शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दांडियाच्या नावावर फोफावतेय डान्स संस्कृती!

By admin | Updated: October 14, 2015 01:59 IST

लोकमत परिचर्चेत मान्यवरांचा सूर; गरबा व दांडियांची होतेय स्पर्धा.

वाशिम : कधी काळी भक्तीमय वातावरणात व श्रद्धापूर्वक साजरा होत असलेल्या दुर्गा उत्सवात कालांतराने आधुनिकता आली. भक्तीमय वातावरणात गरबा नृत्य खेळल्या जात असे मात्र आधुनिकतेच्या या युगात युवक-युवतींमध्ये गरबा व दांडीया खेळण्याची स्पर्धा सुरु झाली. गरबा व दांडियाच्या नावावर चक्क डान्स संस्कृती फोफावत असल्याची चिंता व्यक्त करीत असल्याचा सूर लोकमतच्या परिचर्चेत मान्यवरांनी काढला. स्थानिक लोकमत जिल्हा कार्यालयात १३ ऑक्टोबर रोजी दुर्गोत्सवाचे बदलते स्वरुप या विषयावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. या परिचर्चेत शहरातील अनिल धुमकेकर, श्रीनिवास व्यास, दिनेश काशिकर, रविंद्र पेंढारकर, गजानन चव्हाण व सुरेश जावळे या मान्यवरांनी सहभाग घेतला होता. घटस्थापनेपासून विजयादशमी दरम्यान नउ दिवस संपूर्ण भारतात नवरात्री उत्सव उत्साहात, धार्मिक भक्तीमय वातावरणात दुर्गोत्सवाचे आयोजन करुन भक्ती व संस्कृतीचे जतन करण्याची परंपरा आहे. नवदुर्गा, नवरागिनी, नवशक्ती अशा नउ रुपात नारी शक्तीचे महत्व यातून प्रकट होतो. पश्‍चिम बंगाल, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांसह भारतातील सर्वच राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मोठय़ा प्रमाणात नवरात्री दुर्गोत्सव साजरा होत असतो. आदीशक्ती माता दुर्गा म्हणजेच स्त्रीशक्ती की जी या विश्‍वाची निर्मिती आहे. म्हणून तिला पुजण्याची ही भारतीय वैदीक परंपरा असल्याचे मत व्यक्त करीत अलिकडच्या काळात आधुनिकतेच्या मागे लागून दुर्गोत्सव भक्तीमय वातावरण हटविण्याची खंत परिचर्चेत सहभागी मान्यवरांनी व्यक्त केली. गरबा नृत्यातील सोज्वळपणा व धाद्गमकता लोप पावली असून गरबा व दांडियाच्या नावावर मात्र डान्स संस्कृती फोफावत असून दुर्गोत्सवातील भक्ती व संस्कृतीचा र्‍हास होत असल्याचा सूर परिचर्चेत सहभागी मान्यवरांनी आवळला.