शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

विष प्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या

By admin | Updated: August 27, 2014 00:00 IST

इंझोरी येथील घटना

इंझोरी : नापिकीला कंटाळून येथील एका ३२ वर्षीय शेतकर्‍याने २४ ऑगस्टच्या रात्री स्वत:च्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार मृतक शेतकर्‍याचे नाव गोपाल मारोती लटके असे आहे. त्यांच्याकडे वडिलोपाजिर्त ११ एकर शेती होती; पण ती अडाण धरणाच्या निर्मितीत गेली. त्यापैकी अंदाजे २ एकर शेती पाण्याखाली येत नसल्याने मारोती लटके मागील बर्‍याच वर्षांपासून वहिती करतात. यावर्षी निसर्गाचा लहरीपणामुळे त्यांना तिबार पेरणी करावी लागली. तसेच पीक जमिनीवर आल्यानंतर जंगली प्राण्यांनी धुडगूस घातला. डोळ्यादेखत सदर शेतकर्‍याचे अतोनात नुकसान झाले. शेतात लावलेला पैसा निघणे कठीण झाल्याने त्यांच्यात नैराश्य आले. बुडीत क्षेत्रात जमीन असल्याने बँकही कर्ज देत नाही त्यातच डोक्यावर सावकाराचे कर्ज, वन्यप्राण्यांचा त्रास या सर्व बाबीला कंटाळून त्यांनी २४ ऑगस्टला विष प्राशन केले. त्यांना लगेच कारंजा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. येथे प्रथमोपचारानंतर त्यांना अकोला रवाना करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुले, वडील, चार बहिणी असा परिवार आहे.