शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

तूर मोजणीअभावी शेतकरी आर्थिक संकटात

By admin | Updated: June 13, 2017 01:21 IST

शासनाचा नाकर्तेपणा : जिल्ह्यातील टोकन दिलेल्या १७ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना तूर मोजणीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील १७ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची ४ लाख ८३ हजार क्विंटल तूर खरेदीअभावी घरात पडून आहे. असे असताना केंद्र शासनाची परवानगी नसल्यामुळे ‘नाफेड’कडून अवलंबिण्यात आलेली तूर मोजणीची प्रक्रिया १० जूनपासून बंद करण्यात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा बाजार समिती प्रशासनाने ३१ मेपर्यंत १७ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना तूर खरेदीचे टोकन दिले. त्यांची ४ लाख ८३ हजार ६५३ क्विंटल तूर ३१ मे या अंतिम मुदतीपर्यंत मोजून घेणे शक्य नसल्यामुळे शासनाने या प्रक्रियेस आणखी मुदतवाढ प्रदान केली; मात्र ‘नाफेड’ने अंगीकारलेले चालढकलपणाचे धोरण शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत ढकलणारे ठरत असून, १० जूनपासून केंद्र शासनाची परवानगी नसल्यामुळे तूर खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. परिणामी, वाशिम बाजार समितीने १५ मे ते ३० मे या कालावधीत ८ हजार शेतकऱ्यांना टोकन दिले. प्रत्यक्षात सोमवारपर्यंत त्यापैकी केवळ ६५० शेतकऱ्यांचीच तूर खरेदी करण्यात आली असून, उर्वरित ७ हजार ३५० शेतकऱ्यांची दीड लाखांपेक्षा अधिक तूर अद्याप घरातच पडून आहे. रिसोड येथे नाफेड केंद्रावर तुरीची एकूण आवक १ लाख २३ हजार ५० क्विंटल होती. त्यापैकी १७ मे ते ३० मे या कालावधीत उण्यापुऱ्या १८० शेतकऱ्यांची ३३८४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची एक लाख क्विंटलच्या आसपास तूर खरेदी करणे अद्याप बाकी आहे. कारंजाच्या नाफेड केंद्रावर ३० मेपर्यंत ३,३३९ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. त्यापैकी अडीच हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची ६० हजार क्विंटल तूर खरेदी करण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. मंगरूळपीर येथे ३,९३३ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत २७ हजार ६४५ क्विंटल तूर मोजणी झाली आहे. अद्याप ६० हजार क्विंटल तूर मोजणी शिल्लक आहे. मालेगाव येथे ३,७२० शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले होते. ८० हजार क्विंटल तुरीची नोंद झाली. त्यापैकी २००० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. उर्वरित ७८ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. तथापि, ‘नाफेड’ने अंगीकारलेल्या थंडपणाच्या धोरणामुळे शेतकरी हैराण झाले असून, १० जूनपासून तूर खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये अधिकच भर पडली आहे. तुरीसंदर्भातील ही स्थिती अशीच कायम राहिल्यास आगामी ७ ते ८ महिनेदेखील संपूर्ण तूर मोजून घेणे शक्य होणार नसल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांचा जीव लागला टांगणीला!जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून ३१ मेपर्यंत टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची संख्या १७ हजारांपेक्षा अधिक असताना नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर ९ जूनपर्यंत दैनंदिन केवळ ४० शेतकऱ्यांची तूर मोजल्या गेली. प्रत्येक केंद्रावर दैनंदिन ५०० ते ७०० क्विंटलपेक्षा अधिक तूर मोजणे शक्य झाले नसून, आता तूर खरेदीच बंद झाल्याने घरात पडून असलेली साडेचार लाख क्विंटल तूर मोजायला किती दिवस लागतील, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकरी अडकले द्विधा मन:स्थितीत!जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीची तजवीज करण्यास प्रारंभ केला आहे. अनेक गावांमध्ये पेरणीची कामे सुरूदेखील झाली आहेत. अशा स्थितीत तूर मोजणी सुरू झाल्यास शेतीच्या कामांकडे लक्ष द्यावे की नंबर लागल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर मोजायला आणावी, या द्विधा मन:स्थितीत सध्या शेतकरी अडकले आहेत. याशिवाय वाहनांमध्ये तूर मोजण्याकरिता घेऊन येताना किंवा वाहन बाजार समिती परिसरात लावल्यानंतर पाऊस होऊन तूर भिजल्यास होणारी नुकसान भरपाई कोण देणार, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.वाशिममध्ये शेतकरी शिजविणार तुरीच्या घुगऱ्याविद्यमान राज्य शासनाने तूर उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरश: थट्टा मांडली आहे. पाऊस लागण्यापूर्वी, खरीप हंगामातील पेरणीची कामे सुरू होण्यापूर्वी सर्व तूर खरेदी करण्याचे आश्वासन देऊनही अद्याप लाखो क्विंटल तूर खरेदी व्हायची बाकी आहे. ‘नाफेड’ने अंगीकारलेल्या या धोरणाच्या निषेधार्थ वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू चौधरी यांच्या नेतृत्वात असंख्य शेतकऱ्यांनी बुधवार, १४ जून रोजी सकाळी १० वाजता, स्थानिक पुसद नाका परिसरात चक्क तुरीच्या घुगऱ्या शिजविण्याचे आगळेवेगळे आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्हा निबंधकांच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत टोकन वाटप केले; परंतु अद्याप दीड लाखाच्या आसपास शेतकऱ्यांची तूर मोजून घेणे बाकी असताना १० जूनपासून खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. - बबनराव इंगळे, सचिव, बाजार समिती, वाशिमटोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर मोजून घेणे १० जूनपासून बंद आहे. यासंदर्भात राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला; पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. याशिवाय इतरही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे तूर खरेदी प्रक्रिया ठप्प झाली आहे. - रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम--