शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पीककर्ज भरण्यास मुदतवाढ द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:38 IST

वाशिम : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सहकारी संस्था, तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून गेल्यावर्षी बिनव्याजी कर्ज घेतले. ते कर्ज परतफेड करण्याची मुदत ...

वाशिम : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सहकारी संस्था, तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून गेल्यावर्षी बिनव्याजी कर्ज घेतले. ते कर्ज परतफेड करण्याची मुदत ३१ मार्च होती. या मुदतीत कर्जाचा भरणा करता आला नसल्याने ३० जूनपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना खरीप हंगामात विविध पिकांची लागवड, बियाणे, खते यासाठी सेवा सहकारी संस्था व राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत बिनव्याजी कर्जाचे वाटप करण्यात येते. खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी पिकाची विक्री करून ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड बँकेला करावी लागते. गतवर्षी अतिवृष्टी व जोरदार झालेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामात उत्पादन कमी झाले. कपाशीचे बोंडसड व बोंडअळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परतीच्या पावसामुळेदेखील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे पीक कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी परतफेड करण्याची सवलत देऊन ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

------------- बॉक्स ------------

कोरोनामुळे बँकांचे कामकाज खोळंबले

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असल्याने, तसेच काही बँकेतील कर्मचारी व अधिकारी पॉझिटिव्ह आल्यामुळे बँकेतील कामकाजही प्रभावित होत आहे. ३१ मार्चच्या गडबडीत विविध बँकेत काही दिवस शेती संबंधित कामे बंदच होती, तर रोख व्यवहारांनाच प्राधान्य देण्यात आले.