शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

शेतकरी अनुदानापासून वंचित

By admin | Updated: October 9, 2016 01:39 IST

सुक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी मालेगाव तालुक्यातील दोन हजार लाभार्थ्यांंच्या कार्यालयात वा-या.

वाशिम, दि. 0८- राष्ट्रीय सूक्ष्म अभियानाअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचा उपयोग करणार्‍या हजारो शेतकर्‍यांवर अनुदानासाठी तिष्ठत बसण्याची वेळ आली असून, मालेगाव तालुक्यातील सुमारे दोन हजार ५0 शेतकरी मागील अद्याप अनुदानापासून वंचित आहेत. गेल्या दोन वर्षांपासून अनुदानाचा घोळ सुटला नसल्याने त्याचा परिणामही सिंचन व्यवस्थापनावर होऊ लागला आहे.एकिकडे सरकारने सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारलेले असताना ज्या शेतकर्‍यांनी योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे दुर्लक्ष चालवले आहे. यातून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला आहे. राज्यात राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियान राबवण्यात येत आहे. २0१३-१४ पयर्ंत या अभियानाअंतर्गत आणि २0१४-१५ मध्ये शेतावरील पाणी व्यवस्थापन उपअभियानाअंतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्शाचे प्रमाण ८0:२0 असे होते. २0१५-१६ मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (सूक्ष्म सिंचन) राबवण्याचे निश्‍चित केले आणि अनुदानाचे प्रमाण ५0:५0 असेल, असे कळवले. ठिबक सिंचन अनुदानाच्या वाटपासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली, पण निधी अपुरा पडल्याने अजूनही हजारो शेतकर्‍यांना ते मिळालेले नाही. कमी पाण्यावर जास्त उत्पादन घेण्यासाठी आणि शासकीय योजनांच्या पूर्ततेसाठी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून ठिबक सिंचन योजना शेतकर्‍यांच्या माथी मारण्यात आली. दरम्यान, या योजनेच्या स्वरुपात थोडा बदल करताना शासनाने अवर्षणप्रवण आणि अवर्षणाबाहेरील जिल्ह्यासाठी अनुदानाच्या टक्केवारीत बदल केला आणि अवर्षणप्रवण जिल्ह्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना या योजनेसाठी ६0 टक्के अनुदान, तर अवर्षणाबाहेरील जिल्ह्यांसाठी ४५ टक्के अनुदान निश्‍चित करण्यात आले. यासाठी सन २0१६-१७ या वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या आणि प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार लाभार्थीची निवड होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तत्पूर्वी सन २0१४-१५ आणि २0१५-१६ या वर्षांंसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अट नसताना आणि प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्यानुसार लाभार्थीची निवड करण्याचे स्पष्ट निर्देश नसतानाच मालेगाव तालुक्यातील चार हजारांवर शेतकर्‍यांनी या योजनेंतर्गत अर्ज करून आणि प्रसंगी कर्ज काढून ठिबक व तुषार संच बसवले. आज ना उद्या अनुदान मिळेल, या अपेक्षेने शेतकर्‍यांनी ठिबक व तुषार सिंचनासाठी एकरी ४५ ते ५0 हजार रुपयांपयर्ंत खर्च केला. यासाठी शेतकर्‍यांनी सावकार आणि बँकांचे उंबरठे झिजवले, पण अजूनही मालेगाव तालुक्यातील २0१४-१५ मधील एक हजार, तर २0१५-१६ मधील एक हजार ५0 शेतकर्‍यांना अनुदानाचा छदामही मिळालेला नाही. पाणीटंचाईतून मार्ग काढण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकर्‍यांकडून मागणी झाल्यास त्यांना तात्काळ ही सुविधा देण्याच्याही सूचना आहेत. प्रत्यक्षात मात्र त्या कागदावरच राहत आहेत. सुक्ष्म सिंचन योजनेच्या अनुदानाचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांना प्राप्त निधीतून अनुदानाचे वाटप केले आहे. मागील दोन वर्षांंत या योजनेसाठी अर्ज करणारे हजारो लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. हे वास्तव आहे; परंतु शासनाकडून निधीच मिळत नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही. -संतोष वाळके, तालुका कृषी अधिकारी, मानोरा