शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

न उगवलेल्या बियाण्यांचा अखेर शेतकर्‍यांना मोबदला!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:13 IST

यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांनी महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही. यासंदर्भातील अहवालाची पाहणी करून तब्बल अडीच महिन्यांनंतर महाबीजने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना बियाण्यांचा मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देमहाबीजने घेतली दखलनुकसानग्रस्तांचे खाते क्रमांक, नावे संकलित करण्यास प्रारंभ 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांनी महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही. यासंदर्भातील अहवालाची पाहणी करून तब्बल अडीच महिन्यांनंतर महाबीजने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना बियाण्यांचा मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी त्यांचे खाते क्रमांक आणि नावे संकलित करण्याचे काम कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात लोकमतने २१ जुलै रोजी त्या बियाण्यांबाबत महाबीजच्या निर्णयाची प्रतीक्षा’ या मथळय़ाखाली वृत्त प्रकाशित करून महाबीजचे लक्ष वेधले होते. यंदाच्या खरीप हंगामात महाबीजकडून घेतलेले अनेक शेतकर्‍यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. मानोरा तालुक्यातील ९0, वाशिममधील ३२, रिसोडमधील ८ आणि मालेगावातील ७ अशा १३७ शेतकर्‍यांनी यासंदर्भात कृषी विभागाकडे तक्रार केली होती. या प्रकाराची  जिल्हा परिषदेच्या २८ जून रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली होती. या सभेत जिल्हा परिषद सदस्य सचिन पाटील रोकडे यांनी महाबीज बियाण्याची रिकामी बॅग परिधान करून सभागृहाचे लक्ष वेधून घेत मानोरा तालुक्यातील न उगविलेल्या महाबीजच्या बियाण्याचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्याला अन्य जिल्हा परिषद सदस्य व उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनीही दुजोरा दिला होता, तर सभेच्या पीठासीन अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकार्‍यांना दिले होते. त्यानंतर तालुका कृषी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी आणि कृषी शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या समितीकडून या नुकसानीची पाहणी करण्यात आली आणि त्या संदर्भातील अहवाल परीक्षणासाठी महाबीजकडे जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाठविण्यात आला; परंतु तीन आठवडे उलटल्यानंतरही याची दखल घेण्यात आली नसल्याने ‘लोकमत’च्यावतीने २१ जुलै रोजी त्या बियाण्यांबाबत महाबीजच्या निर्णयाची प्रतीक्षा’ या मथळय़ाखाली वृत्त प्रकाशित करून महाबीजचे लक्ष वेधले होते. आता या प्रकरणाची संपूर्ण तपासणी करून शेतकर्‍यांना न उगवलेल्या बियाण्यांचा मोबदला देण्याचा निर्णय महाबीजने घेतला आहे. त्यानुसार ज्या शेतकर्‍याने जेवढे बियाणे घेतले असेल, तेवढय़ा बियाण्याची रक्कम संबंधित शेतकर्‍याला मिळणार आहे. यासाठी कृषी विभागाकडून शेतकर्‍यांचे नाव आणि खाते क्रमांक घेण्यात येत आहेत. 

 यंदाच्या खरीप हंगामात महाबीजच्या न उगवलेल्या बियाण्यांची रक्कम भरपाई म्हणून देण्यास महाबीजने मान्यता दिली आहे. ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याने त्यांचे खाते क्रमांक आणि नाव प्राप्त करून घेण्यात येत आहेत. -नरेंद्र बारापत्रेकृषी विकास अधिकारी,-