शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

८५ ग्रामपंचायत भवनसाठी निधी मिळाला; बांधकाम केव्हा होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:34 IST

संतोष वानखडे वाशिम : जिल्ह्यातील १०२ पैकी ८५ ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र इमारतींसाठी (ग्रामपंचायत भवन) शासनाकडून निधी मिळून सहा महिन्यांचा कालावधी ...

संतोष वानखडे

वाशिम : जिल्ह्यातील १०२ पैकी ८५ ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र इमारतींसाठी (ग्रामपंचायत भवन) शासनाकडून निधी मिळून सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप बांधकामाला सुरुवात नाही. स्वतंत्र इमारतीअभावी या ग्रामपंचायतींचा कारभार भाडेतत्त्वावरील इमारतीतून सुरू असून पावसाळ्याच्या दिवसात ‘दप्तर’ सांभाळताना ग्रामसेवकांची कसरत होत आहे.

जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, १०२ ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत नाही. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर अन्य कर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून वसूल केले जातात. स्वतंत्र इमारती नसल्याने या ग्रामपंचायतीचा कारभार भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू आहे. स्वतंत्र इमारत नसल्याने ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड जतन करताना ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची गैरसोय होते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने काही ठिकाणी इमारतीत पाणी गळती होत असल्याने महत्त्वाचे दस्तऐवज भिजण्याची भीतीही कर्मचाऱ्यांमधून वर्तविली जात आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारती नसल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. स्वतंत्र इमारत व परिसरात नसल्याने मासिक सभा, ग्रामसभा नेमक्या कुठे घ्याव्यात, असाही पेच निर्माण होतो. जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारतीसाठी निधी मिळावा, याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. डिसेंबर २०२० मध्ये ८५ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाला शासनाकडून मंजुरी मिळाली तर फेब्रुवारी २०२१ दरम्यान निधी मिळाला. परंतु, अद्याप बांधकामाला सुरुवात होऊ शकली नाही. लवकरच बांधकामाला सुरुवात होईल, असे सांंगण्यात येत आहे.

००००००००००००००००

नागरतास येथे कार्यालय नाही

मालेगाव तालुक्यातील नागरतास येथील ग्रामपंचायतीला कार्यालयच नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार कसा चालवावा, असा पेच निर्माण होतो. स्वतंत्र कार्यालय केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा कायम आहे.

००००००००००००००००

कोट

८५ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामांना मंजुरी व निधी मिळालेला आहे. तालुकास्तरीय यंत्रणेकडे निधी सुपूर्ददेखील करण्यात आला. लवकरच बांधकामाला सुरुवातदेखील होईल.

- विवेक बोंद्रे

प्रभारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)

जिल्हा परिषद वाशिम

.......

कोट बॉक्स

प्रत्येक ग्रामपंचायतीला हक्काचे स्वतंत्र कार्यालय असावे, अशी संघटनेची मागणी आहे. स्वतंत्र कार्यालय असेल तर मासिक सभा घेणे सुलभ होते, तसेच महत्त्वाचे दस्तऐवज ठेवण्याची व्यवस्थाही होते.

- अरुण इंगळे

जिल्हा सचिव,

ग्रामसेवक संघटना, वाशिम