शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

कापूस पेरणीकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:26 IST

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून, पिकली तर शेती, नाहीतर शेतकऱ्यांची माती, असाच प्रकार कापूस पिकाच्या संदर्भात ...

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून, पिकली तर शेती, नाहीतर शेतकऱ्यांची माती, असाच प्रकार कापूस पिकाच्या संदर्भात सुरू आहे. कपाशी पीकअळीमुळे अडचणीत आल्याने शेतकऱ्यांनी कपाशीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. दोन दशकांपूर्वी कापूस पिकाच्या भावावर सोन्याचे भाव ठरविले जात होते. कापसाला अडीच हजार रुपये क्विंटल भाव असेल, तर सोन्याच्या तोळ्याचा भावही तेवढ्याच तुलनेत असायचा, असे वृद्ध शेतकरी सांगतात. मात्र, आता सोन्याचे दर प्रति तोळा ५० हजार रुपये असून, कापसाला केवळ ६ हजार रुपये क्विंटल दर मिळत आहेत. सरकारने मागच्या पंचवार्षिकमध्ये हमीभावावर ५० टक्के वाढीव नफा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मात्र, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली व शेतमालाचे हमीभाव वाढविले नसल्याने जिथल्या तिथेच आहे. महागाई आकाशाला भिडली आहे. त्यात गेल्या ४ ते ५ वर्षांपासून बोंडअळी रोग आल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्या वर्षीही बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाचा वेचानंतर पऱ्हाटी उपटून टाकली होती, यामध्ये बियाणे, रासायनिक खते, फवारणी आदी लाखो रुपयांचा खर्च मातीत गेला व शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस पिकांकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे.

-------------

वाढत्या खर्चाचा परिणाम

दरवर्षी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशक औषधे, मजुरांची मजुरी, डीझेल, पेट्रोल आदींचे दर वाढत आहेत, त्यामुळे ट्रॅक्टरने मशागत करणे, मजुरांकडून कापणी करणे, तसेच पिकाला खते देणे व कीटकनाशकांचा वापर करणेही खर्चिक झाले असल्याने, शेतकरी कपाशीच्या पिकाकडे पाठ करू लागले आहेत.