शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी झाली, तर २० गावांना धोका ; पावसात या ठिकाणी न गेलेलेच बरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:42 IST

वाशिम : अतिवृष्टी झाली तर नदीकाठावरील २० पेक्षा अधिक गावांना पुराचा तडाखा बसू शकतो. काही गावात जाण्यासाठी नदीनाल्यावर जमीन ...

वाशिम : अतिवृष्टी झाली तर नदीकाठावरील २० पेक्षा अधिक गावांना पुराचा तडाखा बसू शकतो. काही गावात जाण्यासाठी नदीनाल्यावर जमीन समांतर पूल असल्याने नागरिकांना पाण्यातून मार्गक्रमण करीत गाव गाठावे लागते.

गत तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. मंगरूळपीर तालुक्यातील भोपळपेंड नदीला पूर आल्यानंतर जवळपास १४ गावांचा संपर्कही तुटला होता. राज्यात कोकणासह कोल्हापूर आदी शहरांमध्येही पावसाने कहर केला. जिल्ह्यात अतिवृष्टी झाली तर २० पेक्षा अधिक गावांना पुराचा तडाखा बसू शकतो. काही गाव परिसरातील नदी, नाल्यावर पूल नसल्याने गावकऱ्यांना पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागते. मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे, रिसोड तालुक्यातील खडकी सदार, जायखेडा, नेतन्सा, मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव, शेंदुरजना, चिंचोली, पिंपळगाव आदी गावातील नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. पुलाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी पांगरी नवघरे, खडकी सदार, जायखेडा, नेतन्सा आदी भागातील नागरिकांनी वारंवार केली. परंतु, याकडे संबंधित यंत्रणेने अद्याप लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, अतिवृष्टी, संततधार पाऊस झाला तर बचाव म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तर व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केले. शोध व बचाव पथके सज्ज ठेवणे, पंचनामा पथके तयार ठेवणे, पोहणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित करणे, तात्पुरते निवारे निश्चित करणे, स्वयंसेवी संस्थेचा सहभाग घेणे याबाबत जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना निर्देश दिले आहेत.

००००००००

जिल्ह्यात पाणी साचणारी ठिकाणं

संततधार पाऊस झाला तर मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे, रिसोड तालुक्यातील खडकी सदार, मानोरा तालुक्यातील चाकूर-गव्हा, मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव, शेंदुरजना आदी गाव परिसरात पाणी साचते. नदी, नाल्यावर जमीन समांतर पूल असल्याने पूर जातो. त्यामुळे गावात प्रवेश करताना पांगरी नवघरे, खडकी सदार आदी गावातील नागरिकांना पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागते.

००००

पुलाची निर्मिती केल्यास गैरसोय टळेल

नदी, नाल्यावर उंच पुलाची निर्मिती झाल्यास पूर जरी आला तरी नागरिकांना पुलावरून जाणे सोयीचे ठरणारे आहे. त्यामुळे खडकी सदार, चाकूर- गव्हा, पांगरी नवघरे यासह अन्य गाव परिसरातील नदी, नाल्यावर पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.

००००

पाऊस नको नकोसा !

कोट

संततधार पाऊस आला की गावाजवळून जाणाऱ्या नदी-नाल्याला पूर जातो. पूल नसल्यामुळे गावाचा संपर्क तुटतो. पूर ओसरल्यानंतर पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागते. या ठिकाणी पुलाची उभारणी करणे आवश्यक आहे.

- गणेश पाटील सदार

खडकी सदार

००००

कोट

अतिवृष्टीमुळे गावाला पुराचा वेढा पडतो. गावात पावसाचे पाणी शिरत असल्याने भीतीचे वातावरण असते. त्यामुळे अतिवृष्टी, संततधार पाऊस नको, नकोसा वाटतो. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अपेक्षित आहे.

- मधुकर सोळंके

चिंचोली

०००००००००००००

प्रशासनाचे तेच ते रडगाणे

जिल्ह्यातील पांगरी नवघरे, खडकी सदार, चिंचोली यासह अन्य गावकऱ्यांना पाण्यातून मार्गक्रमण करावे लागते. या ठिकाणी उंच पुलाची निर्मिती अद्याप झाली नाही. निधी नाही, प्रशासकीय सोपस्कार बाकी आदी कारणे सांगून गावकऱ्यांची बोळवण केली जात आहे.

००००००००