शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कोरोनाकाळात २.२५ लाख गोरगरिबांना मोफत अन्नधान्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:43 IST

वाशिम : कोरोनाकाळात गोरगरिबांची गैरसोय होऊ नये याकरिता केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मे, जून या दोन महिन्यांसाठी ...

वाशिम : कोरोनाकाळात गोरगरिबांची गैरसोय होऊ नये याकरिता केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मे, जून या दोन महिन्यांसाठी रेशनचे मोफत धान्य वितरित केले जाणार आहे. जिल्ह्यातील २.२५ लाख लाभार्थींसाठी ५० हजार क्विंटल धान्य टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहे.

गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. गतवर्षी संपूर्ण लॉकडाऊन असल्याने केंद्र शासनाने तीन महिन्यांच्या कालावधीसाठी अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना रेशनचे मोफत धान्य वितरित केले होते. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. एप्रिल महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने गोरगरीब लाभार्थींची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाने एका महिन्यासाठी मोफत धान्य देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी १ मे पासून सुरू केली. याच धर्तीवर केंद्र शासनातर्फेदेखील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील कुटुंबांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी एक किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत २ लाख २५ हजार ९२० कार्डधारकांना ४९ हजार ५०० क्विंटल धान्य उपलब्ध केले जाणार आहे.

०००

बॉक्स...

१२ दुकानांचे परवाने रद्द

जिल्ह्यात ७७६ रेशन दुकाने आहेत. यापैकी १२ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. रद्द करण्यात आलेल्या दुकानांच्या लाभार्थींच्या शिधापत्रिका जवळच्या रेशन दुकानाला जोडण्यात आल्यामुळे कोणताही लाभार्थी हा धान्यापासून वंचित राहणार नाही, असा दावा जिल्हा पुरवठा विभागाने केला आहे.

०००००

कार्डधारकांची एकूण संख्या २,२५,९२०

अंत्योदय ४८,२९३

प्राधान्य कुटुंब १७,७,६२७

००००००

मोफत धान्यासाठी लाभार्थींचा अंगठा नाही

कोरोनाकाळात ऑनलाइन पद्धतीने रेशनचे धान्य वितरित झाले तर कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन महिने ‘ई-पॉस’वर केवळ संबंधित दुकानदाराचा अंगठा घेऊन लाभार्थींना धान्य वाटप केले जाणार आहे, असे जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले.

०००००

कोट

जिल्ह्यात ७७६ रेशन दुकाने असून, यापैकी १२ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मे, जून या दोन महिन्यांसाठी रेशनचे मोफत धान्य वितरित केले जाणार आहे.

- सुनील विंचनकर

जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम

००००

कोट

केंद्र शासनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या तांदळाचा कोटा कमी करून त्याऐवजी एखाद्या डाळीचा किंवा साखरेचा समावेश केला तर लाभार्थींसाठी ही बाब अधिक फायदेशीर ठरेल. धान्याचा दर्जा हा उत्कृष्ट असायला हवा.

-गौतम भगत

लाभार्थी