शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

रिक्त पदांमुळे कामकाजात व्यत्यय

By admin | Updated: July 3, 2017 02:29 IST

जिल्हा परिषद : विभाग प्रमुखांची अर्ध्यापेक्षा अधिक पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: वाशिम जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांची अर्ध्यापेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने कामकाजात व्यत्यय निर्माण झाला आहे. तब्बल १० विभाग प्रमुख ‘प्रभारी’ आहेत.ग्रामीण भागाचा कारभार हाकण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची त्रिस्तरीय आखणी केली आहे. त्यात प्रत्येक यंत्रणेला महत्त्वाचे स्थान आहे. शासन आणि ग्रामपंचायतीत महत्त्वाचा दुवा म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. जिल्हा परिषदेत पंचायत, सामान्य प्रशासन, वित्त, भूजल व सर्वेक्षण विभाग, कृषी, पशुसंवर्धन, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम, लघुसिंचन, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, जिल्हा पाणी व स्वच्छता, रोजगार हमी योजना असे १५ विभाग आहेत. त्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी केली जाते. वाशिम जिल्हा परिषदेत विभाग प्रमुखांची पदे रिक्त असल्याचा परिणाम कामकाजावर होत असून, अनेक विकासात्मक कामे रखडलेली आहेत तर काही कामांचे ‘रिझल्ट’ अपेक्षेप्रमाणे येत नसल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या पंचायत विभागाची रिक्त पदामुळे मोठी ‘पंचायत’ झाली आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांची बदली झाल्यापासून या विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. समाजकल्याण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग, पंचायत विभाग, जिल्हा स्वच्छता कक्ष, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, लघुसिंचन विभाग, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कक्ष, कृषी विभाग, शिक्षण विभाग या दहा विभागातील विभाग प्रमुख पदाचा प्रभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी रवींद्र येवले तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन.डी. शिंदे यांचीदेखील बदली झालेली आहे; मात्र अद्याप त्यांच्या जागेवर कुणीही आले नसल्याने तूर्तास त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद यांची अमरावती येथे बदली झाल्याने त्यांच्या जागेवर संजय कापडनीस रुजू झाले आहेत. कापडनीस यांनी यापूर्वी जळगाव (खान्देश) महानगरपालिकेत आयुक्त म्हणून सेवा दिलेली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकपददेखील रिक्तच आहे. विभागप्रमुखांची पदेच रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजाच्या गतीला आपसूकच ‘ब्रेक’ लागत आहेत. याशिवाय वर्ग तीन व चारच्या रिक्त पदांचा अनुशेष कायमच आहे. वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांची पदे भरण्याची मागणी जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे वारंवार केली आहे; मात्र ही बाब शासनाने अद्याप गांभीर्याने घेतली नसल्याने कमी मनुष्यबळावर मिनी मंत्रालयाचा ‘डोलारा’ सांभाळण्याची कसरत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करावी लागत आहे.