शहरं
Join us  
Trending Stories
1
iPhone 17 सीरीजचे चार नवे मॉडेल्स लॉन्च, Pro Motion डिस्प्ले, 20 म‍िनिटांत चार्ज; आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
2
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
3
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
4
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
5
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
6
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
7
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
8
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
9
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
10
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
11
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
12
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
13
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
14
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
15
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
16
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
17
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
18
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
19
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?

अतिवृष्टी झाली, तर २० गावांना धोका ; पावसात या ठिकाणी न गेलेलेच बरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:42 IST

वाशिम : अतिवृष्टी झाली तर नदीकाठावरील २० पेक्षा अधिक गावांना पुराचा तडाखा बसू शकतो. काही गावात जाण्यासाठी नदीनाल्यावर जमीन ...

वाशिम : अतिवृष्टी झाली तर नदीकाठावरील २० पेक्षा अधिक गावांना पुराचा तडाखा बसू शकतो. काही गावात जाण्यासाठी नदीनाल्यावर जमीन समांतर पूल असल्याने नागरिकांना पाण्यातून मार्गक्रमण करीत गाव गाठावे लागते.

गत तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. मंगरूळपीर तालुक्यातील भोपळपेंड नदीला पूर आल्यानंतर जवळपास १४ गावांचा संपर्कही तुटला होता. राज्यात कोकणासह कोल्हापूर आदी शहरांमध्येही पावसाने कहर केला. जिल्ह्यात अतिवृष्टी झाली तर २० पेक्षा अधिक गावांना पुराचा तडाखा बसू शकतो. काही गाव परिसरातील नदी, नाल्यावर पूल नसल्याने गावकऱ्यांना पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागते. मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे, रिसोड तालुक्यातील खडकी सदार, जायखेडा, नेतन्सा, मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव, शेंदुरजना, चिंचोली, पिंपळगाव आदी गावातील नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. पुलाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी पांगरी नवघरे, खडकी सदार, जायखेडा, नेतन्सा आदी भागातील नागरिकांनी वारंवार केली. परंतु, याकडे संबंधित यंत्रणेने अद्याप लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, अतिवृष्टी, संततधार पाऊस झाला तर बचाव म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तर व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केले. शोध व बचाव पथके सज्ज ठेवणे, पंचनामा पथके तयार ठेवणे, पोहणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित करणे, तात्पुरते निवारे निश्चित करणे, स्वयंसेवी संस्थेचा सहभाग घेणे याबाबत जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना निर्देश दिले आहेत.

००००००००

जिल्ह्यात पाणी साचणारी ठिकाणं

संततधार पाऊस झाला तर मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे, रिसोड तालुक्यातील खडकी सदार, मानोरा तालुक्यातील चाकूर-गव्हा, मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव, शेंदुरजना आदी गाव परिसरात पाणी साचते. नदी, नाल्यावर जमीन समांतर पूल असल्याने पूर जातो. त्यामुळे गावात प्रवेश करताना पांगरी नवघरे, खडकी सदार आदी गावातील नागरिकांना पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागते.

००००

पुलाची निर्मिती केल्यास गैरसोय टळेल

नदी, नाल्यावर उंच पुलाची निर्मिती झाल्यास पूर जरी आला तरी नागरिकांना पुलावरून जाणे सोयीचे ठरणारे आहे. त्यामुळे खडकी सदार, चाकूर- गव्हा, पांगरी नवघरे यासह अन्य गाव परिसरातील नदी, नाल्यावर पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.

००००

पाऊस नको नकोसा !

कोट

संततधार पाऊस आला की गावाजवळून जाणाऱ्या नदी-नाल्याला पूर जातो. पूल नसल्यामुळे गावाचा संपर्क तुटतो. पूर ओसरल्यानंतर पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागते. या ठिकाणी पुलाची उभारणी करणे आवश्यक आहे.

- गणेश पाटील सदार

खडकी सदार

००००

कोट

अतिवृष्टीमुळे गावाला पुराचा वेढा पडतो. गावात पावसाचे पाणी शिरत असल्याने भीतीचे वातावरण असते. त्यामुळे अतिवृष्टी, संततधार पाऊस नको, नकोसा वाटतो. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अपेक्षित आहे.

- मधुकर सोळंके

चिंचोली

०००००००००००००

प्रशासनाचे तेच ते रडगाणे

जिल्ह्यातील पांगरी नवघरे, खडकी सदार, चिंचोली यासह अन्य गावकऱ्यांना पाण्यातून मार्गक्रमण करावे लागते. या ठिकाणी उंच पुलाची निर्मिती अद्याप झाली नाही. निधी नाही, प्रशासकीय सोपस्कार बाकी आदी कारणे सांगून गावकऱ्यांची बोळवण केली जात आहे.

००००००००