शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

गावरान आंबा हद्दपार !

By admin | Updated: May 12, 2014 23:20 IST

रसाळीही दुर्मीळ झाली आहे.

वाशिम : उन्हाळा आला की, आठवण होते ती आंब्याची! हा आंबा म्हणजे आजच्या मार्केटिंगच्या युगातील एक्सपोर्ट केलेला आंबा नव्हे तर गावरान आंब्याची. मात्र हा गावरान आंबा आज हद्दपार झाल्याचे चित्र असून, रसाळीही दुर्मीळ झाली आहे. पूर्वी उन्हाळ्यात पाहुण्यासाठी खास आंब्याच्या रसाचा पाहुणचार व्हायचा, सकाळी न्याहारीसाठी आंबा, दुपारच्या जेवणाबरोबरही आंबा असायचा. त्याला कारणही तसेच होते. प्रत्येकाच्या शेतात एकतरी आंब्याचे झाड असायचे तर प्रत्येक गावात चारासह आमराई (एकाच शेतात आंब्याची अनेक झाडे ) असायच्या. या आमराईमुळे गावात घराघरांत आंबे असायचे. ज्यांच्याकडे शेती नाही अशा शेतमजुरांची घरेसुद्धा आंब्यांनी भरलेली असायची. वेगवेगळ्या चवीच्या या रसभरित आंब्यामुळे ग्रामीण भागात चंगळ असायची. पाहुण्यांसाठी हमखास आमरस असायचा. नववधू किंवा नवीन जावई बापूंना आंब्याचा रस, कांद्याची भाजी व घरी तयार केलेल्या खारुडी, कुरडईचा पाहुणचार म्हणजे खाणारा खूश व खाऊ घालणाराही खूश. मात्र, अलीकडे गावरान आंबा दुर्मीळ होत चाललाय. आमराई नष्ट झाल्या, बाजारात गावरान आंबा दिसेनासा झाला. त्यामुळे गावरान आंब्याची चवही दुर्मीळ झाली. आज मार्केटिंगचा जमाना आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून बाजारात आंबा येतो. या आंब्याला कृत्रिमरीत्या पिकवून पिवळा केल्या जाते. मात्र, गावरान आंब्याची चव त्याला मुळीच नसते. गावरान आंबे का नष्ट झाले. ग्रामीण भागात आंब्याच्या झाडांची संख्या थोड्या बहुत प्रमाणात आजही आहे. पण आंब्याला फुलोरा येण्यास सुरुवात होते त्यावेळीच आभाळ आणि वातावरण बदलीमुळे तो जळतो. लहान कैरी असल्याने वानरांना जंगलात खाण्यासाठी एकमेव कैरीच असते. वार्‍या वादळाने आंब्याचा फुलोरा व छोट्या कैर्‍या पडतात. पर्यायाने आंब्याच्या उत्पन्नात घट होत आहे.पूर्वी आंब्याच्या खाल्लेल्या कोयासुद्धा फायद्याच्या ठरत. चांगल्या आंब्याच्या कोया जपून ठेवल्या जात होत्या. मग घरीच पिकलेल्या आंब्याच्या झाडाची रोपे मोठी करून शेतात पावसाळ्यात लावत. त्याला संरक्षण देत व योग्य ती काळजी घेतली जाई. आंबा पिकविण्यासाठी गवत पेरत त्या गवतात कैर्‍या झाकल्या जायाच्या. आंबे पिकविण्यासाठी मोठ-मोठे गोठे, गोडावून असत. त्यामध्ये आंबे पिकवल्या जायचे. आज गोडावूनही दिसत नाही व आंबेही.