शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

पावसाचा हाहाकार, शेतकरी पुरता बेजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:47 IST

वाशिम : जिल्हाभरात सतत दोन दिवस पावसाने अक्षरश: हाहाकार माजविला. यामुळे विशेषत: सोयाबीनची प्रचंड नासाडी झाली असून, खरिपातील इतरही ...

वाशिम : जिल्हाभरात सतत दोन दिवस पावसाने अक्षरश: हाहाकार माजविला. यामुळे विशेषत: सोयाबीनची प्रचंड नासाडी झाली असून, खरिपातील इतरही शेकडो एकरांवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकरी पुरते बेजार झाले असून, पुन्हा एकवेळ नुकसानीचे पंचनामे होण्याची प्रतीक्षा आणि शासनाकडून मिळणाऱ्या भरपाईची आस त्यांना लागली आहे.

जिल्ह्यात चार लाखांपेक्षा अधिक हेक्टर शेतजमिनीवर यंदा खरिपातील पिकांची पेरणी करण्यात आली. त्यात तब्बल तीन लाखांपेक्षा अधिक हेक्टर जमीन एकट्या सोयाबीनने व्यापलेली आहे. यंदा सुरुवातीपासूनच पोषक वातावरण आणि अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे सोयाबीनची वाढ अपेक्षेनुरूप झाली. विशेषत: या पिकांवर यंदा कीड रोगांचा अधिक प्रादुर्भाव न झाल्याने विक्रमी उत्पादन हाती पडण्याची आशा शेतकऱ्यांना लागून होती. अवघ्या काहीच दिवसांत सोयाबीनची काढणी प्रक्रिया सुरू होणार होती; मात्र १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी साचून सोयाबीनची प्रचंड हानी झाली आहे. शेतात तब्बल गुडघाभर पाणी साचून असल्याने सोयाबीनची काढणी नेमकी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यापुढेही काही दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. कृषी विभागाने तातडीची पावले उचलत नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना शासनस्तरावरून आर्थिक साहाय्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

.................

कोट :

सोनखास शिवारात दरवर्षीप्रमाणे यंदाही अधिकांश शेतजमिनीवर सोयाबीनचा पेरा झालेला आहे. अनुकूल वातावरण आणि समाधानकारक पर्जन्यमानामुळे सोयाबीन चांगलेच बहरले होते; मात्र गत दोन ते तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीने काढणीला आलेल्या सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी आहे.

- उकंडा गोरे, शेतकरी, सोनखास, ता. वाशिम