शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त!

By admin | Updated: March 17, 2017 03:29 IST

संत्रा, आंबा पिकांचे नुकसान ; सर्वाधिक नुकसान मंगरूळपीर तालुक्यात.

वाशिम, दि. १६- जिल्हय़ात सर्वदूर गुरुवार, १६ मार्च रोजी बेमोसमी पावसाने हजेरी लावली. मानोरा, मंगरूळपीर, शेलूबाजार परिसरातील काही गावांना गारपिटीने झोडपले. प्रशांत प्रल्हाद हिरपूरकर (रा. वनोजा, ता. मंगरूळपीर) यांच्यासह इतर शेतकर्‍यांच्या संत्र्याचे वादळी वार्‍यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. कडक उन्हाळ्याची चाहूल लागण्याआधीच गुरुवारी दुपारच्या सुमारास जिल्हाभरात वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपात, गारांसह झालेल्या या पावसामुळे प्रामुख्याने आंबा आणि संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यात गहू, हरभरा, संत्र्याचे नुकसानमंगरुळपीर तालुक्यात १६ मार्च रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास झालेल्या अवकाळी, वादळी पावसाने गहू, हरभरा यासह संत्रा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तालुक्यात यावर्षी पाण्याचा साठा लक्षात घेऊन अनेक शेतकर्‍यांनी हरभरा गहू, भाजीपाला, कांद्याची लागवड केली होती; मात्र १६ मार्चला झालेल्या वादळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. सोसाट्याचा वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यादरम्यान काही काळापुरते जनजीवन विस्कळीत झाले होते; परंतु लवकरच पाऊस थांबल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. तांदळी येथे उभा गहू जमीनदोस्त, कांदा बीजाचेही नुकसानवाशिम आणि अकोल्याच्या सीमेवरील तथा वाशिम जिल्हय़ाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या तांदळी या गावात आज दुपारी वादळी वार्‍यासह, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे गव्हाचे उभे पीक जमीनदोस्त झाले. यासह कांदा बीजाचेही अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले.