शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यचळवळीचा लोकाश्रयही ओसरला

By admin | Updated: May 17, 2014 23:11 IST

वाशिमच्या नाट्यक्षेत्राला पूर्वीसारखा राजाश्रय तर नाहीच परंतु लोकाश्रयही ओसरला आहे.

वाशिम : नाट्यक्षेत्रात आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी वाशिम येथील नाट्यचळवळ आजघडीला विविध कारणांमुळे ह्यऑक्सिजनह्णवर असल्याचे दिसून येते. टीव्हीचा वाढता प्रसार, रसिकांची बदललेली अभिरूची, लोप पावलेला रसिकाश्रय व औषधालाही शिल्लक नसलेला राजाश्रय यातून या नाट्यपरंपरेची पडझड झाली आहे. येथील नाट्कलांवत मंडळांनी सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणार्‍या पुणे-मुंबईच्या नाट्यगृहात प्रयोग लावण्याचे धाडस केले होते. तेथील सृजनशील रसिकांनी हे प्रयोग डोक्यावर घेत वाशिमकर कलावंताच्या यशाची पावती दिली. याची दखल आचार्य अत्रे यांनी यांच्या ह्यमी कसा घडलोह्ण या आत्मचरित्रात घेऊन वाशिमच्या नाट्यचळवळीचा गौरव केला आहे. वाकाटकांची राजधानी असलेल्या या नगरीत कला, साहित्याला प्रोत्साहन मिळाल्याने पुरातन काळापासून विद्या, कला व साहित्याचे माहेरघर म्हणून वाशिम (वत्सगुल्म) ओळखले जात असे. प्रसिद्ध संस्कृत कवी व नाटककार राजशेखर याचे वाशिम हे आजोळ आहे. पुरातन काळात वैभवाप्रत पोहोचलेल्या वाशिमच्या नाट्यक्षेत्रात १८८0 च्या दरम्यान बाळशास्त्री हरदास यांनी श्री. करुणेश्‍वर प्रासादिक वाशिमकर संगीत मंडळीची स्थापना करून वाशिमच्याच नव्हे तर राज्याच्या नाट्यक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. बाळशास्त्री यांच्यासोबत गोविंद दीक्षित, गणेश देशपांडे, गोपाळराव मराठे, शिवाजी मराठे यासारखे राज्यभर गाजलेले नट या कंपनीत काम करीत. स्वत: बाळशास्त्री हे नटाचे काम करीत तर दामुअण्णासारखा नटीचा काम करणारा नट ही राज्याच्या नाट्यवतरुळाला या कंपनीने दिलेली अनूपम भेट आहे. हा काळ वाशिमच्या कलावतरुळाचा सुवर्णकाळ मानला जातो. त्यानंतरही वाशिमच्या कलाक्षेत्रात अनेक चढउतार होत होते. त्यानंतरच्या १९६५ ते ८५ च्या कालखंडात सुरुचित साधना या नाट्यसंस्थेने नावलौकीक मिळवला. हे मंडळ डॉ. ह.त्र्यं. खरे यांनी स्थापन केले होते. १९८0 च्या दरम्यान येथील नाट्यचळवळीत डॉ. रवि जाधव, धनंजय खरे, दिलीप देशमुख, बाबुजी (एकनाथ) कदम, छाया काळे, मंगल इंगोले, साहेबराव खोब्रागडे, रोहिणी खरे, विकास देशपांडे, नाना काळे, एस.एम.आहाळे आदींनी राजशेखर नाट्य मंडळाची स्थापना केली. या मंडळाने सादर केलेले ह्यमाझी घरटी माझी पिल्लंह्ण, ह्यभोवराह्ण, ह्यखामोश अदालत जारी हैह्ण. ह्यवल्लभपूरची दंतकथाह्ण ह्यडागह्ण, ह्यघोटभर पाणीह्ण यासारख्या एकांकिका गाजल्या. या संस्थेतील एस.एम. आहाळे आजघडीला देशातील आघाडीचे चित्रपट कथाकार आहेत. त्यांनी हम आपके है कौन, मैने प्यार किया, यासह राजश्री प्रॉडक्शनच्या इतर चित्रपटासाठी लेखन केलेले आहे. १९८९ मध्ये चंद्रकांत देशमुख, श्रीपाद पुराणकर, अँड. राम काळू, दिलीप चव्हाण आदी कलांवतांनी युवाशक्ती कलासंच स्थापन करून काही काळ चळवळ पुढे चालू ठेवण्यास योगदान दिले. ही नाट्यचळवळीची अखेरची घरघर होती. आज वाशिमच्या नाट्यक्षेत्राला पूर्वीसारखा राजाश्रय तर नाहीच परंतु लोकाश्रयही ओसरला आहे.