शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई आणणार तोंडाला फेस

By admin | Updated: August 26, 2014 23:58 IST

विधानसभेच्या कुरूक्षेत्रात मतदारांसमोर उमेदवार होणार हतबल

वाशिम: जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये दरवर्षीच जाणवणारी पाणीटंचाई यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांसह त्यांच्या सर्मथकांच्या तोंडाला फेस आणण्याची शक्यता बळावली आहे.ग्राम विकासाची नाना स्वप्ने उराशी बाळगणार्‍या जिल्हावासीयांचा अद्याप तरी स्वप्नभंगच झालेला आहे. हतबल लोकप्रतिनिधी तथा निगरगट्ट प्रशासकीय यंत्रणेच्या नियोजनशून्य कारभारामुळे गत १५ वर्षातही जिल्हा विकासाचे बाळसे धरू शकला नाही. ग्रामीण भागातील अनेक भागांमध्ये अद्याप पक्के रस्ते नाहीत. सांडपाण्याचे नियोजन नाही. घाणीचे साम्राज्य तर नागरिकांच्या पाचविलाच पुजले आहे. या व्यतिरिक्त गढूळ पाणी, जलवाहिनीला गळती आदी प्रश्नांनी त्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. सर्वाधिक भीषण समस्या आहे, पिण्याच्या पाण्याची. जिल्ह्यातील निम्म्या गावातील जनता दरवर्षीच पाणी टंचाईचे चटके सोसत आली आहे. कधी पाणी नाही म्हणून तर कधी वीज भारनियमनाच्या पदराआड नागरिकांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरण्याचे नावच घेत नाही.. काही गावांमध्ये उन्हाळाच नव्हे तर पावसाळा व हिवाळ्यातही पाणी टंचाईचे तांडव सुरू असते. परिणामी पाणीटंचाईच्या दाहकतेमध्ये येथील नागरिक होरपळत असतात. तथापि, संबंधित लोकप्रतिनिधींना पाणी टंचाईकडे लक्ष द्यायला वेळ दिसून येत नाही. सध्या निवडणुकीचा फिवर आहे. त्यामुळे झाडुन पुसून सर्व राजकारणी मतांची झोळी घेऊन जनता जनार्दनासमोर या समस्यांकडे हात पसरविणार आहेत. काही राजकारण्यांनी यापूर्वी सत्तेची फळे चाखली आहेत. तथापि, या समस्यांचे निराकरण करण्याची हिम्मत त्यांच्यातील एकही ह्यमाईचा लालह्ण दाखवू शकला नाही., हे जिल्हावासीयांचे दुर्दैव आहे. प्रत्येक वेळी जात-पात, पैसा-अडका, धर्म-पंथ यासारख्या शस्त्रांनी मतदारांना ह्यइमोशनल ब्लॅकमेल ह्ण करायचे किंवा आश्‍वासनांच्या पावसात मतांचे भरघोस पीक घेऊन डाव साधायचा, हेच कारस्थान नाकर्त्या लोकप्रतिनिधींनी केले आहे. यावेळी मात्र हवेने दिशा बदलली आहे. कुठल्याही आमिषाला बळी न पडता प्रचाराला येणार्‍या उमेदवाराला जाब विचारण्याची मानसिकता मतदारांनी करून ठेवली आहे. त्यामुळे उमेदवार हैराण होणार आहेत, ही काळ्या दगडावरची रेष आहे. उमेदवारांच्या सर्मथकांनाही मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत आहेत.