शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
3
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
4
५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!
5
IND vs SA 2nd Test : मुथुसामीची 'आउट ऑफ सिलॅबस सेंच्युरी'! पहिल्या डावात द.आफ्रिकेची मोठी धावसंख्या
6
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
7
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
8
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
9
पोलीस कॉन्स्टेबल होता ७ कोटींच्या लुटीच्या टोळीचा ट्रेनर; ३ महिन्यांचे नियोजन अन् RBI अधिकारी बनून केली लूट
10
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
11
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
12
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
13
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
14
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
16
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
17
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
18
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
19
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
20
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांच्या प्रस्तावांची छानणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 19:05 IST

वाशिम : ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना’ ही राज्य पुरस्कृत योजना सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत वाशिम जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविली जात आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी जवळपास १६ शेतकरी गटांनी अंतिम मुदतीपर्यंत प्र्रकल्प अहवाल सादर केले असून, आता तालुकास्तरावर छानणी सुरू झाली आहे. 

ठळक मुद्देकृषी विभाग गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरण योजना 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना’ ही राज्य पुरस्कृत योजना सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत वाशिम जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविली जात आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी जवळपास १६ शेतकरी गटांनी अंतिम मुदतीपर्यंत प्र्रकल्प अहवाल सादर केले असून, आता तालुकास्तरावर छानणी सुरू झाली आहे. गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना योजनेतंर्गत किमान २० शेतकºयांच्या समुहाच्या माध्यमातून किमान १०० एकर क्षेत्रावर शेतकरी गटामर्फात विविध कृषि व कृषिपुरक उपक्रम प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. या योजनेतर्गंत सामुहिक सिंचन सुविधा, सामुहिक पध्दतीने यांत्रिकीकरणाद्वारे मशागत करणे शक्य असल्याने समूह शेतीस प्राधान्य देण्यात येणार आहे. गट शेती या योजनेतंर्गंत प्रकल्प स्वरुपात उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच शेतकºयांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येईल. शेतकºयांच्या गटांना प्रगतशील क्षेत्राचे तंत्रज्ञान देण्यासाठी शेतीविषयक तांत्रिक सल्लागारांची सेवा या योजने अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सामुहिक गोठा, दुग्धप्रक्रिया, अवजारे, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन, रेशिम उद्योग, कुक्कुटपालन तसेच मागेल त्याला शेततळे, जलसंपदा विभागाकडील कामे आदी कार्यक्रम कृषि संलग्न संबंधित विभागाकडून त्या विभागाच्या प्रचलित निकषाप्रमाणे समूह गटास प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.  प्रकल्प आराखड्यात शेतकरी गटाकडील उपलब्ध साधनसामुग्री यासह जमीन सुधारणा, समतलीकरण, सामुहिक सिंचन व्यवस्था निर्मिती, यांत्रिकीकरण व तंत्रज्ञानाबाबत शेतकरी समुह गटाकडे उपलब्ध असलेली यंत्रसामुग्री व तंत्रज्ञान, सामुदायीक संकलन, प्रतवारी साठवणूक व प्रक्रिया केंद्राची निर्मिती, विपणानाबाबत शेतकरी ग्राहक शृखंला विकसित करणे, सामुहिक पशुधन व्यवस्थापन आदी बाबींचा समावेश करावा लागणार आहे. प्रकल्प आराखडा सादर करण्याची अंतिम मुदत ६ आॅक्टोंबर होती. या मुदतीपर्यंत जिल्हाभरातून १६ प्रस्ताव सादर झाले असून, तालुका कृषी अधिकारी कार्यालयस्तरावर या प्रस्तावांची छानणी सुरू झाली आहे. छानणी पूर्ण झाल्यानंतर निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.