शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दुष्काळातही आत्महत्या अपात्र ठरविण्यावरच भर!

By admin | Updated: May 24, 2016 02:04 IST

वाशिम जिल्ह्यातील ३१ आत्महत्या प्रकरणापैकी १0 अपात्र; ४ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे चौकशीत.

विवेक चांदूरकर / वाशिमगत तीन वर्षांपासून जिल्हय़ात दुष्काळ असून, शेती व्यवसाय पूर्णत: मोडकळीस आला आहे; मात्र त्यानंतरही शासन शेतकर्‍यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यावरच भर देत आहे. जिल्हय़ात २0१६ साली आतापर्यंत झालेल्या ३१ आत्महत्यांपैकी १0 आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या असून, ४ आत्महत्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. जिल्हय़ात तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळ आहे. पावसाचे प्रमाण घटले असून तीन वर्षामध्ये सरासरीच्या ५0 टक्के कमी पाऊस पडला आहे. अल्प पाऊस व पावसात पडत असलेल्या दडीमुळे उत्पादनात प्रचंड घट आली आहे. गतवर्षी पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी उत्पादन झाले. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. दोन वेळच्या जेवणाचीही आबाळ होत आहे. त्यातच जिल्हय़ात उद्योगधंदे नसून, रोजगार हमी योजनेची कामेही ठप्प आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना रोजगारही उपलब्ध होत नाही. परिणामी शेतकर्‍यांना आत्महत्येचा मार्ग अवलंबवावा लागत आहे. जानेवारी २0१६ पासून आतापर्यंत पाच महिन्यातच ३१ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले. जानेवारी महिन्यात ९ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून, त्यापैकी दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्येची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात ६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, यापैकी दोन प्रकरणे अपात्र ठरविण्यात आले. मार्च महिन्यात ८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून, यापैकी अध्र्या म्हणजेच ४ आत्महत्यांची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. एप्रिल महिन्यात सहा शेतकर्‍यांनी आत्महत्या केला असून, यापैकी तीन प्रकरणे चौकशीत आहेत. तर मे महिन्यात एका शेतकर्‍याने आत्महत्या केली असून, सदर प्रकरण चौकशीत ठेवण्यात आले आहे. सर्वात जास्त आत्महत्या जानेवारी महिन्यात झाल्या.