शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकरी गारद

By admin | Updated: March 11, 2015 01:47 IST

गहू, संत्रा व पपईचे नुकसान.

वाशिम : जिल्ह्यात ९ मार्च रोजी वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाचे आगमन झाले. कारंजा, मानोरा व मंगरूळपीर या तालुक्यांमध्ये गारपीट झाल्याने संत्रा, पपई, लिंबू, केळी, बिजवाईचा कांदा, टरबूज, खरबूज तसेच रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भाजीपाला पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील शेतकरी या सततच्या संकटांमुळे गारद झाले आहेत.जिल्ह्यात १0 मार्च रोजी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी २७.५७ मि.मि. पावसाची नोंद करण्यात आली. यामध्ये वाशिम तालुक्यात ३४, मालेगाव तालुक्यात ३, रिसोड तालुक्यात ९.३0, मंगरूळपीर तालुक्यात ३१.३0 मानोरा तालुक्यात ७८, तर कारंजा तालुक्यात ९.८0 असा एकूण १६५.४0 मि.मी. पाऊस पडला. जिल्ह्याची सरासरी २५.५७ मि.मी. आहे. या अवकाळी पावसासह कारंजा, मानोरा व मंगरुळपीर तालुक्यात गारपिटीने शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या तीनही तालुक्यांतील गहू पूर्णपणे झोपला, संत्र्याला मोठय़ा प्रमाणात गारांचा मार लागल्याने मोठे नुकसान शेतकर्‍यांना झेलावे लागले आहे. पपईचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने फळउत्पादक शेतकरी मदतीची अपेक्षा करीत आहेत. मानोरा तालुक्यातील गारपिटीने नुकसानग्रस्त झालेल्या भागाची जिल्हाधिकारी कुलकर्णी, तर मंगरूळपीर तालुक्यातील भागांची तहसीलदार बळवंत अरखराव यांनी पाहणी केली.