शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

वन व्यवस्थापन समित्या उरल्या नावापुरत्याच!

By admin | Updated: October 17, 2016 02:14 IST

वाशिम जिल्हय़ात ५८ हजार ५८९ हेक्टर क्षेत्र वनाच्छादित; ८६ पैकी ५७ समित्या पडल्या बंद .

वाशिम, दि. १६- 'वन संपत्तीची सुरक्षा करा व मिळणारा नफा वाटून घ्या', हे सूत्र अंगीकारून कधीकाळी उदयास आलेल्या जिल्हय़ातील ८६ पैकी ५७ संयुक्त वन व्यवस्थापन समित्या आजमितीस बंद पडल्या आहेत. परिणामी, वनाच्छादित ५८ हजार ५८९ हेक्टर क्षेत्राच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वन परिक्षेत्रातील गावांचा सर्वांगीण विकास व पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या मूळ उद्देशातून सन २00३ पासून महाराष्ट्र शासनाने संयुक्त वन व्यवस्थापन समित्या गठित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, वाशिम जिल्हय़ात ८६ समित्यांचे गठन करण्यात आले. त्यात वाशिम-रिसोड २२, मालेगाव १७, कारंजा-मंगरूळपीर १६ आणि मानोरा वन परिक्षेत्रात ३१ समित्या कार्यान्वित करण्यात आल्या; मात्र आजमितीस यातील केवळ २९ समित्याच कार्यान्वित असून उर्वरित ५७ समित्यांचे कामकाज पूर्णत: थांबले आहे. संयुक्त वन व्यवस्थापनाच्या माध्यमातून ज्यांची उपजीविका वनांवर अवलंबून आहे, असे गावातील लोक व वन विभाग. यांच्याद्वारे सयुक्तिक वन क्षेत्रावरील नफा, जबाबदारी, सुरक्षा आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेणे आदी कामांची विभागणी केली जाते. या समित्यांनी वनांचे संरक्षण करणे व अवैध वृक्षतोड, वन क्षेत्रातील अतिक्रमण, वन वणवा, अवैध चराई आदीस प्रतिबंध घालणे गरजेचे आहे. स्वत:कडे वर्ग केलेल्या वनांचे व्यवस्थापन करणे, ग्रामीण जनतेमध्ये वनांच्या महत्त्वाविषयी जागृती निर्माण करणे, हे संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे आद्य कर्तव्य आहे; मात्र जिल्हय़ातील ८६ पैकी तब्बल ५७ समित्यांचे कार्य मंदावल्यामुळे मूळ उद्देशांना ठायीठायी तडे पोहचत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. संत तुकाराम वन ग्राम योजनेत जिल्हय़ाचे अपयशसंत तुकाराम महाराजांच्या नावाने राज्यभरात ह्यसंत तुकाराम वन ग्राम योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत ज्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्या सहभागी होतात, त्यांच्यामधून जिल्हा स्तरावरील तीन, तसेच राज्य स्तरावरील तीन उत्कृष्ट ठरणार्‍या समित्यांना संत तुकाराम वन ग्राम उत्कृष्ट संयुक्त वन व्यवस्थापन समिती पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. वाशिम जिल्हय़ात मात्र या पुरस्कार योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. वाशिम वनपरिक्षेत्रात केवळ इलखी येथील वन व्यवस्थापन समितीने जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला.