शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

शेतजमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी धरणाच्या बांधावर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:43 IST

फुलउमरी व उमरी खुर्द येथील शेतकऱ्यांची शेती रतनवाडी कालव्याच्या लाभक्षेत्रात येत असताना शेतकऱ्यांची जमीन कोरडवाहू दराने खरेदी करताच येत ...

फुलउमरी व उमरी खुर्द येथील शेतकऱ्यांची शेती रतनवाडी कालव्याच्या लाभक्षेत्रात येत असताना शेतकऱ्यांची जमीन कोरडवाहू दराने खरेदी करताच येत नाही, असे पत्र लघु पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पत्र दिले; परंतु शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन संबंधित विभागाने कोरडवाहू दराने सरळ खरेदी करून येथील ३० शेतकऱ्यावर अन्याय केल्यामुळे शेतकऱ्यांनी न्याय्य मागणीसाठी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे न्याय मागितला, वेळोवेळी मुंबई येथे मंत्रालयात धडक देऊन निवेदने दिली, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार केला. मात्र, शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्यामुळे राजेश बाबूराव राठोड यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी १ एप्रिलपासून धरणाच्या बांधावर साखळी उपोषण सुरू केले आहे. राजेश राठोड यांनी सांगितले की, संबंधित यंत्रणा आम्हाला न्याय देत नाही. धर्मा पाटीलप्रमाणे जीवनयात्रा संपविल्यावर आमच्या प्रकरणाकडे माय-बाप सरकार लक्ष देईल का, असा सवाल राठोड यांनी उपस्थित केला असून, न्याय मिळेपर्यंत धरणाच्या बांधावर कोरोना संसर्गाचे नियम पाळून साखळी उपोषण सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपोषणस्थळी शेतकरी दिलीप किलसिंग राठोड, बन्सी शंकर राठोड, सुधाकर हिरासिंग राठोड, रमेश पवार आदी शेतकरी उपस्थित होते.