शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कोरोनाकाळात २.२५ लाख गोरगरिबांना मोफत अन्नधान्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:43 IST

वाशिम : कोरोनाकाळात गोरगरिबांची गैरसोय होऊ नये याकरिता केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मे, जून या दोन महिन्यांसाठी ...

वाशिम : कोरोनाकाळात गोरगरिबांची गैरसोय होऊ नये याकरिता केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मे, जून या दोन महिन्यांसाठी रेशनचे मोफत धान्य वितरित केले जाणार आहे. जिल्ह्यातील २.२५ लाख लाभार्थींसाठी ५० हजार क्विंटल धान्य टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहे.

गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. गतवर्षी संपूर्ण लॉकडाऊन असल्याने केंद्र शासनाने तीन महिन्यांच्या कालावधीसाठी अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना रेशनचे मोफत धान्य वितरित केले होते. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. एप्रिल महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने गोरगरीब लाभार्थींची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाने एका महिन्यासाठी मोफत धान्य देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी १ मे पासून सुरू केली. याच धर्तीवर केंद्र शासनातर्फेदेखील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील कुटुंबांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी एक किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत २ लाख २५ हजार ९२० कार्डधारकांना ४९ हजार ५०० क्विंटल धान्य उपलब्ध केले जाणार आहे.

०००

बॉक्स...

१२ दुकानांचे परवाने रद्द

जिल्ह्यात ७७६ रेशन दुकाने आहेत. यापैकी १२ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. रद्द करण्यात आलेल्या दुकानांच्या लाभार्थींच्या शिधापत्रिका जवळच्या रेशन दुकानाला जोडण्यात आल्यामुळे कोणताही लाभार्थी हा धान्यापासून वंचित राहणार नाही, असा दावा जिल्हा पुरवठा विभागाने केला आहे.

०००००

कार्डधारकांची एकूण संख्या २,२५,९२०

अंत्योदय ४८,२९३

प्राधान्य कुटुंब १७,७,६२७

००००००

मोफत धान्यासाठी लाभार्थींचा अंगठा नाही

कोरोनाकाळात ऑनलाइन पद्धतीने रेशनचे धान्य वितरित झाले तर कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन महिने ‘ई-पॉस’वर केवळ संबंधित दुकानदाराचा अंगठा घेऊन लाभार्थींना धान्य वाटप केले जाणार आहे, असे जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले.

०००००

कोट

जिल्ह्यात ७७६ रेशन दुकाने असून, यापैकी १२ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मे, जून या दोन महिन्यांसाठी रेशनचे मोफत धान्य वितरित केले जाणार आहे.

- सुनील विंचनकर

जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम

००००

कोट

केंद्र शासनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या तांदळाचा कोटा कमी करून त्याऐवजी एखाद्या डाळीचा किंवा साखरेचा समावेश केला तर लाभार्थींसाठी ही बाब अधिक फायदेशीर ठरेल. धान्याचा दर्जा हा उत्कृष्ट असायला हवा.

-गौतम भगत

लाभार्थी