शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अनुदानापासून वंचित

By admin | Updated: October 9, 2016 01:39 IST

सुक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी मालेगाव तालुक्यातील दोन हजार लाभार्थ्यांंच्या कार्यालयात वा-या.

वाशिम, दि. 0८- राष्ट्रीय सूक्ष्म अभियानाअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचा उपयोग करणार्‍या हजारो शेतकर्‍यांवर अनुदानासाठी तिष्ठत बसण्याची वेळ आली असून, मालेगाव तालुक्यातील सुमारे दोन हजार ५0 शेतकरी मागील अद्याप अनुदानापासून वंचित आहेत. गेल्या दोन वर्षांपासून अनुदानाचा घोळ सुटला नसल्याने त्याचा परिणामही सिंचन व्यवस्थापनावर होऊ लागला आहे.एकिकडे सरकारने सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारलेले असताना ज्या शेतकर्‍यांनी योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे दुर्लक्ष चालवले आहे. यातून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला आहे. राज्यात राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियान राबवण्यात येत आहे. २0१३-१४ पयर्ंत या अभियानाअंतर्गत आणि २0१४-१५ मध्ये शेतावरील पाणी व्यवस्थापन उपअभियानाअंतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्शाचे प्रमाण ८0:२0 असे होते. २0१५-१६ मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (सूक्ष्म सिंचन) राबवण्याचे निश्‍चित केले आणि अनुदानाचे प्रमाण ५0:५0 असेल, असे कळवले. ठिबक सिंचन अनुदानाच्या वाटपासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली, पण निधी अपुरा पडल्याने अजूनही हजारो शेतकर्‍यांना ते मिळालेले नाही. कमी पाण्यावर जास्त उत्पादन घेण्यासाठी आणि शासकीय योजनांच्या पूर्ततेसाठी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून ठिबक सिंचन योजना शेतकर्‍यांच्या माथी मारण्यात आली. दरम्यान, या योजनेच्या स्वरुपात थोडा बदल करताना शासनाने अवर्षणप्रवण आणि अवर्षणाबाहेरील जिल्ह्यासाठी अनुदानाच्या टक्केवारीत बदल केला आणि अवर्षणप्रवण जिल्ह्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना या योजनेसाठी ६0 टक्के अनुदान, तर अवर्षणाबाहेरील जिल्ह्यांसाठी ४५ टक्के अनुदान निश्‍चित करण्यात आले. यासाठी सन २0१६-१७ या वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या आणि प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार लाभार्थीची निवड होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तत्पूर्वी सन २0१४-१५ आणि २0१५-१६ या वर्षांंसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अट नसताना आणि प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्यानुसार लाभार्थीची निवड करण्याचे स्पष्ट निर्देश नसतानाच मालेगाव तालुक्यातील चार हजारांवर शेतकर्‍यांनी या योजनेंतर्गत अर्ज करून आणि प्रसंगी कर्ज काढून ठिबक व तुषार संच बसवले. आज ना उद्या अनुदान मिळेल, या अपेक्षेने शेतकर्‍यांनी ठिबक व तुषार सिंचनासाठी एकरी ४५ ते ५0 हजार रुपयांपयर्ंत खर्च केला. यासाठी शेतकर्‍यांनी सावकार आणि बँकांचे उंबरठे झिजवले, पण अजूनही मालेगाव तालुक्यातील २0१४-१५ मधील एक हजार, तर २0१५-१६ मधील एक हजार ५0 शेतकर्‍यांना अनुदानाचा छदामही मिळालेला नाही. पाणीटंचाईतून मार्ग काढण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकर्‍यांकडून मागणी झाल्यास त्यांना तात्काळ ही सुविधा देण्याच्याही सूचना आहेत. प्रत्यक्षात मात्र त्या कागदावरच राहत आहेत. सुक्ष्म सिंचन योजनेच्या अनुदानाचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांना प्राप्त निधीतून अनुदानाचे वाटप केले आहे. मागील दोन वर्षांंत या योजनेसाठी अर्ज करणारे हजारो लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. हे वास्तव आहे; परंतु शासनाकडून निधीच मिळत नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही. -संतोष वाळके, तालुका कृषी अधिकारी, मानोरा