शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

बचत गटाच्या माध्यमातून शेतकरी बनले उत्पादक कंपनीचे मालक !

By admin | Updated: October 23, 2016 17:09 IST

शेतक-यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने बचत गटाच्या माध्यमातून शेतक-यांना उत्पादक कंपनीचे मालक होण्याची हाक दिली आहे.

ऑनलाइन लोकमत / संतोष वानखडे
वाशिम, of. 23 - शेतक-यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने बचत गटाच्या माध्यमातून शेतक-यांना उत्पादक कंपनीचे मालक होण्याची हाक दिली आहे. या हाकेला प्रतिसाद देत वाशिम जिल्ह्यातील शेकडो शेतकरी बचत गटाने २४ उत्पादक कंपनीचे मालक होण्याचा मान मिळविला आहे. 
कृषी विभागाच्या सहकार्यातून शेतकरी बचत गटातील सभासदांना विविध योजनांचा लाभ देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. २८ ते ३० बचत गटातील जवळपास ५०० ते ५५० शेतकरी एकत्र आले तर शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रशासकीय सोपस्कार केले जातात. बिज प्रक्रिया, भाजीपाला प्रक्रिया व विक्री केंद्र, दुग्धोत्पादन, दालमिल, कुकुटपालन यासारख्या शेतीशी निगडीत बाबी लक्षात उत्पादक कंपनीची स्थापना कृषी विभागामार्फत केली जाते. रिसोड तालुक्यात बाळखेड व किनखेडा येथील शेतकरी बचत गटांनी बिजोत्पादनात पाऊल टाकले आहे.  किनखेडा येथील संत ज्ञानेश्वर शेतकरी उत्पादक समूहातर्फे सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी बियाण्यांचे उत्पादन करण्याच्या कार्याला सुरूवात करण्यात आली. किनखेडा परिसरातील २८ ते ३२ शेतकरी बचत गट एकत्र येऊन संत ज्ञानेश्वर शेतकरी उत्पादक समूह शासनाच्या कृषी विभागामार्फत (आत्मा कार्यालय) स्थापन केला. पहिला प्रयत्न म्हणून सोयाबीन डीएसबी २१ व ९३०५ ब्रीडर बियाणे २२५ एकरावर तसेच ९३०५ फाऊंडेशन बियाणे कार्यक्रम ३२५ एकरावर घेतला. या कार्यक्रमांतर्गत शेतकºयांना प्लॉटसाठी दिलेले सोयाबीन बियाणे आता खरेदी स्वरुपात या गटाच्या समूहातर्फे घेतले जात आहे. बचत गटाच्या माध्यमातून शेतकरीच उत्पादक कंपनीचे मालक होत असल्याची बाब इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.