शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

घरकुल योजनेला ‘अर्थ’कारणाची झालर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2015 03:01 IST

वाशिम जिल्हय़ात ६६१९ घरकुल मंजूर : कर्मचारी-पदाधिका-यांचा हस्तक्षेप वाढला.

संतोष वानखडे/ वाशिम : जिल्हय़ात बेघरांसाठी जवळपास ६६१९ घरकुल मंजूर झालेली आहेत; मात्र गावपातळीवरील कर्मचारी व पदाधिकार्‍यांच्या ह्यअर्थह्णकारणाने घरकुल योजनेवरही गैरप्रकाराचा ठपका बसण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. दारिद्रय़रेषेखालील अनेक कुटुंबाना राहण्यासाठी निवारा नाही. अशा बेघर कुटुंबांचे घरांचे स्वप्न साकारण्यासाठी राज्य शासनाने इंदिरा आवास योजना अमलात आणली आहे. दारिद्रय़रेषा यादीतील गुणांकानुसार लाभार्थी निवडीची प्रक्रिया राबविली जाते. राहायला घर नाही, बांधायला पैसा नाही, अशा बेघर व अत्यल्प उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांला या योजनेत प्राधान्यक्रम दिला जातो. जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने (डीआरडीए) दोन महिन्यांपूर्वी लाभार्थी निवडीची प्रक्रिया पूर्ण केली असून, आता बांधकामाने वेग घेतला आहे; मात्र या योजनेला अर्थकारण आणि श्रेय घेण्याची किनार लाभत असल्याने लाभार्थ्यांची गोची होत आहे. गावपातळीवरील अनेक पदाधिकार्‍यांनी निवड यादी पाहून लाभार्थ्यांनी गाठण्याचा जणू सपाटाच लावला आहे. दारिद्रय़रेषा यादीच्या गुणांकानुसार लाभार्थ्यांची निवड झालेली असतानाही, मीच तुझे घरकुल मंजूर केले, साहेबांना काहीतरी द्यावे लागते, असे म्हणून अनेक जण लाभार्थींची लुबाडणूक करण्यासाठी दुकान थाटून बसल्याचे प्रकार लाभार्थ्यांच्या तक्रारीहून समोर येत आहेत. घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी अनेकांनी पात्र लाभार्थ्यांना डावलून चुकीच्या पद्धतीने दारिद्रय़रेषा यादीत कमी गुणांकन दाखविण्याचे प्रताप केल्याचीही माहिती आहे. मंगरुळपीर तालुक्यात तर जिवंत महिलेला मृत दाखविण्यापर्यंतही कर्मचार्‍यांनी मजल गाठल्याचे प्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आले.