शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये कोरोना संसर्गात चौपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:38 IST

जिल्ह्यात २ एप्रिल २०२० ते २ एप्रिल २०२१ या वर्षभराच्या कालावधीत १६६९९ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी १३ हजार ...

जिल्ह्यात २ एप्रिल २०२० ते २ एप्रिल २०२१ या वर्षभराच्या कालावधीत १६६९९ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी १३ हजार ८५२ व्यक्तींनी कोरोनावर मात केली तर १८८ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत असून, अद्यापही २६५८ व्यक्ती कोरोना उपचाराखाली आहेत. त्यात यंदा जानेवारी महिन्यानंतर कोरोना संसर्गाची लाटच जिल्ह्यात उसळली असून, फेब्रुवारी महिन्यात एकूण १७९० व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला, तर मार्च महिन्यात ही संख्या चौपटीने वाढून ७१४१ वर पोहोचली. त्यात वाशिम, रिसोड आणि मंगरुळपीर तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षणीय असल्याने आरोग्य विभागावरील ताण वाढला आहे.

--------

तीन तालुक्यांत प्रमाण अधिक

जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होऊ लागला. त्यात सुरुवातीला कारंजा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली; परंतु गत १० दिवसांपासून कारंजातील बाधितांचे प्रमाण कमी होत असून, वाशिम, मंगरुळपीर आणि रिसोड तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे.

-----------------

आठवडाभरात २७०५ लोकांना कोरोना

गेल्या आठवडाभरात २७ मार्च ते २ एप्रिलपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यातील २७०५ व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले, तर याच कालावधीत १८५९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. अर्थात जिल्ह्यात कोरोना संसर्गातून बरे होण्याच्या तुलनेत कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.

-----------

आठवडाभरातील स्थिती

तारीख बाधितांची संख्या बरे झालेल्यांची संख्या

(एप्रि ०२) - ३०६ -------------३०१

(एप्रिल ०१) - २२७८ -------------२०८

(मार्च ३१) - २१० -------------२४२

(मार्च ३०) - ३४२ -------------३५२

( मार्च २९) - २६९ -------------३७७

(मार्च २८) - २४७ -------------३२७

(मार्च २७) - २०७ -------------५७५