शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

उद्यापासून सुरू होणार मोफत प्रवेश प्रक्रिया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:27 IST

वाशिम : अनलॉकच्या टप्प्यात आरटीई अंतर्गतची मोफत प्रवेश प्रक्रियाही निकाली निघाली असून, लॉटरी पद्धतीतून निवड झालेल्या बालकांना ११ जूनपासून ...

वाशिम : अनलॉकच्या टप्प्यात आरटीई अंतर्गतची मोफत प्रवेश प्रक्रियाही निकाली निघाली असून, लॉटरी पद्धतीतून निवड झालेल्या बालकांना ११ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात येतात. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दिव्यांग गटातील बालकांना पहिल्या वर्गात २५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्यासाठी चालू शैक्षणिक सत्रात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील १०३ शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी ७१८ जागा राखीव आहेत. ७ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या पहिल्या लॉटरी पद्धतीत १११९ अर्जातून ६३० बालकांची निवड झाली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे प्रवेश प्रक्रिया ठप्प होती. आता अनलॉक झाल्याने मोफत प्रवेश प्रक्रियाही निकाली निघाली आहे. ११ जून २०२१ पासून शाळांनी पालकांना प्रवेशाकरिता पोर्टलवर तारीख द्यावी लागणार आहे. त्यानुसार बालकांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी पालकांना आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे. प्रवेश घेण्याकरिता २० दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे.

०००००००

एक नजर प्रवेश प्रक्रियेवर

एकूण शाळा १०३

राखीव जागा ७१८

प्राप्त अर्ज १११९

विद्यार्थी निवड ६३०

००००००००

बॉक्स

शाळेच्या प्रवेशद्वारावर सूचना फलक झळकणार !

जिल्ह्यात आरटीई अंतर्गत एकूण १०३ शाळांची नोंदणी झाली आहे. ११ जूनपासून संबंधित शाळांना निवड झालेल्या बालकांना प्रवेश देण्यासाठी पोर्टलवर तारीख द्यावी लागणार आहे. आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश सुरू झाले आहेत, असे सूचना फलक शाळेच्या प्रवेशद्वारावर लावण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार शाळांना प्रवेशद्वारावर सूचना फलक लावावे लागणार आहे.

०००००००

बॉक्स

शाळा व निवासस्थानादरम्यानच्या अंतराची पडताळणी

बरेच पालक शाळेत प्रवेश मिळावा यासाठी आरटीई प्रवेश फॉर्म भरताना चुकीचे अंतर दाखवित असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे कागदपत्रांवरून शाळा व निवासी पत्त्याच्या अंतराची पडताळणी करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्या. चुकीचे अंतर दाखविल्याचे निदर्शनास आल्यास शाळेने तात्पुरता प्रवेश देऊ नये. अशा पालकांना तालुकास्तरीय समिती किंवा शिक्षणाधिकारी यांचेकडे अर्ज करण्यास सांगावे, अशा सूचनाही शाळांना देण्यात आल्या.

००००

कोट बॉक्स

अनलॉकच्या टप्प्यात ११ जूनपासून मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यात आरटीई अंतर्गत १०३ शाळांची नोंदणी झाली आहे. पहिल्या लॉटरी पद्धतीत जिल्ह्यातील ६३० बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. शाळांना संबंधित पालकांना प्रवेशाबाबत तारीख द्यावी लागणार आहे.

- अंबादास मानकर

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम