शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पाच कोटींची पेयजल योजना नेहमीच लिकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:27 IST

पाच वर्षांपूर्वी नादुरुस्त व तोकड्या स्वरूपाचा पाणीपुरवठा योजनांमुळे शिरपूर येथे मोठी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. याची दखल घेऊन ...

पाच वर्षांपूर्वी नादुरुस्त व तोकड्या स्वरूपाचा पाणीपुरवठा योजनांमुळे शिरपूर येथे मोठी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. याची दखल घेऊन तत्कालीन जि.प. सदस्य ईमदाद बागवान यांनी पाठपुरावा केल्याने शासनाने ४.८९ कोटी रुपये राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत मंजूर केले होते. सन २०१२ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले. तीनचार वर्षांत योजना पूर्ण झाली. गावाला स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा गावकऱ्यांना होती. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नळयोजनेच्या कामाने गावातील पाणीटंचाई संपुष्टात आली. मात्र, या योजनेतील पाइपलाइन ठिकठिकाणी नियमितपणे लिकेज होत आहे. त्यामुळे पिण्यायोग्य पाणी गावकऱ्यांना मिळत नाही. तसेच लिकेज दुरुस्त करण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड ग्रामपंचायतीला पडत आहे. ग्रामपंचायतीला ही योजना खर्चाला काळ ठरत आहे. तर, शिरपूरवासीयांची शुद्ध पाण्याची समस्या कायम राहत आहे.

पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय

शिरपूर येथील राष्ट्रीय योजनेमुळे गावात पाणीपुरवठा नियमित होतो; परंतु वारंवार होणाऱ्या लिकेजमुळे नळयोजनेद्वारे मिळणारे पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. योजनेची पाइपलाइन ठिकठिकाणी लिकेज होत आहे. ही बाब ग्रामपंचायतीसाठी खर्चिक ठरत आहे. लिकेजमुळे पाण्याची नासाडीसुद्धा होते.