शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वन व्यवस्थापन समित्या उरल्या नावापुरत्याच!

By admin | Updated: October 17, 2016 02:14 IST

वाशिम जिल्हय़ात ५८ हजार ५८९ हेक्टर क्षेत्र वनाच्छादित; ८६ पैकी ५७ समित्या पडल्या बंद .

वाशिम, दि. १६- 'वन संपत्तीची सुरक्षा करा व मिळणारा नफा वाटून घ्या', हे सूत्र अंगीकारून कधीकाळी उदयास आलेल्या जिल्हय़ातील ८६ पैकी ५७ संयुक्त वन व्यवस्थापन समित्या आजमितीस बंद पडल्या आहेत. परिणामी, वनाच्छादित ५८ हजार ५८९ हेक्टर क्षेत्राच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वन परिक्षेत्रातील गावांचा सर्वांगीण विकास व पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या मूळ उद्देशातून सन २00३ पासून महाराष्ट्र शासनाने संयुक्त वन व्यवस्थापन समित्या गठित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, वाशिम जिल्हय़ात ८६ समित्यांचे गठन करण्यात आले. त्यात वाशिम-रिसोड २२, मालेगाव १७, कारंजा-मंगरूळपीर १६ आणि मानोरा वन परिक्षेत्रात ३१ समित्या कार्यान्वित करण्यात आल्या; मात्र आजमितीस यातील केवळ २९ समित्याच कार्यान्वित असून उर्वरित ५७ समित्यांचे कामकाज पूर्णत: थांबले आहे. संयुक्त वन व्यवस्थापनाच्या माध्यमातून ज्यांची उपजीविका वनांवर अवलंबून आहे, असे गावातील लोक व वन विभाग. यांच्याद्वारे सयुक्तिक वन क्षेत्रावरील नफा, जबाबदारी, सुरक्षा आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेणे आदी कामांची विभागणी केली जाते. या समित्यांनी वनांचे संरक्षण करणे व अवैध वृक्षतोड, वन क्षेत्रातील अतिक्रमण, वन वणवा, अवैध चराई आदीस प्रतिबंध घालणे गरजेचे आहे. स्वत:कडे वर्ग केलेल्या वनांचे व्यवस्थापन करणे, ग्रामीण जनतेमध्ये वनांच्या महत्त्वाविषयी जागृती निर्माण करणे, हे संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे आद्य कर्तव्य आहे; मात्र जिल्हय़ातील ८६ पैकी तब्बल ५७ समित्यांचे कार्य मंदावल्यामुळे मूळ उद्देशांना ठायीठायी तडे पोहचत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. संत तुकाराम वन ग्राम योजनेत जिल्हय़ाचे अपयशसंत तुकाराम महाराजांच्या नावाने राज्यभरात ह्यसंत तुकाराम वन ग्राम योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत ज्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्या सहभागी होतात, त्यांच्यामधून जिल्हा स्तरावरील तीन, तसेच राज्य स्तरावरील तीन उत्कृष्ट ठरणार्‍या समित्यांना संत तुकाराम वन ग्राम उत्कृष्ट संयुक्त वन व्यवस्थापन समिती पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. वाशिम जिल्हय़ात मात्र या पुरस्कार योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. वाशिम वनपरिक्षेत्रात केवळ इलखी येथील वन व्यवस्थापन समितीने जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला.