शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शेतकर्‍यांनी सोडली तहसीलमध्ये जनावरे

By admin | Updated: July 18, 2014 01:02 IST

भुर येथील शेतकर्‍यांचे अभिनव आंदोलन : पांदण रस्ता दुरूस्तीची मागणी

मंगरूळपीर : भुर येथील शेतकर्‍यांनी पांदण रस्ता दुरूस्त करण्यात यावा, या मागणीसाठी १७ जुलैला तहसील व उपविभागीय कार्यालयाच्या आवारात आपल्या जनावरांना सोडून अनोखे आंदोलन केले.भुर येथे लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने बांधण्यात आलेल्या धरणात पांदण रस्ता बुडीत क्षेत्रात गेला होता. परिणामी, शेतकर्‍यांना नाहक त्रास सोसावा लागत होता. या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकर्‍यांनी प्रशासनाकडे वारंवार रेटुन धरली होती. याबाबत निवेदनेही दिली होती. प्रशासकीय यंत्रणेने त्याची दखल घेतली नाही. गत आठ दिवसांपूर्वी याच मागणीसाठी ग्रामस्थांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले होते. रस्त्याचे काम सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला होता; मात्र अधिकार्‍यांनी सदर निवेदनाला केराची टोपली दाखविली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या भुर येथील शेतकर्‍यांनी १७ जुलैला येथील तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात आपली जनावरे सोडली. भुरवासीयांचे हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी तहसील परिसरात मोठी गर्दी जमली होती. त्यानंतर उपविभागीय अधिकार्‍यांच्या कक्षात आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले, यावेळी शेतकर्‍यांसोबत उपविभागीय अधिकारी दिनकर काळे, तहसीलदार बळवंत अरखराव, लघुपाटबंधारे विभागाचे पाठक यांच्या समोर शेतकर्‍यांनी आपल्या अडचणी मांडल्या, यावेळी वरिष्ठांसोबत चर्चा केल्यावर ३0 दिवसाचे आत पांदण रस्ता तयार करून देण्याबाबत लेखी आश्‍वासन दिले, त्यानंतर भुरवासीयांनी सदर आंदोलन मागे घेतले.