शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पाचपैकी चार वीज उपकेंद्रांची कामे रेंगाळली!

By admin | Updated: July 2, 2016 00:06 IST

इन्फ्रा-२ ची कामे धिम्या गतीने; १0५0 पैकी कार्यान्वित झाले केवळ ४७३ रोहित्र.

वाशिम : विजेसंदर्भातील पायाभूत सुविधा योजनेंतर्गत (इन्फ्रा-२) जिल्ह्यात ५ वीज उपकेंद्र उभारली जाणार आहेत. मात्र, गेल्या दीड वर्षाच्या काळात त्यापैकी केवळ एकच उपकेंद्र उभे करण्यात महावितरणला यश मिळाले. यासह इतरही अनेक कामे रेंगाळल्याने महावितरणप्रती जनतेतून रोष व्यक्त होत आहे. सद्या पावसाळा सुरू झाला असून खरिप हंगामातील पेरणी आणि त्यानंतर शेतांमध्ये पीके उभी होणार असल्याने किमान चार ते पाच महिने महावितरणला ह्यइन्फ्रा-२ह्णअंतर्गत सुरू असलेली कामे थांबवावी लागणार आहेत. त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरपासून रबी हंगामाला प्रारंभ होतो. याच हंगामातील पिकांसाठी सिंचनाची प्रभावी सोय उपलब्ध व्हावी, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा असते. मात्र, विद्यूतसंदर्भातील अनेक कामे प्रलंबित असल्याने गतवर्षीप्रमाणे याहीवर्षीच्या रबी हंगामात शेतकर्‍यांच्या शेतीला पुरेशी वीज मिळणे दुरापास्त होणार आहे. यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इन्फ्रा-२ अंतर्गत जिल्ह्यासाठी मंजूर १0२ कोटी रुपयाच्या निधीतून जिल्ह्यातील अडोळी, देगांव, शिरपूर (खंडाळा), डोंगरकिन्ही, कुर्‍हा अशा पाचठिकाणी विद्यूत उपकेंद्र उभारली जाणार आहेत. मात्र, गेल्या सव्वा ते दीड वर्षाच्या काळात यापैकी केवळ अडोळी येथील विद्यूत उपकेंद्र पूर्णत्वास गेले असून इतर चारही ठिकाणची कामे धिम्या गतीने सुरू आहेत. याशिवाय जिल्ह्यात आठठिकाणी अतिरिक्त पॉवर ट्रान्सफार्मर लावण्याचे नियोजन आहे. त्यापैकी वाशिम सिव्हील लाईन, मसलापेन, मोप आणि शेलुबाजार या चारठिकाणची कामे पूर्ण झाली; तर पोहा, काकडशिवणी, कामरगांव आणि मानोरा या चारठिकाणची कामे रखडली आहेत. इन्फ्रा-२ च्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी १0५0 रोहित्र लागणार होती. त्यापैकी आजमितीस उणेपूरे ४७३ रोहित्रांची कामे आटोपली असून इतर ५७७ रोहित्रांची कामे व्हायची बाकी आहेत. एकूणच या सर्व बाबींचा विजपुरवठय़ावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, ही गंभीर बाब लक्षात घेवून वीज वितरण विभागाने रखडलेली कामे विनाविलंब पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे.