शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाचपैकी चार वीज उपकेंद्रांची कामे रेंगाळली!

By admin | Updated: July 2, 2016 00:06 IST

इन्फ्रा-२ ची कामे धिम्या गतीने; १0५0 पैकी कार्यान्वित झाले केवळ ४७३ रोहित्र.

वाशिम : विजेसंदर्भातील पायाभूत सुविधा योजनेंतर्गत (इन्फ्रा-२) जिल्ह्यात ५ वीज उपकेंद्र उभारली जाणार आहेत. मात्र, गेल्या दीड वर्षाच्या काळात त्यापैकी केवळ एकच उपकेंद्र उभे करण्यात महावितरणला यश मिळाले. यासह इतरही अनेक कामे रेंगाळल्याने महावितरणप्रती जनतेतून रोष व्यक्त होत आहे. सद्या पावसाळा सुरू झाला असून खरिप हंगामातील पेरणी आणि त्यानंतर शेतांमध्ये पीके उभी होणार असल्याने किमान चार ते पाच महिने महावितरणला ह्यइन्फ्रा-२ह्णअंतर्गत सुरू असलेली कामे थांबवावी लागणार आहेत. त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरपासून रबी हंगामाला प्रारंभ होतो. याच हंगामातील पिकांसाठी सिंचनाची प्रभावी सोय उपलब्ध व्हावी, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा असते. मात्र, विद्यूतसंदर्भातील अनेक कामे प्रलंबित असल्याने गतवर्षीप्रमाणे याहीवर्षीच्या रबी हंगामात शेतकर्‍यांच्या शेतीला पुरेशी वीज मिळणे दुरापास्त होणार आहे. यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इन्फ्रा-२ अंतर्गत जिल्ह्यासाठी मंजूर १0२ कोटी रुपयाच्या निधीतून जिल्ह्यातील अडोळी, देगांव, शिरपूर (खंडाळा), डोंगरकिन्ही, कुर्‍हा अशा पाचठिकाणी विद्यूत उपकेंद्र उभारली जाणार आहेत. मात्र, गेल्या सव्वा ते दीड वर्षाच्या काळात यापैकी केवळ अडोळी येथील विद्यूत उपकेंद्र पूर्णत्वास गेले असून इतर चारही ठिकाणची कामे धिम्या गतीने सुरू आहेत. याशिवाय जिल्ह्यात आठठिकाणी अतिरिक्त पॉवर ट्रान्सफार्मर लावण्याचे नियोजन आहे. त्यापैकी वाशिम सिव्हील लाईन, मसलापेन, मोप आणि शेलुबाजार या चारठिकाणची कामे पूर्ण झाली; तर पोहा, काकडशिवणी, कामरगांव आणि मानोरा या चारठिकाणची कामे रखडली आहेत. इन्फ्रा-२ च्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी १0५0 रोहित्र लागणार होती. त्यापैकी आजमितीस उणेपूरे ४७३ रोहित्रांची कामे आटोपली असून इतर ५७७ रोहित्रांची कामे व्हायची बाकी आहेत. एकूणच या सर्व बाबींचा विजपुरवठय़ावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, ही गंभीर बाब लक्षात घेवून वीज वितरण विभागाने रखडलेली कामे विनाविलंब पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे.