शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

शेतक-यांनो, अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करा!

By admin | Updated: July 2, 2017 08:56 IST

शेतक-यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत बदल घडवून भरघोस उत्पन्न मिळवावे, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मांडले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत बदल घडवून भरघोस उत्पन्न मिळवावे, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मांडले. स्थानिक जिल्हा परिषद सभागृहात १ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषिदिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, आरोग्य व शिक्षण सभापती सुधीर गोळे, महिला व बालकल्याण सभापती यमुना जाधव, समाजकल्याण सभापती पानुबाई जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, ह्यआत्माह्णचे प्रकल्प संचालक डी.एल. जाधव, कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी प्रा. डॉ.बी.डी. गीते, करडा कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ निवृत्ती पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना विश्वनाथ सानप म्हणाले, की कृषिदिन हा सर्वार्थाने शेतकऱ्यांचा दिवस आहे. कै. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात हरितक्रांती निर्माण केली. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीत बदल करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील, गीते, निवृत्ती पाटील यांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी उत्कृष्ट शेती करणारे शेतकरी नामदेव नागरे, संजय कानड, शेखर सानप, विठ्ठल ब्रम्हेकर, ध्रुव राठोड, रामराव ठाकरे आदींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मंगरुळपीर पंचायत समिती कृषी विभागाचे कृषी अधिकारी शेळके आणि जिल्हा परिषद ग्रामविकास अधिकारी सुनील इंगळे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.चे जिल्हा कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापात्रे यांनी केले. संचालन कृषी अधिकारी शेळके यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.