शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत प्रथमच जिल्ह्याच्या भूजल पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST

शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून ऑक्टोबर, जानेवारी, मार्च आणि मे महिन्यात भूजल पातळी मोजली जाते. ती मोजण्यासाठी जिल्ह्यातील ...

शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून ऑक्टोबर, जानेवारी, मार्च आणि मे महिन्यात भूजल पातळी मोजली जाते. ती मोजण्यासाठी जिल्ह्यातील ७९ सर्वेक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या आहेत. जानेवारीच्या अखेर या विहिरींतील पातळीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात वाशिम तालुक्यातील ११ विहिरींची पातळी ६.१७ मीटर, मालेगाव तालुक्यातील ८ विहिरींची ५.६० मीटर, रिसोड तालुक्यातील १८ विहिरींची पातळी ६.९३ मीटर, मंगरुळपीर तालुक्यातील ११ विहिरींची पातळी ६.२५ मीटर, मानोरा तालुक्यातील १५ विहिरींची पातळी ५.१७ मीटर, तर कारंजा तालुक्यातील १६ विहिरींची पातळी ५.५३ मीटर नोंदविण्यात आली. गतवर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरच जिल्ह्यातील ७९ विहिरींची सरासरी पातळी ६.४८ मीटरपर्यंत खालावली होती; परंतु गतवर्षीच्या अर्थात २०२० च्या पावसाळ्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडल्याने जिल्ह्याच्या भूजल पातळीत ०.३७ मीटरची सुधारणा होऊन यंदा जानेवारीच्या अखेर या विहिरींची सरासरी पातळी अर्थातच जिल्ह्याची भूजल पातळी ६.११ मिटर नोंदविण्यात आली.

---------------

पातळी सुधारण्यास अद्यापही वाव

जिल्ह्याची भूजल पातळी २०१९ मध्ये १.१२ मीटरने, तर २०१८ मध्ये १.७६ मीटरने खालावली होती. जिल्ह्याचा भूस्तर बेसाल्ट खडकाने व्यापला असल्याने पावसाचे फारसे पाणी भूगर्भात झिरपत नाही. त्यात अपुरा पाऊस, कूपनलिकांचे वाढते प्रमाण, नैसर्गिक जलस्रोतावर होणारे अतिक्रमण आणि बांधकामे, तसेच जलपुनर्भरण अंमलबजावणीत होणारी कसर आदी कारणांमुळे भूजल पातळीवर परिणाम होतो. गतवर्षी दमदार पाऊस पडल्याने भूजल पातळीत सुधारणा झाली असली तरी उपरोक्त उपायांच्या अभावामुळे भूजल पातळी आणखी सुधारण्यास वाव असल्याचेही दिसत आहे.

-----------

दोन वर्षांतील तालुकानिहाय भूजल पातळी

तालुका - २०२० - २०२१ - झालेली वाढ

वाशिम - ६.४७ - ६.१७ - ०.३०

मालेगाव - ६.०० - ५.६० - ०.४०

रिसोड - ७.३० - ६.९३ - ०.३७

मं. पीर - ६.६६ - ६.२५ - ०.४१

मानोरा - ५.५२ - ५.१७ - ०.३५

कारंजा - ६.९० - ६.५३ - ०.४१

-----------

मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक वाढ

वाशिम जिल्ह्याच्या ७९ सर्वेक्षण विहिरींच्या सर्वेक्षणानुसार भूजल पातळीत गत पाच वर्षांत प्रथमच ०.३७ मीटरची वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यात मंगरुळपीर तालुक्यातील भूजल पातळीत सर्वाधिक ०.४१ मीटरची वाढ नोंदविण्यात आली आहे. सन २०१३ ते २०१८ या पाच वर्षांच्या तुलनेत २०१८ मध्ये मंगरुळपीर तालुक्यातील भूजल पातळी १.५३ मीटरने, तर २०१९ मध्ये ०.६६ मीटरने घटली होती. गतवर्षी मंगरुळपीर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत १३३ टक्के पाऊस पडला. त्याचा परिणाम होऊन भूजल पातळीत सुधारणा झाली आहे.

------------

कोट: जिल्ह्यातील ७९ सर्वेक्षण विहिरींचे सर्वेक्षण जानेवारी अखेर करण्यात आले. त्यात गत पाच वर्षांच्या तुलनेत प्रथमच जिल्ह्याच्या भूजल पातळीत सुधारणा झाली आहे. विहिरींच्या सर्वेक्षणातील नोंदीनुसार जिल्ह्याच्या भूजल पातळीत ०.३७ मीटरची वाढ झाल्याचे दिसत आहे. गतवर्षीच्या दमदार पावसासह जलसंधारणाची झालेली कामे यामुळे पातळीवर चांगला परिणाम झाला आहे. तथापि, भूजल पातळी सुधारण्यास अद्यापही खूप वाव आहे

- सुनील कडू,

वरिष्ठ भूवैज्ञानिक,

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, वाशिम