शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

पाचपैकी चार वीज उपकेंद्रांची कामे रेंगाळली!

By admin | Updated: July 2, 2016 00:06 IST

इन्फ्रा-२ ची कामे धिम्या गतीने; १0५0 पैकी कार्यान्वित झाले केवळ ४७३ रोहित्र.

वाशिम : विजेसंदर्भातील पायाभूत सुविधा योजनेंतर्गत (इन्फ्रा-२) जिल्ह्यात ५ वीज उपकेंद्र उभारली जाणार आहेत. मात्र, गेल्या दीड वर्षाच्या काळात त्यापैकी केवळ एकच उपकेंद्र उभे करण्यात महावितरणला यश मिळाले. यासह इतरही अनेक कामे रेंगाळल्याने महावितरणप्रती जनतेतून रोष व्यक्त होत आहे. सद्या पावसाळा सुरू झाला असून खरिप हंगामातील पेरणी आणि त्यानंतर शेतांमध्ये पीके उभी होणार असल्याने किमान चार ते पाच महिने महावितरणला ह्यइन्फ्रा-२ह्णअंतर्गत सुरू असलेली कामे थांबवावी लागणार आहेत. त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरपासून रबी हंगामाला प्रारंभ होतो. याच हंगामातील पिकांसाठी सिंचनाची प्रभावी सोय उपलब्ध व्हावी, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा असते. मात्र, विद्यूतसंदर्भातील अनेक कामे प्रलंबित असल्याने गतवर्षीप्रमाणे याहीवर्षीच्या रबी हंगामात शेतकर्‍यांच्या शेतीला पुरेशी वीज मिळणे दुरापास्त होणार आहे. यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इन्फ्रा-२ अंतर्गत जिल्ह्यासाठी मंजूर १0२ कोटी रुपयाच्या निधीतून जिल्ह्यातील अडोळी, देगांव, शिरपूर (खंडाळा), डोंगरकिन्ही, कुर्‍हा अशा पाचठिकाणी विद्यूत उपकेंद्र उभारली जाणार आहेत. मात्र, गेल्या सव्वा ते दीड वर्षाच्या काळात यापैकी केवळ अडोळी येथील विद्यूत उपकेंद्र पूर्णत्वास गेले असून इतर चारही ठिकाणची कामे धिम्या गतीने सुरू आहेत. याशिवाय जिल्ह्यात आठठिकाणी अतिरिक्त पॉवर ट्रान्सफार्मर लावण्याचे नियोजन आहे. त्यापैकी वाशिम सिव्हील लाईन, मसलापेन, मोप आणि शेलुबाजार या चारठिकाणची कामे पूर्ण झाली; तर पोहा, काकडशिवणी, कामरगांव आणि मानोरा या चारठिकाणची कामे रखडली आहेत. इन्फ्रा-२ च्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी १0५0 रोहित्र लागणार होती. त्यापैकी आजमितीस उणेपूरे ४७३ रोहित्रांची कामे आटोपली असून इतर ५७७ रोहित्रांची कामे व्हायची बाकी आहेत. एकूणच या सर्व बाबींचा विजपुरवठय़ावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, ही गंभीर बाब लक्षात घेवून वीज वितरण विभागाने रखडलेली कामे विनाविलंब पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे.