शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

उद्याने झाली भकास; स्वराज्य संस्था करेनात विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST

वाशिम शहराच्या मध्यभागी नगर परिषदेने लोकमान्य टिळक उद्यानाची निर्मिती केली. यात सन १९८५ साली तत्कालीन खासदार गुलाम नबी ...

वाशिम शहराच्या मध्यभागी नगर परिषदेने लोकमान्य टिळक उद्यानाची निर्मिती केली. यात सन १९८५ साली तत्कालीन खासदार गुलाम नबी आझाद यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले; परंतु दुर्लक्ष होत असल्याने हे उद्यान भकास झाले आहे. कारंजा पालिकेनेही १९८५ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष शशिकांत चवरे यांच्या कार्यकाळात भगवान महावीर उद्यान विकसित केले. चार एकर जागेतील या उद्यानात आकर्षक फुलझाडे, लहान बालकांसाठी घसरगुंडी, कारंजी, खेळणी, नागरिकांना बसण्याची व्यवस्था होती. या उद्यानाची देखभाल झाली नाही. परिणामी तेही भकास झाले असून, हे उद्यान तर गुरे चराईचे गायरानच बनले आहे. मंगरुळपीर शहरातही नगर परिषदेने महात्मा फुले उद्यानाच्या निर्मितीला १९९० च्या दशकात सुरुवात केली; परंतु अंतर्गत रस्ते आणि कुंपण भिंतीच्या पुढे या उद्यानाचे काम आजवरही गेलेच नाही. सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून येथे वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

००००००००००००००००

तीन शहरांत सुविधाच नाही

वाशिम, कारंजा आणि मंगरुळपीर पालिकेने अस्तित्वात असलेल्या उद्यानांची दखल घेतली नाहीच, तर मालेगाव, मानोरा आणि रिसोड शहरांत स्थानिक स्वराज्य संस्थांनी ही सुविधाच उपलब्ध केली नाही. त्यामुळे स्वराज्य संस्थांच्या मानसिकतेची प्रचिती येते.

०००००००००००००००

नवे पर्यायही नाहीत

एकीकडे शहरात अस्तित्वात असलेल्या उद्यानांची देखभाल स्थानिक स्वराज्य संस्थांनी न केल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे, तर दुसरे कोणते पर्यायही जनतेच्या विरंगुळ्यासाठी कोणत्याच शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपलब्ध करण्याची तसदीही अद्याप घेतली नाही.

००००००००००

वाशिमच्या टेम्पल गार्डनचे काम चौकशीच्या कचाट्यात

वाशिम शहरातील लोकमान्य टिळक उद्यानाचा विकास पालिकेला करता आला नाहीच उलट शहरातील नागरिकांसाठी प्रस्तावित केलेले आणि अर्धवटच असलेले टेम्पल गार्डनचे कामही चौकशीच्या कचाट्यात सापडले आहे.

००००००००००००००००

कोट: महावीर उद्यानाची दुरुस्ती किंवा त्यातील साधनांची डागडुजी हा विषय आता शक्यच नाही. त्यामुळे या उद्यानाची हरितपट्टा योजनेतून पुनर्निर्मितीच करण्यात येणार आहे. आमदार राजेंद्र पाटणी यांनी कुंपणासाठी १३ लाखांचा निधीही मंजूर केला असून, इतर कामांसाठी आणखी ६४ लाख रुपये निधी खर्च होईल.

- दादाराव डोल्हारकर,

मुख्याधिकारी, कारंजा

०००००००००००

कोट: लोकमान्य टिळक उद्यानाच्या विकासाबाबत अद्याप कोणता प्रस्ताव नाही. तथापि, या जागेत सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचा मानस आहे. शिवाय शहराच्या मध्यवर्ती भागातच टेम्पल गार्डनसह इतर सोयी-सुविधांचे कामही सुरू आहे. ही कामे लवकरच पूर्ण केली जातील.

- दीपक मोरे,

मुख्याधिकारी, वाशिम