शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

पायउतार जिल्हा परिषद सदस्य न्यायालयात धाव घेणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:16 IST

वाशिम : सर्वोच्च न्यायालयाच्या ४ मार्च रोजीच्या निकालानुसार जिल्ह्यातील १४ जिल्हा परिषद सर्कल व १९ पंचायत समिती गणांमधील सदस्य ...

वाशिम : सर्वोच्च न्यायालयाच्या ४ मार्च रोजीच्या निकालानुसार जिल्ह्यातील १४ जिल्हा परिषद सर्कल व १९ पंचायत समिती गणांमधील सदस्य पदांवरून पायउतार झाले. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करूनच रितसर निवडणूक लढली. यात आमचा दोष काय, असा प्रश्न उपस्थित करून संबंधित जि.प., पं.स. सदस्य लवकरच सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. त्यानुषंगाने दिल्ली, मुंबईच्या वकिलांशी सातत्याने चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

जानेवारी २०२० मध्ये जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद सर्कल व १०४ पंचायत समिती गणांमध्ये निवडणूक घेण्यात आली. त्यात १४ जिल्हा परिषद सर्कल ओबीसी प्रवर्गाकरिता राखीव होते. दरम्यान, आसेगाव सर्कलमधून चंद्रकांत ठाकरे यांनी विजय मिळविला. यांसह कंझरा सर्कलमधून सुनीता कोठाळे, दाभा - दिलीप मोहनावाले, काटा - विजय खानझोडे, पार्डी टकमोर - सरस्वती चौधरी, उकळीपेन - चरण गोटे, कवठा - स्वप्निल सरनाईक, गोभणी - पूजा भुतेकर, भर जहागिर - उषा गरकळ, कुपटा - उमेश ठाकरे, फुलउमरी - सुनीता चव्हाण, पांगरी नवघरे - रत्नमाला उंडाळ, भामदेवी - प्रमोद लळे आणि तळप बु. सर्कलमधून शोभा गावंडे यांनी निवडणुकीत यश मिळवून जिल्हा परिषदेत ‘एण्ट्री’ केली. यातील चंद्रकांत ठाकरे हे जि.प. अध्यक्षपद; तर विजय खानझोडे आणि शोभा गावंडे या दोघांनी सभापतीपद भुषविले. अशात ४ मार्च रोजी धडकलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सर्वच सदस्यांवर पायउतार होण्याची वेळ ओढवली.

राज्य निवडणूक आयोगाने ५ मार्च रोजी दिलेल्या निर्देशांचे पालन करून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सर्व सदस्यांना नोटीस बजावून ४ मार्चपासूनच जागा रिक्त झाल्याचे जाहीर केले व तसा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची अंतिम मुदत १९ मार्च असून, पायउतार झालेल्या जिल्हा परिषद सदस्य त्यापूर्वी न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. त्यानुषंगाने विविध स्वरूपातील मुद्यांवर दिल्ली व मुंबईच्या वरिष्ठ वकिलांशी सातत्याने चर्चादेखील सुरू असल्याची माहिती मिळाली.

...............

कोट :

निवडणूक आयोगाने काढलेल्या नोटीफिकेशनचे पालन करून तथा रिक्त जागांवरच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांनी निवडणूक लढली. असे असताना अचानक ओबीसींच्या जागा रिक्त ठरवून संबंधित सर्वच सदस्यांना पायउतार करण्यात आले. हा एकप्रकारे अन्याय असून, नागपूर व धुळे येथील ओबीसी सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. वाशिम जिल्ह्याची याचिकाही लवकरच न्यायालयात दाखल होईल. त्यानुषंगाने आवश्यक मुद्यांचा सारासार विचार सुरू आहे.

- चंद्रकांत ठाकरे

ओबीसी सदस्य तथा तत्कालिन जि.प. अध्यक्ष, वाशिम.