शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:28 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहे. सार्वत्रिक पावसाचा अभाव असल्याने पेरण्या संकटात सापडल्या आहेत. त्यात काही भागांतील ...

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहे. सार्वत्रिक पावसाचा अभाव असल्याने पेरण्या संकटात सापडल्या आहेत. त्यात काही भागांतील शेतकरी पुरेशा पावसाची प्रतीक्षा करीत होेते. पावसाची सरासरी खूप अधिक दिसत असली तरी जमिनीत चांगला ओलावाच नसल्याने या शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. त्यात आता पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली आहे. कारंजा तालुक्यातील बहुतांश मंडळात पावसाची सरासरी अधिक असूनही पावसाचे प्रमाण सार्वत्रिक नसल्याने पिके संकटात सापडली आहेत. धनज बु. महसूल मंडळातील शेतकरी आता पिके वाचविण्यासाठी सिंचनाचा आधार घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

----------------

घरी ठेवलेले सिंचन साहित्य पुन्हा शेतात

जिल्ह्यात रब्बी हंगामात सिंचनासाठी वापरण्यात येणारे सिंचन साहित्य अवघ्या दीड महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांनी घरी आणून गुंडाळून ठेवले. आता पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली आहेत. त्यामुळे घरी आणून ठेवले सिंचन साहित्य पुन्हा शेतात नेण्याची धडपड शेतकऱ्यांनी सुरू केली असून, ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच बैलगाडीने शेतात नेण्यात येत असल्याचे चित्र धनज बु. परिसरात पाहायला मिळत आहे. काही शेतकरी पाटाने पाणी सोडून पिके वाचविण्याची धडपड करीत आहेत.

----------------

काही गावांत ७५ टक्केच पेरणी

कारंजा तालुक्यात ९० टक्के पेरणी झाली असली तरी धनज बु. परिसरातील धनज बु., धनज खु आदींसह १, १२ गावे वगळता इतर गावांत ७५ टक्केच पेरणी झाली आहे. त्यात बेलखेड, कामठा आदीसंह या गावांच्या सभोवताली असलेल्या गावांचा समावेश आहे. या गावांत पूर्वी आटोपलेली पेरणी संकटात आहेच, शिवाय पावसाअभावी उर्वरित पेरणी खोळंबली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून, ते दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.