शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘पांगरी पॅटर्न’ वापरून वाशिम जिल्हा टँकरमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:29 IST

मंगरूळपीर : तालुक्यातील पांगरी महादेव या गावात ज्याप्रमाणे सूक्ष्म पाणलोटाचे काम सुरू आहे, त्याप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र असे काम करून ...

मंगरूळपीर : तालुक्यातील पांगरी महादेव या गावात ज्याप्रमाणे सूक्ष्म पाणलोटाचे काम सुरू आहे, त्याप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र असे काम करून वाशीम जिल्हा टँकरमुक्त करा, अशा सूचना केंद्रीय रस्ते विकास व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दुर्गम व उपेक्षित पांगरी ( महादेव ) या लोकवस्तीमधील लोकसहभागाने निर्माण झालेल्या तलावाचे २७ मे रोजी पांगरीवासीयांसोबत झालेल्या आभासी सभेत लोकार्पण करताना केल्यात.

यावेळी श्रमदानातून केल्या जाणाऱ्या पांदन रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. जिल्ह्यातील जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी उपेक्षित व मागासलेले गावे दत्तक घेऊन कार्यरत असतात. गेल्या सात महिन्यापासून अत्यंत दुर्लक्षित वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात पांगरी (महादेव) या लोकवस्तीमध्ये कार्यरत आहे. जलविभाजक रेषा (divide line or water shade) असलेल्या भू-क्षेत्रातील लोकसंख्या तब्बल ८०० पेक्षा अधिक असून २१ वर्षांपासून या पांगरी ( महादेव ) लोकवस्तीला गाव म्हणून शासन दप्तरी ग्रामपंचायत नाही, ना गट ग्रामपंचायत नाही. यामुळे विकासापासून दुर्लक्षित आहे. एवढ्या मोठ्या लोकवस्तीला ग्रामपंचायत दर्जा नसल्यामुळे कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. लोकवस्तीत सर्वांत मोठा प्रश्न पाण्याचा असून एक कि.मी. अंतरावरून एका खासगी विहिरीतून पाणी आणावे लागते. गावात अति कॅल्शियमयुक्त पाणी असल्यामुळे सहा रुग्णाचे मूत्रपिंड निकामी होऊन मृत्यू पावले, तर सात रुग्ण मुत्रपिंडाच्या आजाराने डायलिसिसवर आहे. ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून सचिन कुळकर्णी यांनी या भटक्या विमुक्त समुदाय असलेल्या वनग्राम पांगरीमध्ये कार्यरत होऊन पुढाकार घेतला. लोकवस्तीमध्ये स्वहक्काचे मुबलक पाणी असल्यास विकासाला गती प्राप्त होते, हा सिद्धांत गावकऱ्यात पटवून सूक्ष्म उपपाणलोट राबविण्याचा संकल्प केला. पहिली पायरी म्हणून लोकसहभागातून १०० बाय १०० बाय ३ मीटरचा भव्य गावतलाव पडीक जमिनीवर निर्माण केला. नुकत्याच अचानक काही मिनिटे झालेल्या अवकाळी पावसामुळे, खोलीकरण-रुंदीकरण झालेल्या नाल्यात तुडुंब पाणी भरल्याने गावकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. नवनिर्माण केलेल्या तलावाचे लोकार्पण, श्रमदानातून होणाऱ्या पांदन रस्त्यांचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते केल्या गेले. या कार्याला दत्ताजी जामदार, माधव कोटस्थाने, व्ही. डी. पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी भरीव सहकार्य केले आहे. आभासी सभेद्वारे जेव्हा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला तेव्हा गावकऱ्यांचा आनंद पारावर उरला नव्हता.