शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकरी पेरणीसाठी सज्ज

By admin | Updated: June 10, 2015 02:51 IST

मृग नक्षत्राच्या पावसाने शेतकरी सुखावला : वाशिम तालुक्यातील मशागतीची कामे पूर्णत्वाकडे.

वाशिम : खरीप हंगामासाठी जिल्हय़ातील बहुतांश शेतकर्‍यांनी रखरखत्या उन्हातच पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु केली होती. ८ जून रोजी झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला असून, पेरणीसाठी सज्ज झाला आहे. अनेक शेतकर्‍यांनी पेरणीसाठी शेत तयार केले असून, पावसाची प्रतीक्षा करीत आहे. जिल्हय़ातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा व मानोरा तालुक्यात ८ जून रोजी झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला असून, अनेकांनी ९ जून रोजी सकाळपासूनच शेतात हजेरी देऊन पेरणीपूर्व कामे आटोपली आहेत. काही शेतकर्‍यांनी उन्हाळय़ातच शेती तयार केली. ते बी- बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी धावपळ करीत असून, काही शेतकरी ८ जून रोजी झालेल्या पावसानंतर ९ जून रोजी सकाळपासूनच शेतात जावून पेरणीसाठी शेतातील कामे पूर्ण करताना दिसून आला. गतवर्षी कधी दुष्काळी तर कधी अतवृष्टीने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले होते. पेरणी केलेला खर्चही शेतकर्‍यांच्या हाती न आल्याने शेतकरी अडचणीत आला होता. यावर्षी मृगनक्षत्राचा पाऊस वेळेवर पडल्याने आनंद व्यक्त करीत आहे. गतवर्षीचे सर्व संकटे विसरुन शेतकरी नव्या जोमाने, नव्या दमाने शेतीच्या मशागतीस भिडला आहे. बहुतांश शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्नज्ञानाची कास धरून ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी, वखरणी करून जास्त वेळ व जास्त घाम न गाळता शेतीची पेरणीपूर्व मशागत पूर्ण केली आहे तर अल्पभूधारक शेतकरी आपल्या पारंपरिक पद्धतीने शेतीची मशागत पूर्ण करुन पावसाची प्रतीक्षा करीत आहे. जिल्हय़ात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांची लागवड दरवर्षी होते, याहीवर्षी हेच पीक मोठय़ा प्रमाणात घेतल्या जाणार असल्याचे चिन्ह आहेत. गतवर्षी सोयाबीनच्या उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात घट झाल्याने सोयाबीन बियाण्यांसाठी मात्र शेतकर्‍यांना चांगलीच धावपळ करावी लागत आहे. बाजारात सोयाबीन बियाणे मिळत नसल्याने घरगुती बियाण्यांवर शेतकर्‍यांचा जोर असून कृषी विभागाच्यावतीनेही घरगुती बियाण्यांचा वापर करण्याचे आवाहन केल्या जात आहे.