शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

सोनल प्रकल्पाच्या किना-यावर प्रकल्पग्रस्तांचे उपोषण

By admin | Updated: September 22, 2015 01:57 IST

३५ वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचा लढा; विविध मागण्यांचा समावेश.

मंगरूळपीर (जि. वाशिम): मालेगाव तालुक्यातील सोनाळा येथील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या चार प्रमुख मागण्यांसाठी सोनल प्रकल्पाच्या किनार्‍यावर २१ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषाणास सुरुवात केली आहे. १९७९ साली सोनल प्रकल्पाच्या निमित्तीस सुरुवात झाली होती. त्यावेळी अवघ्या हजार रुपये दराने शेतजमिनी अजिर्त केल्या होत्या. आमच्या पालकांनी विरोध केला असता, तुमच्या कुटुंबातील दोन व्यक्तींना शासकीय नोकरीवर घेतले जाईल, अशी त्यांची बोळवण करण्यात आली. ३५ वर्षे उलटून गेली असतानाही कुटुंबातील एकाही व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घेतले नाही. जमिनीच्या मोबदल्यात आम्हाला फक्त प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र दिले. आजघडीला आम्ही वयातून बाद होण्याच्या स्थितीला आलो आहोत. शासनाच्या अडेलतट्ट धोरणामुळे आम्हा सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही हलाखीचे जीवन जगत आहोत. यापूर्वीसुद्धा शासनास निवेदन देऊन उपोषण केले होते; मात्र काहीच फायदा झाला नसल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत शासनाकडुन कुठल्याच प्रकारचे सकारात्मक उत्तर मिळाले नसून, तशा हालचालीसुद्धा दिसून येत नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांची सभा घेऊन शासनाच्या अडेलतट्टू धोरणांच्या विरोधात २१ सप्टेंबर रोजीपासून बेमुदत उपोषणाचा इशाराही दिला होता. प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय सेवेत तात्काळ विनाअट सामावून घ्यावे, प्रकल्पग्रस्तांची स्पर्धा परीक्षा ही नामधारी करावी, व्यवसायासाठी १५ लाख रुपये रोख व बाजारपेठेच्या ठिकाणी विनामूल्य जागा द्यावी आणि नवीन पुनर्वसन कायद्याप्रमाणे सर्व सुविधा द्याव्यात, या मागण्यांकरिता महादेव अढाव, संदीप वानखेडे, सुदेश पाचपिले, मंगेश वानखेडे, गजेंद्र वानखेडे, सचिन वानखेडे, नितेश वानखेडे, महेश वानखेडे, राजेश वानखेडे, विकास वानखेडे व सुभाष भगत अशा ११ प्रकल्पग्रस्तांनी उपोषण सुरू केले आहे. सदर मागण्या मान्य न झाल्यास २७ सप्टेंबर रोजी जलसमाधी घेण्याचा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे.