शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

कर्मचा-यांच्या प्रवासभत्त्याचा ‘वनवास’ संपुष्टात

By admin | Updated: February 4, 2016 01:19 IST

वन विभागातील गस्तीवरच्या कर्मचा-यांना १५00 रुपये कायम प्रवास भत्ता मिळणार.

संतोष वानखडे / वाशिम: वनक्षेत्राचे संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून गस्तीवर राहणार्‍या वनविभागाच्या कर्मचार्‍यांना फेब्रुवारीपासून १५00 रुपये कायम प्रवास भत्ता मिळणार आहे. वाशिम जिल्ह्यातील जवळपास ५0 कर्मचार्‍यांना याचा लाभ होणार आहे. भूमीच्या पोटात शिरून मानवाने अनेक धातू शोधून काढले, कृत्रिम पाऊस पाडला. काही प्रमाणात मानवाने निसर्गावर विजयही मिळविला; मात्र असे करताना त्याचे वन संवर्धन व संरक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याने वनक्षेत्रात घट येत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक असलेले ३३ टक्के वनक्षेत्र वाशिमसह महाराष्ट्र आणि देशातही नाही. यापुढे वनक्षेत्रात घट येणार नाही, याची दक्षता म्हणून वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील मेडशी, वाशिम व कारंजा परीक्षेत्रात बर्‍यापैकी वनराई आहे. या वनांचे संवर्धन, संरक्षण करण्याची जबाबदारी वनविभागातील वनपरीक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, रोपवन कोतवाल, वनपाल, सहायक लागवड अधिकारी या संवर्गातील अधिकारी-कर्मचार्‍यांवर सोपविली आहे. वनांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी वनरक्षक, रोपवन कोतवाल, वनपाल, सहायक लागवड अधिकारी या संवर्गातील कर्मचार्‍यांना गस्तीवर राहणे बंधनकारक आहे. मुख्यालय ते गस्त या दरम्यानचा प्रवास या कर्मचार्‍यांना स्वखर्चाने करावा लागत असल्याने भुर्दंड सोसावा लागत होता. याचा परिणाम साहजिकच गस्तीवरही होत असे. गस्त करणार्‍या वन कर्मचार्‍यांना कायम प्रवास भत्ता देण्याची मागणी शासनस्तरावर विविध संघटनांनी लावून धरली. या मागणीची दखल म्हणून फेब्रुवारी २0१६ पासून वनरक्षक, रोपवन कोतवाल, वनपाल, सहायक लागवड अधिकारी या संवर्गातील कर्मचार्‍यांना प्रतिमाह १५00 रुपये कायम प्रवास भत्ता मंजूर झाला असून, वाशिम जिल्ह्यातील जवळपास ५0 कर्मचार्‍यांना याचा फायदा होणार आहे. कायम प्रवास भत्त्याच्या रकमेचा कुणी गैरफायदा घेणार नाही, यासाठी सहायक वनसंरक्षक किंवा सहायक संचालकांनी विशेष लक्ष ठेवावे, असे निर्देश वन व महसूल विभागाने दिल्याचे उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.