शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘तीच ती’ कारणे देणे ५१३ जणांना भोवले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:40 IST

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ९ मे पासून कडक निर्बंध लागू केले असून, अत्यावश्यक कारणाशिवाय रस्त्यावर ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ९ मे पासून कडक निर्बंध लागू केले असून, अत्यावश्यक कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस यंत्रणेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. दवाखाना, मेडिकलमध्ये जात आहे, अंत्यसंस्कारासाठी जात आहे, अशी तीच ती कारणे देताना ठोस पुरावा देऊ न शकणाऱ्या ५१३ जणांवर गत दोन दिवसांत दंडात्मक कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली असून, या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा आलेख चढताच असल्याने ही साखळी तोडण्यासाठी ९ मे पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. १५ मे पर्यंत कडक निर्बंध लागू राहणार असून, या दरम्यान मेडिकल, दवाखाने, अंत्यसंस्कार आदी अत्यावश्यक कारणाशिवाय कुणीही रस्त्यावर विनाकारण फिरू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. या निर्देशाची प्रभावी अंमलबजावणी म्हणून वाशिम शहरात प्रमुख चौकांत बंदोबस्त तैनात करण्यात आला. सकाळच्या सुमारास वाहनचालकांची कसून चौकशी केली जात असून, ठोस कारण आढळून आले नाही तर दंडात्मक कारवाई केली जाते. गत दोन दिवसांत या मोहिमेदरम्यान ५१३ जणांनी दवाखाना, मेडिकलचे खोटे कारण देत कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला. दवाखाना, मेडिकलच्या कागदपत्रांची मागणी करीत पोलिसांनी त्यांचा हा खोटारडेपणा हाणून पाडला. जवळपास ७३ हजाराचा दंड ठोठावला असून, अत्यावश्यक कारणाशिवााय कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस यंत्रणेने केले.