शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये कोरोना संसर्गात चौपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:38 IST

जिल्ह्यात २ एप्रिल २०२० ते २ एप्रिल २०२१ या वर्षभराच्या कालावधीत १६६९९ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी १३ हजार ...

जिल्ह्यात २ एप्रिल २०२० ते २ एप्रिल २०२१ या वर्षभराच्या कालावधीत १६६९९ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी १३ हजार ८५२ व्यक्तींनी कोरोनावर मात केली तर १८८ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत असून, अद्यापही २६५८ व्यक्ती कोरोना उपचाराखाली आहेत. त्यात यंदा जानेवारी महिन्यानंतर कोरोना संसर्गाची लाटच जिल्ह्यात उसळली असून, फेब्रुवारी महिन्यात एकूण १७९० व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला, तर मार्च महिन्यात ही संख्या चौपटीने वाढून ७१४१ वर पोहोचली. त्यात वाशिम, रिसोड आणि मंगरुळपीर तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षणीय असल्याने आरोग्य विभागावरील ताण वाढला आहे.

--------

तीन तालुक्यांत प्रमाण अधिक

जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होऊ लागला. त्यात सुरुवातीला कारंजा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली; परंतु गत १० दिवसांपासून कारंजातील बाधितांचे प्रमाण कमी होत असून, वाशिम, मंगरुळपीर आणि रिसोड तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे.

-----------------

आठवडाभरात २७०५ लोकांना कोरोना

गेल्या आठवडाभरात २७ मार्च ते २ एप्रिलपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यातील २७०५ व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले, तर याच कालावधीत १८५९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. अर्थात जिल्ह्यात कोरोना संसर्गातून बरे होण्याच्या तुलनेत कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.

-----------

आठवडाभरातील स्थिती

तारीख बाधितांची संख्या बरे झालेल्यांची संख्या

(एप्रि ०२) - ३०६ -------------३०१

(एप्रिल ०१) - २२७८ -------------२०८

(मार्च ३१) - २१० -------------२४२

(मार्च ३०) - ३४२ -------------३५२

( मार्च २९) - २६९ -------------३७७

(मार्च २८) - २४७ -------------३२७

(मार्च २७) - २०७ -------------५७५