणाबाबत माहिती देण्याचे नियोजन संबंधित गट विकास अधिकारी, ग्राम विकास अधिकारी यांनी करावे. प्रत्येक तालुकास्तरीय यंत्रणेने आपल्या कार्यक्षेत्रातील व्यक्तींचे जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार काम करावे. विशेषतः ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत या मोहिमेची माहिती पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. तसेच गेल्या सात दिवसांत कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी सर्व क्षेत्रीय यंत्रणांनी चांगले काम केले असून कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सुद्धा असेच प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोहिते म्हणाले, प्रत्येक गावामध्ये दवंडीच्या माध्यमातून लोकांना लसीकरणाविषयी माहिती द्यावी. तसेच गावातील मुख्य चौक अथवा ठिकाणी पोस्टर लावून जनजागृती करावी. या कामामध्ये संबंधित गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना सुद्धा सहभागी करून घ्यावे, असे त्यांनी सांगितले.