शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

पीक नुकसान भरपाईपासून शेतकरी अद्याप वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:40 IST

दरवर्षीच्या तुलनेत गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनची स्थिती अत्यंत चांगली होती. यामुळे नेहमीच्या तुलनेत अधिक उत्पादन हाती पडण्याची आशा शेतकऱ्यांना ...

दरवर्षीच्या तुलनेत गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनची स्थिती अत्यंत चांगली होती. यामुळे नेहमीच्या तुलनेत अधिक उत्पादन हाती पडण्याची आशा शेतकऱ्यांना लागू असतानाच ऐन सोयाबीनची कापणी करून ते शेतात रचून ठेवले असतानाच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. अनेक शेतकऱ्यांचे शंभर टक्के; तर बहुतांश शेतकऱ्यांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. दरम्यान, पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी नियमानुसार ७२ तासांच्या आत ऑनलाईन पद्धतीने विमा कंपनीकडे फोटो व माहिती सादर केली. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामेदेखील केले. त्यानंतर अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला; मात्र बहुतांश शेतकरी यापासून वंचित राहिले. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे विनाविलंब विमा कंपनीने अदा करावे, अशी मागणी होत आहे.

........................

कोट :

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन तसेच तूर व कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. तोंडावर खरीप हंगाम असून, शेतकऱ्यांना पैशांची गरज भासत आहे. अशाप्रसंगी विमा कंपन्यांनी नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे.

- नितीन उपाध्ये

शेतकरी, काजळेश्वर