शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

अडाण प्रकल्पामुळे बाधित पाच गावांचा प्रश्न ‘जैसे थे’!

By admin | Updated: April 18, 2017 01:20 IST

प्रकल्पाच्या पाण्याचा फायदा यवतमाळ जिल्ह्याला

वाशिम : मानोरा तालुक्यातील अडाण मध्यम प्रकल्पासाठी घोटी, वाघोळा, म्हसणी, तोरणाळा आणि दिघी या पाच गावांचे पुनर्वसन करण्यात आले; परंतु त्याबदल्यात मिळणाऱ्या अनेक सुविधांपासून या गावातील प्रकल्पबाधित नागरिक व शेतकरी अद्याप वंचित आहेत. जिल्ह्यात १२२ लघू आणि तीन मध्यम प्रकल्प आहेत; मात्र मानोरा तालुक्यात येणारा अडाण प्रकल्प नावापुरताच असून या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा यवतमाळ जिल्ह्यातील गावांना होतो. या प्रकल्पामुळे मानोरा तालुक्यातील तोरणाळा, म्हसणी आणि वाघोळा या तीन गावांमधील शेतजमिनी संपादित करण्यात आल्या. तसेच गावांचेही पुनर्वसन करण्यात आले. दिघी आणि घोटी या गावांचे शंभर टक्के पुनर्वसन झाले; तर घोटी या गावाला जमदरा या गावात समाविष्ट करण्यात आले. म्हसणी हे गाव अडाण प्रकल्पाच्या भिंतीलगत होते. त्या भिंतीला तडे जात असल्याने प्रकल्प फुटण्याच्या भूतीपोटी म्हसणी गावाचे १९८४ मध्ये पुनर्र्वसन झाले. या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या प्रकल्पात कवडीमोल भावात संपादित करण्यात आल्या; मात्र म्हसणीसह इतर चार गावे विकासापासून अद्याप वंचित आहेत. याशिवाय अडाण नदीवरचा प्रकल्प वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात उभारण्यात आला असला तरी, त्याचा अधिक फायदा यवतमाळ जिल्ह्यातील गावांनाच होतो. त्यामुळे प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे. जलसंपदा विभागाने यावर प्रभावी तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.