शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

अडाण प्रकल्पामुळे बाधित पाच गावांचा प्रश्न ‘जैसे थे’!

By admin | Updated: April 18, 2017 01:20 IST

प्रकल्पाच्या पाण्याचा फायदा यवतमाळ जिल्ह्याला

वाशिम : मानोरा तालुक्यातील अडाण मध्यम प्रकल्पासाठी घोटी, वाघोळा, म्हसणी, तोरणाळा आणि दिघी या पाच गावांचे पुनर्वसन करण्यात आले; परंतु त्याबदल्यात मिळणाऱ्या अनेक सुविधांपासून या गावातील प्रकल्पबाधित नागरिक व शेतकरी अद्याप वंचित आहेत. जिल्ह्यात १२२ लघू आणि तीन मध्यम प्रकल्प आहेत; मात्र मानोरा तालुक्यात येणारा अडाण प्रकल्प नावापुरताच असून या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा यवतमाळ जिल्ह्यातील गावांना होतो. या प्रकल्पामुळे मानोरा तालुक्यातील तोरणाळा, म्हसणी आणि वाघोळा या तीन गावांमधील शेतजमिनी संपादित करण्यात आल्या. तसेच गावांचेही पुनर्वसन करण्यात आले. दिघी आणि घोटी या गावांचे शंभर टक्के पुनर्वसन झाले; तर घोटी या गावाला जमदरा या गावात समाविष्ट करण्यात आले. म्हसणी हे गाव अडाण प्रकल्पाच्या भिंतीलगत होते. त्या भिंतीला तडे जात असल्याने प्रकल्प फुटण्याच्या भूतीपोटी म्हसणी गावाचे १९८४ मध्ये पुनर्र्वसन झाले. या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या प्रकल्पात कवडीमोल भावात संपादित करण्यात आल्या; मात्र म्हसणीसह इतर चार गावे विकासापासून अद्याप वंचित आहेत. याशिवाय अडाण नदीवरचा प्रकल्प वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात उभारण्यात आला असला तरी, त्याचा अधिक फायदा यवतमाळ जिल्ह्यातील गावांनाच होतो. त्यामुळे प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे. जलसंपदा विभागाने यावर प्रभावी तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.