शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कापूस पेरणीकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:26 IST

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून, पिकली तर शेती, नाहीतर शेतकऱ्यांची माती, असाच प्रकार कापूस पिकाच्या संदर्भात ...

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून, पिकली तर शेती, नाहीतर शेतकऱ्यांची माती, असाच प्रकार कापूस पिकाच्या संदर्भात सुरू आहे. कपाशी पीकअळीमुळे अडचणीत आल्याने शेतकऱ्यांनी कपाशीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. दोन दशकांपूर्वी कापूस पिकाच्या भावावर सोन्याचे भाव ठरविले जात होते. कापसाला अडीच हजार रुपये क्विंटल भाव असेल, तर सोन्याच्या तोळ्याचा भावही तेवढ्याच तुलनेत असायचा, असे वृद्ध शेतकरी सांगतात. मात्र, आता सोन्याचे दर प्रति तोळा ५० हजार रुपये असून, कापसाला केवळ ६ हजार रुपये क्विंटल दर मिळत आहेत. सरकारने मागच्या पंचवार्षिकमध्ये हमीभावावर ५० टक्के वाढीव नफा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मात्र, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली व शेतमालाचे हमीभाव वाढविले नसल्याने जिथल्या तिथेच आहे. महागाई आकाशाला भिडली आहे. त्यात गेल्या ४ ते ५ वर्षांपासून बोंडअळी रोग आल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्या वर्षीही बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाचा वेचानंतर पऱ्हाटी उपटून टाकली होती, यामध्ये बियाणे, रासायनिक खते, फवारणी आदी लाखो रुपयांचा खर्च मातीत गेला व शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस पिकांकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे.

-------------

वाढत्या खर्चाचा परिणाम

दरवर्षी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशक औषधे, मजुरांची मजुरी, डीझेल, पेट्रोल आदींचे दर वाढत आहेत, त्यामुळे ट्रॅक्टरने मशागत करणे, मजुरांकडून कापणी करणे, तसेच पिकाला खते देणे व कीटकनाशकांचा वापर करणेही खर्चिक झाले असल्याने, शेतकरी कपाशीच्या पिकाकडे पाठ करू लागले आहेत.