शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

शेतजमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी धरणाच्या बांधावर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:43 IST

फुलउमरी व उमरी खुर्द येथील शेतकऱ्यांची शेती रतनवाडी कालव्याच्या लाभक्षेत्रात येत असताना शेतकऱ्यांची जमीन कोरडवाहू दराने खरेदी करताच येत ...

फुलउमरी व उमरी खुर्द येथील शेतकऱ्यांची शेती रतनवाडी कालव्याच्या लाभक्षेत्रात येत असताना शेतकऱ्यांची जमीन कोरडवाहू दराने खरेदी करताच येत नाही, असे पत्र लघु पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पत्र दिले; परंतु शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन संबंधित विभागाने कोरडवाहू दराने सरळ खरेदी करून येथील ३० शेतकऱ्यावर अन्याय केल्यामुळे शेतकऱ्यांनी न्याय्य मागणीसाठी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे न्याय मागितला, वेळोवेळी मुंबई येथे मंत्रालयात धडक देऊन निवेदने दिली, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार केला. मात्र, शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्यामुळे राजेश बाबूराव राठोड यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी १ एप्रिलपासून धरणाच्या बांधावर साखळी उपोषण सुरू केले आहे. राजेश राठोड यांनी सांगितले की, संबंधित यंत्रणा आम्हाला न्याय देत नाही. धर्मा पाटीलप्रमाणे जीवनयात्रा संपविल्यावर आमच्या प्रकरणाकडे माय-बाप सरकार लक्ष देईल का, असा सवाल राठोड यांनी उपस्थित केला असून, न्याय मिळेपर्यंत धरणाच्या बांधावर कोरोना संसर्गाचे नियम पाळून साखळी उपोषण सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपोषणस्थळी शेतकरी दिलीप किलसिंग राठोड, बन्सी शंकर राठोड, सुधाकर हिरासिंग राठोड, रमेश पवार आदी शेतकरी उपस्थित होते.