शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

शेतकरी अनुदानापासून वंचित

By admin | Updated: October 9, 2016 01:39 IST

सुक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी मालेगाव तालुक्यातील दोन हजार लाभार्थ्यांंच्या कार्यालयात वा-या.

वाशिम, दि. 0८- राष्ट्रीय सूक्ष्म अभियानाअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचा उपयोग करणार्‍या हजारो शेतकर्‍यांवर अनुदानासाठी तिष्ठत बसण्याची वेळ आली असून, मालेगाव तालुक्यातील सुमारे दोन हजार ५0 शेतकरी मागील अद्याप अनुदानापासून वंचित आहेत. गेल्या दोन वर्षांपासून अनुदानाचा घोळ सुटला नसल्याने त्याचा परिणामही सिंचन व्यवस्थापनावर होऊ लागला आहे.एकिकडे सरकारने सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारलेले असताना ज्या शेतकर्‍यांनी योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे दुर्लक्ष चालवले आहे. यातून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला आहे. राज्यात राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियान राबवण्यात येत आहे. २0१३-१४ पयर्ंत या अभियानाअंतर्गत आणि २0१४-१५ मध्ये शेतावरील पाणी व्यवस्थापन उपअभियानाअंतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्शाचे प्रमाण ८0:२0 असे होते. २0१५-१६ मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (सूक्ष्म सिंचन) राबवण्याचे निश्‍चित केले आणि अनुदानाचे प्रमाण ५0:५0 असेल, असे कळवले. ठिबक सिंचन अनुदानाच्या वाटपासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली, पण निधी अपुरा पडल्याने अजूनही हजारो शेतकर्‍यांना ते मिळालेले नाही. कमी पाण्यावर जास्त उत्पादन घेण्यासाठी आणि शासकीय योजनांच्या पूर्ततेसाठी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून ठिबक सिंचन योजना शेतकर्‍यांच्या माथी मारण्यात आली. दरम्यान, या योजनेच्या स्वरुपात थोडा बदल करताना शासनाने अवर्षणप्रवण आणि अवर्षणाबाहेरील जिल्ह्यासाठी अनुदानाच्या टक्केवारीत बदल केला आणि अवर्षणप्रवण जिल्ह्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना या योजनेसाठी ६0 टक्के अनुदान, तर अवर्षणाबाहेरील जिल्ह्यांसाठी ४५ टक्के अनुदान निश्‍चित करण्यात आले. यासाठी सन २0१६-१७ या वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या आणि प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार लाभार्थीची निवड होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तत्पूर्वी सन २0१४-१५ आणि २0१५-१६ या वर्षांंसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अट नसताना आणि प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्यानुसार लाभार्थीची निवड करण्याचे स्पष्ट निर्देश नसतानाच मालेगाव तालुक्यातील चार हजारांवर शेतकर्‍यांनी या योजनेंतर्गत अर्ज करून आणि प्रसंगी कर्ज काढून ठिबक व तुषार संच बसवले. आज ना उद्या अनुदान मिळेल, या अपेक्षेने शेतकर्‍यांनी ठिबक व तुषार सिंचनासाठी एकरी ४५ ते ५0 हजार रुपयांपयर्ंत खर्च केला. यासाठी शेतकर्‍यांनी सावकार आणि बँकांचे उंबरठे झिजवले, पण अजूनही मालेगाव तालुक्यातील २0१४-१५ मधील एक हजार, तर २0१५-१६ मधील एक हजार ५0 शेतकर्‍यांना अनुदानाचा छदामही मिळालेला नाही. पाणीटंचाईतून मार्ग काढण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकर्‍यांकडून मागणी झाल्यास त्यांना तात्काळ ही सुविधा देण्याच्याही सूचना आहेत. प्रत्यक्षात मात्र त्या कागदावरच राहत आहेत. सुक्ष्म सिंचन योजनेच्या अनुदानाचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांना प्राप्त निधीतून अनुदानाचे वाटप केले आहे. मागील दोन वर्षांंत या योजनेसाठी अर्ज करणारे हजारो लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. हे वास्तव आहे; परंतु शासनाकडून निधीच मिळत नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही. -संतोष वाळके, तालुका कृषी अधिकारी, मानोरा