पोहा (वाशिम): २0१३ च्या जुलै व ऑगस्ट महिन्यात पोहा व परिसरात झालेल्या अतीवृष्टीमुळे काही भूमीहीन कुटुंबे अक्षरशा उघड्यावर आली. परंतु, शासनाने या भूमिहीन, मजूर कुटुंबाना घरांच्या नुकसानाबाबत अजुनपर्यंत आर्थिक मदत दिली नाही. त्यामुळे ही भूमिहीन शेतमजूर कुटुंबे आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहे. पोहा येथे २0१३ च्या जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील अंदाजे १५0 ते २00 घरांची मोठय़ा प्रमाणात पडझड झाली. यामध्ये बरीच भूमिहीन व शेतमजूर कुटुंब उघड्यावर आली. शासनाच्या वतीने २४ ऑगस्ट १३ रोजी तलाठी व ग्रामसेवकांच्या वतीने गावात झालेल्या पडझडीची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा सर्व्हे करण्यात आला. पुन्हा घराचे बांधकाम करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. घराच्या दुरूस्तीसाठी ही कुटुंब आर्थिक मदतीची प्रतीक्षा करीत आहेत
अतीवृष्टीगस्त कुटुंब १0 महिन्यांपासून उघड्यावर
By admin | Updated: May 25, 2014 00:07 IST