शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पीकविम्याचे अर्ज भरताना उडतोय गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 20:15 IST

वाशिम : ३१ जुलै या अंतीम मुदतीपर्यंत पीकविम्याचे अर्ज भरू न शकलेल्या शेतकºयांसाठी ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, ‘आॅनलाईन’ पद्धतीने राबविण्यात येत असलेल्या या प्रक्रियेत ‘नेट कनेक्टिव्हिटी’ मिळत नसून ‘आॅफलाईन’ पद्धतीने अर्ज भरताना क्षेत्रनिहाय पिकांकरिता नेमकी किती रक्कम आकारायची, याबाबत ग्रामीण भागातील बँकाही अनभिज्ञ असल्यामुळे पुरता गोंधळ उडत आहे. 

ठळक मुद्दे‘नेट कनेक्टिव्हिटी’ मिळत नसून ‘आॅफलाईन’ पद्धतीने अर्ज क्षेत्रनिहाय पिकांकरिता नेमकी किती रक्कम आकारायची याबाबत बँकाही अनभिज्ञ पीकविम्यासंबंधी क्षेत्रनिहाय आकारल्या जाणा-या रकमेसंदर्भात बँकांमध्ये स्पष्ट सुचना लावण्यात आलेल्या नाहीत

सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ३१ जुलै या अंतीम मुदतीपर्यंत पीकविम्याचे अर्ज भरू न शकलेल्या शेतकºयांसाठी ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, ‘आॅनलाईन’ पद्धतीने राबविण्यात येत असलेल्या या प्रक्रियेत ‘नेट कनेक्टिव्हिटी’ मिळत नसून ‘आॅफलाईन’ पद्धतीने अर्ज भरताना क्षेत्रनिहाय पिकांकरिता नेमकी किती रक्कम आकारायची, याबाबत ग्रामीण भागातील बँकाही अनभिज्ञ असल्यामुळे पुरता गोंधळ उडत असल्याचा प्रकार बुधवार, २ आॅगस्ट रोजी निदर्शनास आला.खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील नऊ पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. याअंतर्गत पेरणीपासून कापणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती, पावसाचा खंड, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संबंधित पीकविमा धारक शेतकºयास नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मात्र, ३१ जुलै या अंतीम मुदतीपर्यंत विविध स्वरूपातील तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी पिकविम्याची रक्कम भरू शकले नाहीत. ही बाब लक्षात घेवून शासनाने या प्रक्रियेसाठी ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ प्रदान केली; परंतू वाढीव मुदतीत महा ई सेवा केंद्र अथवा आपले सरकार सेवा केंद्रांवर अर्ज न स्विकारता शेतकºयांना थेट बँकांमध्ये जावूनच पीकविम्याची रक्कम भरावी लागणार असल्याची अट टाकण्यात आली आहे. त्यानुसार, आता प्रत्येक बँकेत शेतकºयांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. असे असताना बहुतांश बँकांमध्ये पीकविम्यासंबंधी क्षेत्रनिहाय आकारल्या जाणाºया रकमेसंदर्भात स्पष्ट सुचना लावण्यात आलेल्या नाहीत. यामुळे शेतकºयांची गोची झाली असून ‘आॅफलाईन’ स्वरूपात अर्ज भरताना पुरता गोंधळ उडत असल्याचे दिसून येत आहे. 

खासगीत भरून घेतले जाताहेत अर्जपीकविम्याकरिता ‘आॅनलाईन’ अर्ज करण्याच्या प्रक्रियेत विविध स्वरूपातील तांत्रिक अडथळे निर्माण झाल्यामुळे ग्रामीण भागातील बँकांसमोर खासगीत ‘वार्इंडर’ बसवून त्यांच्याकडूनच प्रतीअर्ज ठराविक मोबदला आकारून शेतकºयांचे अर्ज भरून घेतले जात असल्याचा प्रकार धानोरा खुर्द (ता.मंगरूळपीर) येथील बँकेसमोर बुधवारी दिसून आला. मात्र, संबंधित वार्इंडरला जमिनीचे हेक्टरी क्षेत्र गुंठ्यात रुपांतरित करण्याचे सूत्र अवगत नसल्याने संबंधित शेतकºयांकडून क्षेत्रनिहाय पीकविम्याची किती रक्कम आकारायची, याबाबत त्याचा पुरता गोंधळ उडत असल्याचे पाहावयास मिळाले. 

कृषी विभागाची यंत्रणा गायबवास्तविक पाहता पीकविम्याचे अर्ज ‘आॅफलाईन’ पद्धतीने भरून घेतले जात असताना शेतकºयांच्या सात-बारावर जेवढ्या क्षेत्रावर पेरा दर्शविण्यात आला आहे, तेवढीच रक्कम भरून भरून घेतले जाणे आवश्यक आहे. यासाठी ज्याठिकाणी खासगीत अर्ज भरले जात आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी कृषी विभागाच्या वतीने ठराविक कृषी सहायकाची नेमणूक व्हायला हवी होती. मात्र, या महत्वपूर्ण बाबीकडे कृषी विभागाने कानाडोळा केला आहे. तथापि, पेरणीचे क्षेत्र कमी असताना अधिक रक्कम आकारल्या गेल्यास अथवा क्षेत्र अधिक असताना कमी रक्कम आकारली गेल्यास शेतकºयांचेच नुकसान होण्याची शक्यता यामुळे वाढली आहे.