शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ!

By admin | Updated: July 14, 2017 01:47 IST

प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद मिळेना : विमा रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम २०१७ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील नऊ पिकांना पेरणीपासून ते काढणीपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. असे असले तरी पावसाअभावी अंकुरलेली पिके कोमेजण्याच्या मार्गावर असून दुबार, तिबार पेरणीचे संकटही ‘आ’ वासून उभे असल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे सपशेल पाठ फिरवल्याची माहिती सूत्रांनी दिली.सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद व खरीप ज्वारी पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश आहे. तसेच भात पिकासाठी वाशिम, रिसोड व मालेगाव तालुक्याचा समावेश असून भुईमुग पिकासाठी मालेगाव, कारंजा व तीळ पिकासाठी वाशिम, मानोरा, कारंजा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्ट्याने जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. शेतकऱ्यांवरील विम्याच्या हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के मर्यादित ठेवण्यात आला आहे. योजनेतील विमा उतरविलेल्या पिकांसाठी जोखिमस्तर ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. तसेच अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांचे उंबरठा उत्पन्न मागील ७ वर्षांचे सरासरी उत्पन्न गुणीला त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाणार आहे, असे प्रशासनाने यापुर्वी अनेकवेळा जाहीर केले. शेतकऱ्यांनी आपले विमा प्रस्ताव बँकेकडे सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१७ पर्यंत आहे. प्रस्तावासोबत सातबारा, ८ अ उतारा, पिक पाहणी झाली असल्यास पेरणीबाबतचा तलाठ्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांचे संबंधित बँकेत खाते असणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. असे असतानाही शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली असून या योजनेला कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती कृषी विभागातील अधिकृत सूत्रांनी दिली आहे. भाताचे उत्पादन नसताना पीक विमा योजनेत समावेशजिल्ह्यात अधिकांश शेतकरी पारंपरिक पिकांचे उत्पादन घेतात. त्यात प्रामुख्याने सोयाबिन, तूर, मुग, उडिद, कापूस, ज्वारी, भूईमुग या पिकांचा समावेश होतो. मात्र, अधिक प्रमाणात पाणीच मिळत नसल्याने भात या पिकाचे उत्पादन जिल्ह्यात कुठेही घेतले जात नाही. असे असताना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत वाशिम, रिसोड आणि मालेगाव तालुक्यांचा भात या पिकामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय तीळाचेही उत्पन्न फारसे घेतले जात नसताना हे पीकही योजनेत समाविष्ट आहे.