शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
5
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
6
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
7
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
8
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
9
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
10
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
11
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
12
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
13
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
14
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
15
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!
16
हृदयद्रावक! एका पायलटच्या लग्नासाठी कुटुंबीय शोधत होते मुलगी तर दुसऱ्याला १ महिन्याचा मुलगा
17
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
18
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
19
Life Lesson: तुम्हाला अतिविचार करण्याची सवय आहे? मग 'हा' गुरुमंत्र येईल कामी!
20
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?

दुष्काळातही आत्महत्या अपात्र ठरविण्यावरच भर!

By admin | Updated: May 24, 2016 02:04 IST

वाशिम जिल्ह्यातील ३१ आत्महत्या प्रकरणापैकी १0 अपात्र; ४ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे चौकशीत.

विवेक चांदूरकर / वाशिमगत तीन वर्षांपासून जिल्हय़ात दुष्काळ असून, शेती व्यवसाय पूर्णत: मोडकळीस आला आहे; मात्र त्यानंतरही शासन शेतकर्‍यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यावरच भर देत आहे. जिल्हय़ात २0१६ साली आतापर्यंत झालेल्या ३१ आत्महत्यांपैकी १0 आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या असून, ४ आत्महत्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. जिल्हय़ात तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळ आहे. पावसाचे प्रमाण घटले असून तीन वर्षामध्ये सरासरीच्या ५0 टक्के कमी पाऊस पडला आहे. अल्प पाऊस व पावसात पडत असलेल्या दडीमुळे उत्पादनात प्रचंड घट आली आहे. गतवर्षी पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी उत्पादन झाले. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. दोन वेळच्या जेवणाचीही आबाळ होत आहे. त्यातच जिल्हय़ात उद्योगधंदे नसून, रोजगार हमी योजनेची कामेही ठप्प आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना रोजगारही उपलब्ध होत नाही. परिणामी शेतकर्‍यांना आत्महत्येचा मार्ग अवलंबवावा लागत आहे. जानेवारी २0१६ पासून आतापर्यंत पाच महिन्यातच ३१ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले. जानेवारी महिन्यात ९ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून, त्यापैकी दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्येची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात ६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, यापैकी दोन प्रकरणे अपात्र ठरविण्यात आले. मार्च महिन्यात ८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून, यापैकी अध्र्या म्हणजेच ४ आत्महत्यांची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. एप्रिल महिन्यात सहा शेतकर्‍यांनी आत्महत्या केला असून, यापैकी तीन प्रकरणे चौकशीत आहेत. तर मे महिन्यात एका शेतकर्‍याने आत्महत्या केली असून, सदर प्रकरण चौकशीत ठेवण्यात आले आहे. सर्वात जास्त आत्महत्या जानेवारी महिन्यात झाल्या.