शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

पीकविम्याचे अर्ज भरताना उडतोय गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 20:15 IST

वाशिम : ३१ जुलै या अंतीम मुदतीपर्यंत पीकविम्याचे अर्ज भरू न शकलेल्या शेतकºयांसाठी ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, ‘आॅनलाईन’ पद्धतीने राबविण्यात येत असलेल्या या प्रक्रियेत ‘नेट कनेक्टिव्हिटी’ मिळत नसून ‘आॅफलाईन’ पद्धतीने अर्ज भरताना क्षेत्रनिहाय पिकांकरिता नेमकी किती रक्कम आकारायची, याबाबत ग्रामीण भागातील बँकाही अनभिज्ञ असल्यामुळे पुरता गोंधळ उडत आहे. 

ठळक मुद्दे‘नेट कनेक्टिव्हिटी’ मिळत नसून ‘आॅफलाईन’ पद्धतीने अर्ज क्षेत्रनिहाय पिकांकरिता नेमकी किती रक्कम आकारायची याबाबत बँकाही अनभिज्ञ पीकविम्यासंबंधी क्षेत्रनिहाय आकारल्या जाणा-या रकमेसंदर्भात बँकांमध्ये स्पष्ट सुचना लावण्यात आलेल्या नाहीत

सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ३१ जुलै या अंतीम मुदतीपर्यंत पीकविम्याचे अर्ज भरू न शकलेल्या शेतकºयांसाठी ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, ‘आॅनलाईन’ पद्धतीने राबविण्यात येत असलेल्या या प्रक्रियेत ‘नेट कनेक्टिव्हिटी’ मिळत नसून ‘आॅफलाईन’ पद्धतीने अर्ज भरताना क्षेत्रनिहाय पिकांकरिता नेमकी किती रक्कम आकारायची, याबाबत ग्रामीण भागातील बँकाही अनभिज्ञ असल्यामुळे पुरता गोंधळ उडत असल्याचा प्रकार बुधवार, २ आॅगस्ट रोजी निदर्शनास आला.खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील नऊ पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. याअंतर्गत पेरणीपासून कापणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती, पावसाचा खंड, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संबंधित पीकविमा धारक शेतकºयास नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मात्र, ३१ जुलै या अंतीम मुदतीपर्यंत विविध स्वरूपातील तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी पिकविम्याची रक्कम भरू शकले नाहीत. ही बाब लक्षात घेवून शासनाने या प्रक्रियेसाठी ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ प्रदान केली; परंतू वाढीव मुदतीत महा ई सेवा केंद्र अथवा आपले सरकार सेवा केंद्रांवर अर्ज न स्विकारता शेतकºयांना थेट बँकांमध्ये जावूनच पीकविम्याची रक्कम भरावी लागणार असल्याची अट टाकण्यात आली आहे. त्यानुसार, आता प्रत्येक बँकेत शेतकºयांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. असे असताना बहुतांश बँकांमध्ये पीकविम्यासंबंधी क्षेत्रनिहाय आकारल्या जाणाºया रकमेसंदर्भात स्पष्ट सुचना लावण्यात आलेल्या नाहीत. यामुळे शेतकºयांची गोची झाली असून ‘आॅफलाईन’ स्वरूपात अर्ज भरताना पुरता गोंधळ उडत असल्याचे दिसून येत आहे. 

खासगीत भरून घेतले जाताहेत अर्जपीकविम्याकरिता ‘आॅनलाईन’ अर्ज करण्याच्या प्रक्रियेत विविध स्वरूपातील तांत्रिक अडथळे निर्माण झाल्यामुळे ग्रामीण भागातील बँकांसमोर खासगीत ‘वार्इंडर’ बसवून त्यांच्याकडूनच प्रतीअर्ज ठराविक मोबदला आकारून शेतकºयांचे अर्ज भरून घेतले जात असल्याचा प्रकार धानोरा खुर्द (ता.मंगरूळपीर) येथील बँकेसमोर बुधवारी दिसून आला. मात्र, संबंधित वार्इंडरला जमिनीचे हेक्टरी क्षेत्र गुंठ्यात रुपांतरित करण्याचे सूत्र अवगत नसल्याने संबंधित शेतकºयांकडून क्षेत्रनिहाय पीकविम्याची किती रक्कम आकारायची, याबाबत त्याचा पुरता गोंधळ उडत असल्याचे पाहावयास मिळाले. 

कृषी विभागाची यंत्रणा गायबवास्तविक पाहता पीकविम्याचे अर्ज ‘आॅफलाईन’ पद्धतीने भरून घेतले जात असताना शेतकºयांच्या सात-बारावर जेवढ्या क्षेत्रावर पेरा दर्शविण्यात आला आहे, तेवढीच रक्कम भरून भरून घेतले जाणे आवश्यक आहे. यासाठी ज्याठिकाणी खासगीत अर्ज भरले जात आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी कृषी विभागाच्या वतीने ठराविक कृषी सहायकाची नेमणूक व्हायला हवी होती. मात्र, या महत्वपूर्ण बाबीकडे कृषी विभागाने कानाडोळा केला आहे. तथापि, पेरणीचे क्षेत्र कमी असताना अधिक रक्कम आकारल्या गेल्यास अथवा क्षेत्र अधिक असताना कमी रक्कम आकारली गेल्यास शेतकºयांचेच नुकसान होण्याची शक्यता यामुळे वाढली आहे.