शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळातही आत्महत्या अपात्र ठरविण्यावरच भर!

By admin | Updated: May 24, 2016 02:04 IST

वाशिम जिल्ह्यातील ३१ आत्महत्या प्रकरणापैकी १0 अपात्र; ४ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे चौकशीत.

विवेक चांदूरकर / वाशिमगत तीन वर्षांपासून जिल्हय़ात दुष्काळ असून, शेती व्यवसाय पूर्णत: मोडकळीस आला आहे; मात्र त्यानंतरही शासन शेतकर्‍यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यावरच भर देत आहे. जिल्हय़ात २0१६ साली आतापर्यंत झालेल्या ३१ आत्महत्यांपैकी १0 आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या असून, ४ आत्महत्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. जिल्हय़ात तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळ आहे. पावसाचे प्रमाण घटले असून तीन वर्षामध्ये सरासरीच्या ५0 टक्के कमी पाऊस पडला आहे. अल्प पाऊस व पावसात पडत असलेल्या दडीमुळे उत्पादनात प्रचंड घट आली आहे. गतवर्षी पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी उत्पादन झाले. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. दोन वेळच्या जेवणाचीही आबाळ होत आहे. त्यातच जिल्हय़ात उद्योगधंदे नसून, रोजगार हमी योजनेची कामेही ठप्प आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना रोजगारही उपलब्ध होत नाही. परिणामी शेतकर्‍यांना आत्महत्येचा मार्ग अवलंबवावा लागत आहे. जानेवारी २0१६ पासून आतापर्यंत पाच महिन्यातच ३१ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले. जानेवारी महिन्यात ९ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून, त्यापैकी दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्येची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात ६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, यापैकी दोन प्रकरणे अपात्र ठरविण्यात आले. मार्च महिन्यात ८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून, यापैकी अध्र्या म्हणजेच ४ आत्महत्यांची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. एप्रिल महिन्यात सहा शेतकर्‍यांनी आत्महत्या केला असून, यापैकी तीन प्रकरणे चौकशीत आहेत. तर मे महिन्यात एका शेतकर्‍याने आत्महत्या केली असून, सदर प्रकरण चौकशीत ठेवण्यात आले आहे. सर्वात जास्त आत्महत्या जानेवारी महिन्यात झाल्या.